शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीची निवडणूक लांबणीवर?

By admin | Updated: April 18, 2017 06:38 IST

भिवंडी-निजामपूरच्या मतदारयाद्यांत २५ टक्के नावे बोगस असल्याचा आणि सुमारे ५० हजार नावे दुसऱ्यांदा आल्याचा मुद्दा उपस्थित करणारी नवी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे

भिवंडी : भिवंडी-निजामपूरच्या मतदारयाद्यांत २५ टक्के नावे बोगस असल्याचा आणि सुमारे ५० हजार नावे दुसऱ्यांदा आल्याचा मुद्दा उपस्थित करणारी नवी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. आधीच दोन प्रभागांतील बोगस आणि दुबार नावांबद्दल याचिका दाखल झाल्या आहेत. या सर्व याचिकांवर शुक्रवारी, २१ एप्रिलला सुनावणी होणार आहे. त्यामुळे मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यास आयोगाने मनाई केल्याने भिवंडीच्या निवडणुका लांबणीवर गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भिवंडीसोबतच मालेगाव आणि पनवेलच्या निवडणुकांचा कार्यक्रमही लांबणीवर गेला आहे. मतदारयाद्या अद्ययावत झाल्यावर निवडणूक प्रक्रिया घोषित होईल आणि निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यावर ४० दिवसांत मतदान होईल. त्यासाठी या आठवड्यात कार्यक्रम जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र याचिकांची सुनावणी पुढे गेल्याने निवडणूक प्रक्रिया लांबल्याचे मानले जाते. मे महिन्यात निवडणूक होऊ नये अशी भिवंडीतील बहुतेक सर्व राजकीय पक्षांची इच्छा होती. याद्यांतील घोळामुळे ती पूर्ण होईल, असे मानले जाते. महापालिकेच्या निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या मतदारयादीत बोगस नावे आहेत आणि काही नावे दुसऱ्यांदा (दुबार) घुसविल्याने प्रभाग क्र. १७ आणि १८ मधून याचिका दाखल झाल्या आहेत. त्यांची सुनावणी सोमवारी होती. त्याचवेळी भिवंडी डेव्हलपमेंट फ्रन्टचे निमंत्रक फाजील अन्सारी यांनी सर्व मतदारसंघांतील बोगस नावांविरूध्द याचिका दाखल केली आहे.मतदारयादीतील घोळाविरोधात संजय काबूकर व सिध्देश्वर कामूर्ती यांची याचिका आणि फ्रन्टच्या याचिकेवर शुक्रवारी एकत्रित सुनावणी होणार आहे.पुणे येथील एका एजन्सीकडून मतदारयाद्यांची तपासणी करण्यात आली होती. ९० वॉर्ड असलेल्या २३ प्रभागात ५०,९२२ मतदारांची नावे दुसऱ्यांदा आली आहेत आणि संपूर्ण पालिका क्षेत्रात सुमारे २५ टक्के नावे बोगस आहेत, असा दावा फ्रन्टने केला. याचा फटका प्रामाणिकपणे निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराला बसेल, असे त्यांचे म्हणणे आहे. पालिकेचा निवडणूक विभाग, जिल्हा व राज्य निवडणूक विभागाने याची दखल न घेतल्याने न्यायालयात दाद मागितल्याची माहिती अन्सारी यांनी दिली.याचवेळी कामतघर भागातील इच्छुक उमेदवाराला लाभ होईल अशा पद्धतीने मतदारांची नावे त्यांच्या यादीत टाकण्यात आल्याचा आरोपही करण्यात आल्याने ेयादीतील घोळाचा तिढा वाढला आहे. निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या सीमारेषेचा पालिकेच्या निवडणूक विभागातील कर्मचाऱ्यांनी कामतघरमध्ये भंग केल्याचा आरोप भाजपाचे प्रदेश सदस्य श्याम अग्रवाल यांनी केला व संबंधित कार्यालयीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन पालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. योगेश म्हसे यांना दिले. निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या सीमारेषेप्रमाणे कामतघरमधील प्रभाग क्र. २२ व २३ च्या मतदारयादीत मतदारांची नावे समाविष्ट करावी, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)