शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

भिवंडीची निवडणूक लांबणीवर?

By admin | Updated: April 18, 2017 06:38 IST

भिवंडी-निजामपूरच्या मतदारयाद्यांत २५ टक्के नावे बोगस असल्याचा आणि सुमारे ५० हजार नावे दुसऱ्यांदा आल्याचा मुद्दा उपस्थित करणारी नवी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे

भिवंडी : भिवंडी-निजामपूरच्या मतदारयाद्यांत २५ टक्के नावे बोगस असल्याचा आणि सुमारे ५० हजार नावे दुसऱ्यांदा आल्याचा मुद्दा उपस्थित करणारी नवी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. आधीच दोन प्रभागांतील बोगस आणि दुबार नावांबद्दल याचिका दाखल झाल्या आहेत. या सर्व याचिकांवर शुक्रवारी, २१ एप्रिलला सुनावणी होणार आहे. त्यामुळे मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यास आयोगाने मनाई केल्याने भिवंडीच्या निवडणुका लांबणीवर गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भिवंडीसोबतच मालेगाव आणि पनवेलच्या निवडणुकांचा कार्यक्रमही लांबणीवर गेला आहे. मतदारयाद्या अद्ययावत झाल्यावर निवडणूक प्रक्रिया घोषित होईल आणि निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यावर ४० दिवसांत मतदान होईल. त्यासाठी या आठवड्यात कार्यक्रम जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र याचिकांची सुनावणी पुढे गेल्याने निवडणूक प्रक्रिया लांबल्याचे मानले जाते. मे महिन्यात निवडणूक होऊ नये अशी भिवंडीतील बहुतेक सर्व राजकीय पक्षांची इच्छा होती. याद्यांतील घोळामुळे ती पूर्ण होईल, असे मानले जाते. महापालिकेच्या निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या मतदारयादीत बोगस नावे आहेत आणि काही नावे दुसऱ्यांदा (दुबार) घुसविल्याने प्रभाग क्र. १७ आणि १८ मधून याचिका दाखल झाल्या आहेत. त्यांची सुनावणी सोमवारी होती. त्याचवेळी भिवंडी डेव्हलपमेंट फ्रन्टचे निमंत्रक फाजील अन्सारी यांनी सर्व मतदारसंघांतील बोगस नावांविरूध्द याचिका दाखल केली आहे.मतदारयादीतील घोळाविरोधात संजय काबूकर व सिध्देश्वर कामूर्ती यांची याचिका आणि फ्रन्टच्या याचिकेवर शुक्रवारी एकत्रित सुनावणी होणार आहे.पुणे येथील एका एजन्सीकडून मतदारयाद्यांची तपासणी करण्यात आली होती. ९० वॉर्ड असलेल्या २३ प्रभागात ५०,९२२ मतदारांची नावे दुसऱ्यांदा आली आहेत आणि संपूर्ण पालिका क्षेत्रात सुमारे २५ टक्के नावे बोगस आहेत, असा दावा फ्रन्टने केला. याचा फटका प्रामाणिकपणे निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराला बसेल, असे त्यांचे म्हणणे आहे. पालिकेचा निवडणूक विभाग, जिल्हा व राज्य निवडणूक विभागाने याची दखल न घेतल्याने न्यायालयात दाद मागितल्याची माहिती अन्सारी यांनी दिली.याचवेळी कामतघर भागातील इच्छुक उमेदवाराला लाभ होईल अशा पद्धतीने मतदारांची नावे त्यांच्या यादीत टाकण्यात आल्याचा आरोपही करण्यात आल्याने ेयादीतील घोळाचा तिढा वाढला आहे. निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या सीमारेषेचा पालिकेच्या निवडणूक विभागातील कर्मचाऱ्यांनी कामतघरमध्ये भंग केल्याचा आरोप भाजपाचे प्रदेश सदस्य श्याम अग्रवाल यांनी केला व संबंधित कार्यालयीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन पालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. योगेश म्हसे यांना दिले. निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या सीमारेषेप्रमाणे कामतघरमधील प्रभाग क्र. २२ व २३ च्या मतदारयादीत मतदारांची नावे समाविष्ट करावी, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)