शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

भिवंडीतील टोलनाके बनले दादागिरीचे अड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 23:55 IST

भिवंडीत मुंबई-नाशिक महामार्गावर पडघा टोलनाका, भिवंडी-कल्याण मार्गावर

नितीन पंडित, भिवंडीवंडी शहर व ग्रामीण भागात व्यापार, व्यवसाय व गोदामपट्टा विकसित झाला असल्याने या ठिकाणी ट्रान्सपोर्ट व्यवसाय मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. अवजड वाहनांची वर्दळ नेहमीच सुरू असते. याच बाबींचा विचार करून इतर शहरांतून तसेच राज्यातून भिवंडीत दाखल होणाऱ्या सर्वच मार्गावर शासनाने टोलनाके बसवले आहेत. एकट्या भिवंडी तालुक्याचा विचार केला तर पाच टोलनाके भिवंडीत आहेत. मात्र, येथील रस्त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. या टोलनाक्यांवर टोलवसुली मात्र जोरात नव्हे तर सक्तीने सुरू असते, त्यामुळे भिवंडीतील हे टोलनाके दादागिरीचे अड्डे बनले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

भिवंडीत मुंबई-नाशिक महामार्गावर पडघा टोलनाका, भिवंडी-कल्याण मार्गावर कोन-गोवा टोलनाका, भिवंडी-वसई मार्गावर मालोडी टोलनाका, भिवंडी-ठाणे मार्गावर कशेळी टोलनाका तसेच भिवंडी-वाडा महामार्गावर कवाड येथे टोलनाका आहे. सध्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे होणाºया अपघातांमुळे नागरिकांच्या आंदोलनानंतर कवाड टोलनाका बंद आहे. मात्र, इतर चारही टोलनाके दिवसरात्र सुरूच आहेत. या टोलनाक्यांवरून दिवसरात्र मोठ्या प्रमाणात टोलवसुली केली जाते. ही टोलवसुली रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी आहे की वैयक्तिक फायद्यासाठी, याची जाणीव बहुधा टोलनाक्यावरील टोलवसुली करणाºया कर्मचाऱ्यांना नसावी. त्यामुळे त्यांच्याकडून टोलवसुली सक्तीने केली जात आहे. त्यामुळे या टोल कर्मचाºयांना शिष्टाचाराची शिकवण देण्याची गरज आहे. कारण, या टोल कर्मचाºयांकडून अनेक वेळा सक्तीने टोलवसुली करताना वादविवाद झाल्याच्या अनेक घटना येथील सर्वच टोलनाक्यांवर घडत आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघा टोलनाक्यावर वाहतूककोंडी झाली असताना या वाहतूककोंडीत रुग्णवाहिका अडकली होती. त्यावेळी या रुग्णवाहिकेला रस्ता करून द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी बाळासाहेब निंबाळकर यांनी केली असता मुजोर टोल कर्मचाºयांनी धक्काबुक्की केली. निंबाळकर हे शनिवारी आपल्या कुटुंबासह शिर्डीसाठी निघाले होते. त्यांना झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेने टोल कर्मचाºयांच्या मुजोरीचे दर्शन सर्वांना घडले. विशेष म्हणजे पडघा टोलनाक्यावर वाहनचालकांशी टोल कर्मचाºयांच्या धक्काबुक्कीची घटना ही काही नवी नाही. यापूर्वी याच टोलनाक्यावर टोलवसुलीवरून थेट हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. टोलकंपनीचे मालक मुद्दाम आपल्या टोलनाक्यांवर अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना टोलवसुलीसाठी ठेवतात, असा आरोप आहे. एखाद्या वाहनचालकाने काही कारणास्तव टोल देण्यास असमर्थता दर्शविली की, हे टोल कर्मचारी थेट मारहाणच करतात. याची प्रचीती या मार्गावरून प्रवास करीत असलेल्या सर्वच प्रवाशांना आल्याशिवाय राहणार नाही. एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांशी जर हे टोल कर्मचारी धक्काबुक्कीचे वर्तन करीत असतील, तर सामान्य वाहनचालकांचे काय, असा सवाल उपस्थित होतो. त्यामुळे वाहनचालकांशी मुजोरीने वागणाºया व दादागिरीने टोल वसूल करणाºया मुजोर टोल कर्मचाºयांवर पोलिसांतर्फे कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे, जेणेकरून या दादागिरीला कुठेतरी आवर घातला जाईल. टोलनाक्यावर टोलवसुलीचे काम करणे म्हणजे आपल्या खासगी मालमतेची वसुली करीत आहोत, असे नसून आपण या टोलनाक्यावर पगारावर काम करणारे नोकर आहोत, मारहाण करणारे ‘दादा’ नाहीत, याची जाण टोलवसुलीचे काम करणाºया प्रत्येक कर्मचाºयांनी ठेवणे गरजेचे आहे. किंबहुना, तशी जाण पोलीस प्रशासन व संबंधित अधिकाºयांनी करून देणे गरजेचे आहे. अन्यथा, सक्तीच्या टोलवसुलीदरम्यान झालेल्या वादातून एखाद्याला आपल्या जीवाला गमवावा लागेल. त्यामुळे टोलनाक्यांवरील दादागिरी वेळीच थांबविणे काळाची गरज आहे.भिवंडी हा व्यापारी भाग असून गोदामपट्टा आहे. त्यामुळे या परिसरात पाच टोलनाके येतात. या टोलनाक्यांवरील कर्मचाºयांच्या दादागिरीचा अनुभव सर्वसामान्यांना अनेकदा येतो. टोलनाके कंत्राटदारांकडून रस्त्याची देखभाल फारशी होत नसल्याने अनेकदा टोल देण्यास लोक विरोध करतात. नेमकी हीच संधी साधून त्यांना दमदाटी केली जाते व वेळप्रसंगी मारहाण केली जाते.

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणे