शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

भिवंडी महापालिकेमध्ये स्ट्रक्चरल ऑडिटरच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 23:50 IST

धोकादायक इमारती : अनुभव नसलेल्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

नितीन पंडित  भिवंडी : भिवंडी महापालिका हद्दीत धामणकर नाका परिसरात जिलानी इमारत कोसळल्याची घटना घडल्यानंतर शहरातील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींचा मुद्दा चव्हाट्यावर आला. वारंवार घडणाऱ्या या दुर्घटनांमुळे शहरातील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, असे सरकारी आदेश असतानाही महापालिकेत स्ट्रक्चरल ऑडिटर यांची नेमणूकच झालेली नसल्याची बाब समोर आली आहे. आयुक्तांनी जे आर्किटेक्ट नेमले आहेत त्यांना अनुभव नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे.

भिवंडी महापालिका क्षेत्रात धोकादायक व अतिधोकादायक अशा एकूण ८९१ इमारती आहेत, तर ३० वर्षांवरील इमारतींची संख्या हजारोंच्या घरात आहे. परंतु या सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी सरकारने प्रायोगिक तत्त्वावर पाच नोंदणीकृत बांधकाम अभियंता (स्ट्रक्चरल इंजिनिअर)यांची नेमणूक करा, असे निर्देश सरकार, न्यायालयाने दिल्यानंतरही महापालिका प्रशासनाने तज्ज्ञांची नियुक्ती केलेली नाही. परिणामी शहरातील अनेक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करताना अडचणी येत आहेत. भविष्यात जर जिलानी इमारतीसारखी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.          

मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी शहरातील २७ आर्किटेक्ट यांना स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश दिले आहेत. त्यांच्यासोबत नगररचना विभागातील अधिकारी व प्रभाग अधिकाऱ्यांनी तपासणी करून वर्गवारी करून प्रमाणपत्र देण्याचे नमूद केले आहे. त्यासाठी बीट निरीक्षक, बीट मुकादम परिसरातील इमारतींची पाहणी करून नोंदवहीत नोंद केल्यावर त्यावर शहानिशा करण्यासाठी अधिकारी नियुक्त करायचा आहे. सध्या प्रशासनाने नेमलेले २७ आर्किटेक्ट अशा इमारतींच्या सर्वेक्षणाबाबत माहिती नसल्याने त्यांच्या नियुक्तींवर अनेक नगरसेवकांसह नागरिकांनीही सवाल उपस्थित केला आहे. धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची वर्गवारी करून इमारतींचे पुर्ननिरीक्षण नोंदणीकृत बांधकाम अभियंता यांनी तपासणी अहवाल देणे बंधनकारक आहे. धोकादायक व मोडकळीस आलेल्या इमारती धोकादायक जाहीर करण्याची जबाबदारी प्रभाग समिती सहायक आयुक्त यांची असल्याचे आदेशात स्पष्ट केले आहे. 

पाच कनिष्ठ अभियंत्यांच्या नेमणुकीची मागणीसामाजिक कार्यकर्ते जाहिद मुख्तार शेख यांनी बेकायदा बांधकामासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या अंतिम निकालात अधिकारी व सहायक आयुक्त यांच्याकडून शहरातील ३० वर्षे जुन्या इमारतींची वर्गवारी करून घेणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार तातडीने त्यांच्याकडील हे काम काढून घेऊन सरकारी आदेशानुसार पाच कनिष्ठ अभियंता याकामी नियुक्त करावेत अशी मागणीही शेख यांनी केली आहे. यासंदर्भात आयुक्त डॉ. पंकज आशिया यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो ऊ शकला नाही तर महापालिकेत सध्या स्ट्रक्चरल ऑडिटराची नेमणूक केलेली नाही, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले यांनी दिली आहे.

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडी