शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

भिवंडीत आदिवासी कातकरी कुटुंबातील दोन तरुणांना श्रमजीवी संघटनेने केले वेठबिगारीतून मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 13:22 IST

मालकावर वेठबिगार व अट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल 

भिवंडी: तालुक्यातील पाये , नाईकपाडा येथे राहणाऱ्या राजेश भोईर (24) व भिमा भोईर ( 22 ) या दोघा भावांना खार्डी गावातील निलेश तांगडी या मालकाने आपल्या सर्व्हिस सेंटर व शेतीच्या कामावर गेल्या दोन वर्षांपासून अहोरात्र राबवून त्यांची शारीरिक व आर्थिक पिळवणूक केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे या अन्यायाविरोधात पिडीत तरुणांनी श्रमजिवी संघटनेच्या माध्यमातून तालुका पोलिस ठाण्यात बंधबिगार पद्धती (उच्चाटन )अधिनियम 1976 कलम 15 , 16 , 17 , 18 व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अधिनियम 1989  कलम 3(1)(एच ) व 6 या कायद्यान्वये फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.

मालक निलेश तांगडी यांनी पिडीत तरुणांच्या 29 मे 2018 रोजी झालेल्या लग्न सोहळ्यासाठी 1 लाख 19 हजार 690 रुपये खर्च केला होता. त्याबाबत त्याने एका कागदावर लिहून दिले होते.त्यानंतर लग्नाच्या काही दिवसांनी दोघा भावांनी मालक निलेश तांगडी यांच्या मालकीच्या कैलास सर्व्हिस सेंटर येथे कामावर जाण्यास सुरुवात केली. यावेळी प्रत्येकी 3 हजार 500 रुपये महिना वेतन देण्याचे निश्चित करून आठवड्याला प्रत्येकी 1 हजार रुपये दोघांना देण्याचे ठरवण्यात आले होते.तर दोघा भावांना घरी येण्या - जाण्यासाठी हिरो कंपनीची पॅशन प्रो दुचाकी गाडी घेऊन दिली होती. त्याचे हप्तेही दर महिन्याला दोघांच्या पगारातून कपात केले जायचे.

कागदावर लग्नाचा खर्च लिहून दिल्यापासून दोन वर्षात आजपर्यंत दोघांचा हिशेब केलेला नव्हता.सर्व्हिस सेंटरवर काम नसले की मालक निलेश तांगडी त्यांच्याकडून शेती किंवा अन्य कामे करून घ्यायचा.सध्या कोरोनाच्या काळात काम बंद असल्याने दोघे भाऊ हे घरातील आवणीचे काम करत होते. यावेळी निलेश तांगडी यांनी दोघा भावांना फोनवरून तसेच घरी येऊन आवणीच्या कामाला चला असा तगादा लावला होता. त्यावेळी घरच्या शेतीचे काम आटोपून आम्हीं कामावर येतो असे सांगितले.मात्र मालक निलेश हा काही ऐकत नव्हता.त्यामुळे दोघा भावांनी शेठ निलेश यास दोन वर्षे काम केल्याचा हिशोब करण्यास सांगितले.याचा राग मनात ठेवून निलेश तांगडी यांनी दोघा भावांना शिवीगाळ व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

तसेच माझे व्याजासहीत 3 लाख रुपये तुमच्या अंगावर झाले आहेत.ते एका महिन्यात मला परत द्या असे धमकावले.यामुळे राजेश व भिमा यांचे कुटुंब घाबरून अस्वस्थ झाले होते.अखेर या कुटुंबाने श्रमजीवी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस बाळाराम भोईर यांची भेट घेऊन त्यांच्यावर ओढवलेला प्रसंग कथन केला.पिडीत तरुणांच्या कुटुंबावर होणाऱ्या अन्यायाची दखल घेऊन बाळाराम भोईर यांनी भिवंडी तालुक्याच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी रात्री उशिराने वेठबिगार मुक्ती व ऍट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेची माहिती तहसीलदार शशिकांत गायकवाड यांना दिली असता त्यांनी श्रमजिवी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह पिडीत राजेश व भीमा भोईर या दोघा भावांना कार्यालयात पाचारण करुन त्यांना वेठबिगार मुक्तीचे दाखले देऊन बंध मुक्त केले आहे.यावेळी भिवंडी शहराध्यक्ष सागर देसक,सचिव मोतीराम नामकुडा, जनरल सेक्रेटरी बाळाराम भोईर,ठाणे जिल्हा अध्यक्ष अशोक सापटे,ठाणे जिल्हा शेतकरी घटक प्रमुख संगिता भोमटे,ठाणे जिल्हा महिला घटक प्रमुख जया पारधी,भिवंडी ग्रामीण तालुका अध्यक्ष सुनिल लोणे,भिवंडी ग्रामीण तालुका उपाध्यक्ष केशव पारधी, कातकरी घटक प्रमुख गुरुनाथ वाघे,भिवंडी शहर उपप्रमुख महेंद्र निरगुडा, युवक उपप्रमुख किशोर हुमणे आदी कार्यकर्ते  उपस्थित होते.या घटनेप्रकरणी मालक निलेश तांगडी याच्या विरोधात तालुका पोलिस ठाण्यात बंधबिगार पद्धती (उच्चाटन )अधिनियम 1976 कलम 15 , 16 , 17 , 18 व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अधिनियम 1989  कलम 3(1)(एच ) व 6 या कायद्यान्वये फौजदारी गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा अधिक तपास गणेशपुरी पोलिस उपविभागीय अधिकारी दिलीप गोडबोले करीत आहेत.

टॅग्स :bhiwandiभिवंडी