शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
7
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
8
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
9
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
10
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
11
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
12
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
13
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
14
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
15
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
16
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
17
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
18
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
19
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
20
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

भिवंडी महानगरपालिकेचं स्वच्छ भारत अभियान कागदावरच; मुख्य आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 17:35 IST

Bhiwandi Municipal Corporation : मुख्य आरोग्य अधिकारी हेमंत गुळवी यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही.

नितिन पंडीत 

भिवंडी - शहर स्वच्छतेबाबत नेहमीच उदासीन असलेल्या भिवंडी महापालिकेची स्वच्छ भारत मोहीम फक्त कागदावरच राबविली जात असल्याचा आरोप मनपाच्या स्थायी समितीचे सदस्य तथा काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक अरुण राऊत यांनी केला असून यास जबाबदार असणाऱ्या मनपाच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी राऊत यांनी मनपा आयुक्त डॉ पंकज आशिया यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. नगरसेवकांच्या या मागणी व आरोपामुळे शहर महानगरपालिकेच्या स्वच्छता मोहिमेचा बोजवारा चव्हाट्यावर आला आला आहे. 

भिवंडी निजामपूर शहर महानगर पालिकेत मुख्य आरोग्य अधिकारी म्हणून हेमंत गुळवी कार्यभार सांभाळत आहेत मात्र त्यांच्या कामात हलगर्जीपणा असल्याल्यामुळेच शहारत स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचा आरोप नगरसेवक अरुण राऊत यांनी लेखी निवेदनाद्वारे केला आहे. जून महिना जवळ आला तरी शहरातील नाले सफाईचे काम आजपर्यंत पूर्ण झाले नाही या कामाकडे मनपाचे मुख्य आरोग्य अधिकारी गुळवी यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचा आरोप देखील राऊतांनी केला असून पावसाळ्यात नालेसफाई अभावी शहरात ठिकठिकाणी पाणी तुंबल्यास त्यास जबाबदार कोण असा सवाल देखील त्यांना आयुक्तांना विचारला आहे. 

२५ डिसेंबर २०२० रोजी महापालिकेकडून एसटी स्टँड ते गायत्रीनगर भागात स्वच्छ भारत अभियान मोहीम राबविण्यात आली होती यावेळी मनपा अधिकाऱ्यांसह आपण स्वतः या ठिकाणी हजर होतो त्यावेळी स्वछता मोहीम फक्त नावापुरता करण्यात आली असून आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मोहीम न राबविता फक्त फोटो काढण्यात आले व फक्त कागदावरच स्वच्छ भारत अभियान मोहीम राबविण्यात आला असून मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारे वेळोवेळी केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मोहिमेची खिल्ली मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांकडून केली जात असून ओला कचरा व सुका कचरा याचे वर्गीकरण करून तसेच कॉम्पॅक्ट मशिन बंदीस्त कचरा वाहतूक करणे महापालिकांना अनिवार्य असल्याचे निर्देश खुद्द सर्वोच्च न्यायालयाने दिलेले असतांनाही शहरात सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांची देखील पायमल्ली होत असून त्यास मनपाचे मुख्य आरोग्य अधिकारी जबाबदार असून अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांकडून सर्वोच्च न्यायालयाचा देखील अवमान होत आहे. 

आपण वेळोवेळी त्याची तक्रार देखील मनपा प्रशासनाकडे केली आहे मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप राऊत यांनी आयुक्तांना दिलेल्या लेखी निवेदनात केला आहे. त्यामुळे अशा प्रकारे बेजाबदारीने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे मनपा प्रशासन विनाकारण बदनाम होत असून त्यास मनपाचे मुख्य आरोग्य अधिकारी हेमंत गुळवी हेच जबाबदार असून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी व त्यांची बदली इतरत्र करावी अशी लेखी मागणी काँग्रेस नगरसेवक अरुण राऊत यांनी मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केले आहे. आता मनपा आयुक्त या विषयाची नेमकी कशी दाखल घेतील याकडे नगरसेवक राऊत यांचे लक्ष लागले आहे.  

दरम्यान यासंदर्भात मुख्य आरोग्य अधिकारी हेमंत गुळवी यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही. तर मनपाच्या आरोग्य विभागात अतिशय गलथान कारभार सुरू असून मनपा आयुक्तांचे आरोग्य अधिकाऱ्यांवर कोणतेही वाचक नसल्याने शहरात कचरा तसेच नालेसफाईची समस्यां मोठ्या प्रमाणात निर्माण झाली असल्याने त्यास मुख्य आरोग्य अधिकारी हेमंत गुळवी हेच जबाबदार असून लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करून त्यांची बदली इतरत्र करण्याची मागणी मी येत्या महासभेत उचलून धरणार आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस नगरसेवक अरुण राऊत यांनी दिली आहे. 

टॅग्स :Bhiwandiभिवंडी