शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

भाईंदर रेल्वे स्थानक आणि परिसरातील मुख्य रस्ते फेरीवाल्यांच्या विळख्यात

By धीरज परब | Updated: November 30, 2022 19:17 IST

फेरीवाला पथक प्रमुखांसह संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी  

मीरारोड - भाईंदर रेल्वे स्थानक परिसर व भाईंदर मधील मुख्य वर्दळीचे रस्ते हे फेरीवाले - हातगाडी वाल्यांच्या विळख्यात असून नागरिकांना चालण्यास पदपथ व रस्ते मोकळे राहिलेले नाहीत . यामुळे वाहतूक कोंडी प्रचंड वाढली आहे . त्यामुळे फेरीवाला पथक प्रमुखासह संबंधित प्रभाग अधिकाऱ्यां वर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी होत आहे.  

भाईंदर रेल्वे स्थानकाच्या पूर्व व पश्चिमेला फेरीवाले आणि हातगाडी वाल्यांचा विळखा पडला आहे . त्यामुळे नागरिकांना रेल्वे स्थानक परिसरातून बाहेर पडणे अडचणीचे झाले आहे . फेरीवाल्यां मुळे गर्दी होते . स्टेशन परिसर असल्याने सार्वजनिक बस , रिक्षा , दुचाकी व अन्य वाहनांची मोठी वर्दळ असते . फेरीवाल्यां मुळे परिसर मोकळा नसल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे . रेल्वे स्थानक पासून १५० मीटर परिसरात फेरीवाले - हातगाड्या ना मनाई असताना देखील दिवस रात्र फेरीवाले अतिक्रमण करून असतात. 

तीच गत भाईंदर मधील मुख्य रस्त्यांची झाली आहे . भाईंदर पूर्वेचे स्टेशन मार्ग , बाळाराम पाटील मार्ग , तलाव मार्ग , नवघर मार्ग , इंद्रलोक नाका व मुख्य रस्ता , जेसल पार्क - राहुल पार्क रस्ता व नवघर फाटक मार्ग असे मोजून ६ - ७ रस्ते आहेत . मात्र हे रस्ते , पदपथ व नाके फेरीवाल्यांच्या घश्यात घालण्यात आले आहेत . 

भाईंदर पश्चिमेला तर छत्रपती शिवाजी महाराज मार्ग व डॉ . बाबासाहेब आंबेडकर ६० फूट मार्ग , मॅक्सस परिसर असे मोजून तीन - चार रस्ते त्यावर सुद्धा फेरीवाले - हातगाडीवाल्यानी उच्छाद मांडला आहे . त्यांना बेकायदा वीज पुरवठा होत आहे. भाईंदर मधील पदपथ व रस्ते फेरीवाल्यांच्या विळख्यात असल्याने नागरिकांना नाईलाजाने जीव मुठीत ठेऊन वाहन वर्दळीच्या रस्त्यांवर चालावे लागत आहे. लहान मुलं , विद्यार्थी , वृद्ध , महिला आदींना तर अश्या कोंडीतून मार्ग काढणे जाचक झाले आहे. राजरोस फेरीवाले व हातगाड्या लागत असताना फेरीवाला पथक व प्रभाग समितीचे अधिकारी करतात काय ? असा सवाल लोक करत आहेत . त्यांच्या आर्थिक भ्रष्ट संगनमताशिवाय हे शक्य नसल्याने अश्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे धाडस वरिष्ठ अधिकारी दाखवत नसल्या बद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे .