शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

भाईंदरच्या  १० मच्छिमार बोटी किनाऱ्या पासून लांबच; काही बोटींशी संपर्क नाही; कोस्टगार्ड ची घेतली जात आहे मदत 

By धीरज परब | Updated: August 9, 2022 21:32 IST

Bhayander News: वादळी पाऊस व खवळलेल्या समुद्रात भाईंदरच्या उत्तन - चौक भागातील सुमारे १० बोटी अजून किनाऱ्यावर परतल्या नसल्याने कोळीवाड्यात चिंतेचे वातावरण आहे.

मीरारोड - वादळी पाऊस व खवळलेल्या समुद्रात भाईंदरच्या उत्तन - चौक भागातील सुमारे १० बोटी अजून किनाऱ्यावर परतल्या नसल्याने कोळीवाड्यात चिंतेचे वातावरण आहे . तर काही बोटींशी संपर्क होत नाही व काही बोटी परतीच्या वाटेवर आहेत . कोस्टगार्डच्या मदतीने समुद्रात अडकलेल्या बोटींची माहिती घेतली जात आहे . 

वादळी पावसाचा इशारा मिळाल्या नंतर शनिवारीच मच्छीमारांना धोक्याच्या सूचना दिल्या होत्या . परंतु आधीच काही बोटी समुद्रात मासेमारीसाठी गेल्या असल्याने त्या किनाऱ्याकडे परतण्याची प्रतीक्षा मच्छीमार करत होते . बोटीवर गेलेल्या मच्छीमारांच्या कुटुंबातील महिलांनी आज मंगळवारी मच्छिमार संस्थांच्या कार्यालयात गर्दी केली. समुद्रात असलेल्या नाखवांचा संपर्क होत नसल्याने कोळी महिलांनी चिंता व्यक्त करत होत्या.   

त्यामुळे मच्छीमार संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी समुद्रातुन परत न आलेल्या बोटीची माहिती घेण्यास सुरवात केली . उत्तन मच्छीमार सहकारी संस्थेच्या एकूण ५ बोटी, डोंगरी चौक सोसायटी च्या १६ व पाली उत्तन मच्छीमार सोसायटी ची १ अश्या एकूण २२ बोटी मंगळवारी दुपार पर्यंत समुद्रात अडकून पडल्या होत्या . त्यातील काही बोटींचा संपर्क होत नव्हता.

या प्रकरणी मत्स्य विभागा सह संबंधित शासकीय यंत्रणांना कळवण्यात आल्या नंतर कोस्टगार्ड ने समुद्रात संकल्प जहाजाच्या माध्यमातून बोटींची शोध मोहीम राबवली . त्यावेळी उत्तन बंदरा पासून खोल समुद्रात काही बोटी आढळून आल्या . सायंकाळी जलधन तर रात्री अब्राहम ह्या बोटी परतल्या . शिवाय डोंगरी - चौकच्या १० बोटी रात्री उशिरा पर्यंत किनाऱ्या जवळ आल्या होत्या . रात्री उशिरा पर्यंत १२ बोटी किनाऱ्याला आल्या होत्या . तर आणखी १० बोटींची प्रतीक्षा होती .  त्यापैकी चौकच्या ६ बोटी समुद्रात जाळे टाकून थांबल्या होत्या त्या बुधवारी परतण्याची शक्यता आहे असे संस्थेच्या विल्यम गोविंद यांच्या कडून सांगण्यात आले.

उत्तन भागातील बोटी समुद्रात अडकल्या असल्याने तातडीने अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती चे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी मत्स्य विभाग, कोसगार्ड आदींना कळवल्यावर कोस्टगार्डने जहाज व हेलिकॉप्टर ने समुद्रात बोटींची शोध मोहीम सुरु केली . काही बोटींशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरु आहे . तर बहुतांश बोटींशी संपर्क झाला असून काही बोटी परतल्या तर काही परतीच्या वाटेवर असल्याचे मच्छिमार नेते बर्नड डिमेलो यांनी सांगितले .  

टॅग्स :bhayandarभाइंदरfishermanमच्छीमार