शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

भाईंदरच्या  १० मच्छिमार बोटी किनाऱ्या पासून लांबच; काही बोटींशी संपर्क नाही; कोस्टगार्ड ची घेतली जात आहे मदत 

By धीरज परब | Updated: August 9, 2022 21:32 IST

Bhayander News: वादळी पाऊस व खवळलेल्या समुद्रात भाईंदरच्या उत्तन - चौक भागातील सुमारे १० बोटी अजून किनाऱ्यावर परतल्या नसल्याने कोळीवाड्यात चिंतेचे वातावरण आहे.

मीरारोड - वादळी पाऊस व खवळलेल्या समुद्रात भाईंदरच्या उत्तन - चौक भागातील सुमारे १० बोटी अजून किनाऱ्यावर परतल्या नसल्याने कोळीवाड्यात चिंतेचे वातावरण आहे . तर काही बोटींशी संपर्क होत नाही व काही बोटी परतीच्या वाटेवर आहेत . कोस्टगार्डच्या मदतीने समुद्रात अडकलेल्या बोटींची माहिती घेतली जात आहे . 

वादळी पावसाचा इशारा मिळाल्या नंतर शनिवारीच मच्छीमारांना धोक्याच्या सूचना दिल्या होत्या . परंतु आधीच काही बोटी समुद्रात मासेमारीसाठी गेल्या असल्याने त्या किनाऱ्याकडे परतण्याची प्रतीक्षा मच्छीमार करत होते . बोटीवर गेलेल्या मच्छीमारांच्या कुटुंबातील महिलांनी आज मंगळवारी मच्छिमार संस्थांच्या कार्यालयात गर्दी केली. समुद्रात असलेल्या नाखवांचा संपर्क होत नसल्याने कोळी महिलांनी चिंता व्यक्त करत होत्या.   

त्यामुळे मच्छीमार संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी समुद्रातुन परत न आलेल्या बोटीची माहिती घेण्यास सुरवात केली . उत्तन मच्छीमार सहकारी संस्थेच्या एकूण ५ बोटी, डोंगरी चौक सोसायटी च्या १६ व पाली उत्तन मच्छीमार सोसायटी ची १ अश्या एकूण २२ बोटी मंगळवारी दुपार पर्यंत समुद्रात अडकून पडल्या होत्या . त्यातील काही बोटींचा संपर्क होत नव्हता.

या प्रकरणी मत्स्य विभागा सह संबंधित शासकीय यंत्रणांना कळवण्यात आल्या नंतर कोस्टगार्ड ने समुद्रात संकल्प जहाजाच्या माध्यमातून बोटींची शोध मोहीम राबवली . त्यावेळी उत्तन बंदरा पासून खोल समुद्रात काही बोटी आढळून आल्या . सायंकाळी जलधन तर रात्री अब्राहम ह्या बोटी परतल्या . शिवाय डोंगरी - चौकच्या १० बोटी रात्री उशिरा पर्यंत किनाऱ्या जवळ आल्या होत्या . रात्री उशिरा पर्यंत १२ बोटी किनाऱ्याला आल्या होत्या . तर आणखी १० बोटींची प्रतीक्षा होती .  त्यापैकी चौकच्या ६ बोटी समुद्रात जाळे टाकून थांबल्या होत्या त्या बुधवारी परतण्याची शक्यता आहे असे संस्थेच्या विल्यम गोविंद यांच्या कडून सांगण्यात आले.

उत्तन भागातील बोटी समुद्रात अडकल्या असल्याने तातडीने अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती चे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी मत्स्य विभाग, कोसगार्ड आदींना कळवल्यावर कोस्टगार्डने जहाज व हेलिकॉप्टर ने समुद्रात बोटींची शोध मोहीम सुरु केली . काही बोटींशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरु आहे . तर बहुतांश बोटींशी संपर्क झाला असून काही बोटी परतल्या तर काही परतीच्या वाटेवर असल्याचे मच्छिमार नेते बर्नड डिमेलो यांनी सांगितले .  

टॅग्स :bhayandarभाइंदरfishermanमच्छीमार