शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

महात्मा फुले विचार प्रबोधन कट्ट्याचे भूमिपुजन संपन्न

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: January 3, 2024 16:36 IST

तरुणांना आणि ज्येष्ठांना चांगले साहित्य व वृत्तपत्रे वाचण्यास मिळणार असल्याचे मत आ. अ‍ॅड. डावखरे यांनी व्यक्त केले.

ठाणे : आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले जयंती दिनाचे औचित्य साधून ठाणे कोर्टनाका सर्कल येथे महात्मा ज्योतिबा फुले- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचार प्रबोधन कट्ट्याचे भूमिपुजन समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांच्याहस्ते करण्यात आले. या कट्टयामुळे अठरा पगड जातीसमुहातील मुलांना, तरुणांना आणि ज्येष्ठांना चांगले साहित्य व वृत्तपत्रे वाचण्यास मिळणार असल्याचे मत आ. अ‍ॅड. डावखरे यांनी व्यक्त केले.

यावेळी ओबीसी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रफुल वाघोले आणि मराठा सेवा संघाचे ठाणे अध्यक्ष मंगेश आवळे यांच्यासह सर्व समाज बांधवांनी दिवंगत वसंत डावखरे यांची संकल्पना सत्यात उतरणार असल्याची भावनाही व्यक्त केली. यावेळी प्रफुल वाघोले यांनी आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांनी ‘भारतरत्न पुरस्कार’ मिळावा अशी मागणी राज्य आणि केंद्राकडे करावी, असे आवाहन उपस्थित मान्यवरांकडे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक मधुकर मुळूक यांनी केली. आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले जयंती दिनानिमित्त माळी, आगरी, कोळी, कुणबी आणि मराठा समाजातील सर्व बंधु-भगिनींनी मोठी गर्दी करत या सोहळ्याचा आनंद क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या घोषणांनी द्विगुणीत केला. विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे यांनी ठाण्यात फुलेंचे स्मारक असावे, अशी संकल्पना मांडली होती. ही संकल्पना पूर्णत्वास जावी, यासाठी ठाणे ओबीसी एकीकरण समितीचे निमंत्रक प्रफुल वाघोले यांनी ठाणे शहरात फुले दाम्पत्याचे स्मारक व्हावे, यासाठी पत्रव्यवहार केला होता. मागील वर्षी गडकरी रंगायतन येथे झालेल्या कार्यक्रमात डावखरे यांनी फुले स्मारकासाठी निधी देण्याची घोषणा केली होती. त्यांच्या विशेष निधीमधून या विचार कट्ट्याची उभारणी करण्यात येत आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोर्टनाका सर्कल येथे या कट्ट्याचे भूमिपुजन डावखरे आणि महिला भगिनींच्या हस्ते नारळ वाढवून भूमिपुजन सोहळा संपन्न झाला. यावेळी शिवसेना पक्ष प्रवक्ते नरेश म्हस्के, माजी नगरसेवक मनोहर डुंबरे, माजी नगरसेवक भरत चव्हाण, सुधीर कोकाटे, विकास दाभाडे, समता विचार प्रसारक मंडळाचे अजय भोसले व इतर उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणे