शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

भिवंडी महापालिकेला विरोधी पक्षनेताच नाही; दालन देखील दीड वर्षांपासून बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2021 21:45 IST

अडीच वर्षांच्या मुदतीनंतर झालेल्या महापौर निवडणुकीत महापालिकेत कोणार्क विकास आघाडीची सत्ता आली.

- नितिन पंडीत 

भिवंडी- भिवंडी महापालिकेत विरोधी पक्षनेत्यांची नेमणूक केली नसल्याने विरोधी पक्षनेता पद मागील अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. महापालिकेला विरोधी पक्षनेता नसलेली महापालिका म्हणून भिवंडी महापालिका ठाणे जिल्ह्यातील किमान एकमेव महापालिका ठरली आहे . अवघ्या चार नगरसेवक असलेल्या कोणार्क विकास आघाडीकडे सत्तेच्या चाव्या आल्या पासून महापालिकेतील विरोधी पक्षाची नेमणूक करतांना कोणार्क विकास आघाडीकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. सुरुवातीला मनपाचे विरोधी पक्षनेते पद भाजप कडे होते. 

अडीच वर्षांच्या मुदतीनंतर झालेल्या महापौर निवडणुकीत महापालिकेत कोणार्क विकास आघाडीची सत्ता आली. ९० नगरसेवक संख्या असलेल्या भिवंडी महापालिकेत एकट्या काँग्रेसचे ४७ नगरसेवक होते , मात्र त्यातील १८ नगरसेवकांनी कोणार्कला साथ दिल्याने या १८ नगरसेवकांवर काँग्रेसने कारवाई करत निलंबनाची मागणी केली त्यासंदर्भातील खटला सध्या कोकण आयुक्तांकडे सुरूच आहे. दरम्यान या १८ नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्या नंतर विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादीकडे सोपविण्यात आले होते. 

राष्ट्रवादीचे नगरसेवक झालेले खान मतलूब सरदार यांच्याकडे विरोधी पक्षनेते पद सोपविण्यात आले होते , त्यास काँग्रेसचे माजी महापौर जावेद दळवी यांनी आक्षेप घेत नगरविकास मंत्री तथा पल्सकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सरदार यांच्याविरोधी तक्रार केली . त्यानंतर तत्कालीन आयुक्तांनी सरदार यांची विरोधी पक्षाची नियुक्ती रद्द केली व कार्यालय देखील सील केले. मागील दिड ते दोन वर्षांपासून मनपात विरोधी पक्षनेताच नाही . ज्याचा पद्धतशीर फायदा सत्ताधारी कोणार्क विकास आघाडी घेत आहे. विशेष म्हणजे राजकारण्यांच्या महापालिकेतील राजकीय खिचडीचा परिणाम शहर विकासावर होत आहे . एककेंद्री सत्ता असल्याने पालिकेत मनमानी कारभार चालत असल्याचा आरोप सुज्ञ नागरिक करत आहेत.   

भिवंडी महापालिकेत विरोधी पक्षनेता नसल्याने महापालिकेत हिटलरशाही सुरु असून हम करे सो कायदा अशा प्रकारची मनमानी महापालिकेत सुरु आहे ज्याचा परिणाम शहर विकासावर होत असून सध्या विकास करण्यापेक्षा कंत्राटदारांचे राज्य महापालिकेत आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नगरसेवक अरुण राऊत यांनी दिली आहे. माझ्या माहितीप्रमाणे विरोधी पक्षनेतेपदावरून नगरसेवकांमध्ये राजकीय वाद सुरु असून विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार महापौरांना आहे अशी प्रतिक्रिया भिवंडी मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली आहे . 

टॅग्स :Bhiwandiभिवंडीthaneठाणे