शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

भाईंदरच्या  १० मच्छिमार बोटी किनाऱ्या पासून लांबच; काही बोटींशी संपर्क नाही; कोस्टगार्ड ची घेतली जात आहे मदत 

By धीरज परब | Updated: August 9, 2022 21:32 IST

Bhayander News: वादळी पाऊस व खवळलेल्या समुद्रात भाईंदरच्या उत्तन - चौक भागातील सुमारे १० बोटी अजून किनाऱ्यावर परतल्या नसल्याने कोळीवाड्यात चिंतेचे वातावरण आहे.

मीरारोड - वादळी पाऊस व खवळलेल्या समुद्रात भाईंदरच्या उत्तन - चौक भागातील सुमारे १० बोटी अजून किनाऱ्यावर परतल्या नसल्याने कोळीवाड्यात चिंतेचे वातावरण आहे . तर काही बोटींशी संपर्क होत नाही व काही बोटी परतीच्या वाटेवर आहेत . कोस्टगार्डच्या मदतीने समुद्रात अडकलेल्या बोटींची माहिती घेतली जात आहे . 

वादळी पावसाचा इशारा मिळाल्या नंतर शनिवारीच मच्छीमारांना धोक्याच्या सूचना दिल्या होत्या . परंतु आधीच काही बोटी समुद्रात मासेमारीसाठी गेल्या असल्याने त्या किनाऱ्याकडे परतण्याची प्रतीक्षा मच्छीमार करत होते . बोटीवर गेलेल्या मच्छीमारांच्या कुटुंबातील महिलांनी आज मंगळवारी मच्छिमार संस्थांच्या कार्यालयात गर्दी केली. समुद्रात असलेल्या नाखवांचा संपर्क होत नसल्याने कोळी महिलांनी चिंता व्यक्त करत होत्या.   

त्यामुळे मच्छीमार संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी समुद्रातुन परत न आलेल्या बोटीची माहिती घेण्यास सुरवात केली . उत्तन मच्छीमार सहकारी संस्थेच्या एकूण ५ बोटी, डोंगरी चौक सोसायटी च्या १६ व पाली उत्तन मच्छीमार सोसायटी ची १ अश्या एकूण २२ बोटी मंगळवारी दुपार पर्यंत समुद्रात अडकून पडल्या होत्या . त्यातील काही बोटींचा संपर्क होत नव्हता.

या प्रकरणी मत्स्य विभागा सह संबंधित शासकीय यंत्रणांना कळवण्यात आल्या नंतर कोस्टगार्ड ने समुद्रात संकल्प जहाजाच्या माध्यमातून बोटींची शोध मोहीम राबवली . त्यावेळी उत्तन बंदरा पासून खोल समुद्रात काही बोटी आढळून आल्या . सायंकाळी जलधन तर रात्री अब्राहम ह्या बोटी परतल्या . शिवाय डोंगरी - चौकच्या १० बोटी रात्री उशिरा पर्यंत किनाऱ्या जवळ आल्या होत्या . रात्री उशिरा पर्यंत १२ बोटी किनाऱ्याला आल्या होत्या . तर आणखी १० बोटींची प्रतीक्षा होती .  त्यापैकी चौकच्या ६ बोटी समुद्रात जाळे टाकून थांबल्या होत्या त्या बुधवारी परतण्याची शक्यता आहे असे संस्थेच्या विल्यम गोविंद यांच्या कडून सांगण्यात आले.

उत्तन भागातील बोटी समुद्रात अडकल्या असल्याने तातडीने अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती चे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी मत्स्य विभाग, कोसगार्ड आदींना कळवल्यावर कोस्टगार्डने जहाज व हेलिकॉप्टर ने समुद्रात बोटींची शोध मोहीम सुरु केली . काही बोटींशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरु आहे . तर बहुतांश बोटींशी संपर्क झाला असून काही बोटी परतल्या तर काही परतीच्या वाटेवर असल्याचे मच्छिमार नेते बर्नड डिमेलो यांनी सांगितले .  

टॅग्स :bhayandarभाइंदरfishermanमच्छीमार