शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी महापालिकेला विरोधी पक्षनेताच नाही; दालन देखील दीड वर्षांपासून बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2021 21:45 IST

अडीच वर्षांच्या मुदतीनंतर झालेल्या महापौर निवडणुकीत महापालिकेत कोणार्क विकास आघाडीची सत्ता आली.

- नितिन पंडीत 

भिवंडी- भिवंडी महापालिकेत विरोधी पक्षनेत्यांची नेमणूक केली नसल्याने विरोधी पक्षनेता पद मागील अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. महापालिकेला विरोधी पक्षनेता नसलेली महापालिका म्हणून भिवंडी महापालिका ठाणे जिल्ह्यातील किमान एकमेव महापालिका ठरली आहे . अवघ्या चार नगरसेवक असलेल्या कोणार्क विकास आघाडीकडे सत्तेच्या चाव्या आल्या पासून महापालिकेतील विरोधी पक्षाची नेमणूक करतांना कोणार्क विकास आघाडीकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. सुरुवातीला मनपाचे विरोधी पक्षनेते पद भाजप कडे होते. 

अडीच वर्षांच्या मुदतीनंतर झालेल्या महापौर निवडणुकीत महापालिकेत कोणार्क विकास आघाडीची सत्ता आली. ९० नगरसेवक संख्या असलेल्या भिवंडी महापालिकेत एकट्या काँग्रेसचे ४७ नगरसेवक होते , मात्र त्यातील १८ नगरसेवकांनी कोणार्कला साथ दिल्याने या १८ नगरसेवकांवर काँग्रेसने कारवाई करत निलंबनाची मागणी केली त्यासंदर्भातील खटला सध्या कोकण आयुक्तांकडे सुरूच आहे. दरम्यान या १८ नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्या नंतर विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादीकडे सोपविण्यात आले होते. 

राष्ट्रवादीचे नगरसेवक झालेले खान मतलूब सरदार यांच्याकडे विरोधी पक्षनेते पद सोपविण्यात आले होते , त्यास काँग्रेसचे माजी महापौर जावेद दळवी यांनी आक्षेप घेत नगरविकास मंत्री तथा पल्सकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सरदार यांच्याविरोधी तक्रार केली . त्यानंतर तत्कालीन आयुक्तांनी सरदार यांची विरोधी पक्षाची नियुक्ती रद्द केली व कार्यालय देखील सील केले. मागील दिड ते दोन वर्षांपासून मनपात विरोधी पक्षनेताच नाही . ज्याचा पद्धतशीर फायदा सत्ताधारी कोणार्क विकास आघाडी घेत आहे. विशेष म्हणजे राजकारण्यांच्या महापालिकेतील राजकीय खिचडीचा परिणाम शहर विकासावर होत आहे . एककेंद्री सत्ता असल्याने पालिकेत मनमानी कारभार चालत असल्याचा आरोप सुज्ञ नागरिक करत आहेत.   

भिवंडी महापालिकेत विरोधी पक्षनेता नसल्याने महापालिकेत हिटलरशाही सुरु असून हम करे सो कायदा अशा प्रकारची मनमानी महापालिकेत सुरु आहे ज्याचा परिणाम शहर विकासावर होत असून सध्या विकास करण्यापेक्षा कंत्राटदारांचे राज्य महापालिकेत आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नगरसेवक अरुण राऊत यांनी दिली आहे. माझ्या माहितीप्रमाणे विरोधी पक्षनेतेपदावरून नगरसेवकांमध्ये राजकीय वाद सुरु असून विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार महापौरांना आहे अशी प्रतिक्रिया भिवंडी मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली आहे . 

टॅग्स :Bhiwandiभिवंडीthaneठाणे