शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

शेतकऱ्यांच्या पिवळ्या सोन्याला परतीच्या पावसाचा मोठा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 01:11 IST

दोन-तीन दिवसांपासून रिपरिप; हाती आलेले पीक वाया जाण्याची भीती

जव्हार : जव्हार-मोखाडा तालुक्यांना काही दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले होते, तर मागील दोन ते तीन दिवसांपासून खेडोपाड्यात काही ठिकाणी पावसाच्या धारा पडत आहेत. यामुळे हळव्या वाणातील कापणी केलेल्या भातपिकाचे प्रचंड नुकसान होत आहे. हातात आलेले पीक वाया जात असल्यामुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे.हळव्या वाणातील भातपिके कापणीस तयार झाली आहेत. ठिकठिकाणी पिवळ्या सोन्यावाणी शेती बहरली आहे. काही शेतकऱ्यांनी कापणीस सुरुवातही केली आहे. मात्र, कापणी केलेल्या या पिवळ्या सोन्याला घरी आणण्यापूर्वीच परतीच्या पावसाने दरोडा टाकण्यास सुरुवात केल्याने शेतकरी भयभीत झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास डोळ्यांसमोर कुजून जाताना पाहून बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे.कोरोनाचा धोका पत्करून व टाळेबंदीचा सामना करून येथील शेतकºयांनी मोठ्या मेहनतीने या वर्षी भाताची लागवड केली आहे. अगदी सोन्यावाणी भात पिकून आले आहे. वेळीच या भाताची कापणी केली तर या भाताचा चांगला तांदूळ तयार करता येईल. अन्यथा जास्त दिवस शेतातच राहिले तर ते शेतात गळून जाईल, अशी भीती शेतकºयांना असल्याने शेतकºयांनी कापणी सुरू केली आहे.मात्र कापणी केलेल्या भाताचे कडपे रोजच संध्याकाळी कोसळत असलेल्या पावसाने भिजत आहेत. काही ठिकाणी कडपे शेतात साचलेल्या पावसाच्या पाण्याने कुजून जावून भाताच्या कणसांना मोड येऊ लागले आहेत.दरम्यान, आॅगस्ट महिन्यातही अतिवृष्टीमुळे जवळपास ३९७.३५ हेक्टर क्षेत्रावर ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे पंचनामे महसूल विभागाकडून करण्यात आले आहेत. या नुकसानीत भात १५७.६४ तर नागली २३९.७१ हेक्टरचा समावेश आहे, अशी माहिती जव्हार तहसीलदार बाळा भला यांनीदिली आहे.