शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

भिवंडी मनपातील कंत्राटी कामगार वेतनापासून वंचित, आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 16:27 IST

भिवंडी महानगर पालिकेत पाणीपुरवठा विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना जून आणि जुलै या दोन महिन्याचा पगार मिळालेला नाही.

रोहिदास पाटील

अनगाव - भिवंडी महानगर पालिकेत पाणीपुरवठा विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना जून आणि जुलै या दोन महिन्याचा पगार मिळालेला नाही. कामगारांना तत्काळ पगार न दिल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा श्रमजीवी कामगार संघटनेच्या वतीने भिवंडी मनपा आयुक्त अशोक रणखांब यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. 

गेल्या पंधरा वर्षांपासून मनपाच्या पाणीपुरवठा विभागात बोरवेल पाइपलाईन निगा दूरूस्ती व वॉलमनच काम करणाऱ्या कामगारांना किमान वेतनानूसार वेतन मिळावे म्हणून आंदोलने केल्यानंतर जूलै महिन्यात किमान वेतन मंजूर करण्यात आलं. कामगारांना किमान वेतनानूसार वेतनासह इतर सूविधा मिळाव्यात याकरिता 21 जूनला तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे यांच्यासोबत श्रमजीवी संघटनेच्या शिष्ठमंडळासोबत बैठक झाली. त्यावेळी कामगारांना किमान वेतन ओळखपत्रासह इतर सोयीसूविधा देण्याच्या सूचना आयूक्त मनोहर हिरे यांनी पाणीपूरवठा विभागाचे अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर ही सुविधा न मिळाल्याने पुन्हा मनपा आयुक्तांना लेखी निवेदन दिल्यानंतर आयूक्त अशोक रणखांब यांच्या सोबत ऑगस्टला पालिका सभागृहात शिष्टमंडळासोबत बैठक घेण्यात आली.

जुलै महिन्यांचा पगार व वॉलमनमध्ये काम करणाऱ्या कामगारांना कमी नकरता कामगारांना किमान वेतनानूसार त्यांचे वेतन आरटीजीस करून इतर सुविधा देण्याच्या सूचना पालिका आयुक्त अशोक रणखांब यांनी पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता गायकवाड शाखा अभियंता संदिप पटनावर यांना दिले. मात्र आयुक्तांनी दिलेल्या आदेशाची पूर्तता संबंधीत अधिकाऱ्यांनी आजपर्यंत केलेली नाही. वॉलमनच काम करणाऱ्या काही कंत्राटी कामगारांना जूनचा पगार मिळालेला नाहीच. त्यांना व पाइपलाईन दूरूस्तीच काम करणाऱ्या कामगारांनाही जुलै महिन्याचा पगार मिळालेला नाही यासंबधी अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. मात्र त्यानंतरही कामगारांचा जुलै महिन्याचा पगार मिळाला नसल्याने कामगारांना किमान वेतनानूसार वेतन मिळावे व संघटनेच्या कोणत्याही सभासद कामगाराला कमी न करता नवीन ठेक्यामध्ये प्राधान्याने समाविष्ट करून घ्यावे तसे न केल्यास गणपती उत्सवापूर्वीच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे उपाध्यक्ष दत्तात्रेय कोलेकर, ठाणे जिल्हा अध्यक्ष अशोक सापटे, श्रमजीवी कामगार संघटनेचे भिवंडी तालुका अध्यक्ष अ‍ॅड रोहिदास पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. गणेशोत्सव जवळ आला आहे. कामगारांकडे गणपतीची स्थापना करण्यात येते. मात्र पगारच मिळालेला नाही. ठेकेदार अधिकारी पगार देण्यास टाळाटाळ करत असल्याने कामगार आर्थिक अडचणीत सापडले आहेत.  

 

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणे