शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

भवानीनगर पुराच्या पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चिकणघर : कल्याण शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कल्याण-मुरबाड रोडवरील भवानी नगरमध्ये गुरुवारी मध्यरात्री पुराचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चिकणघर : कल्याण शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कल्याण-मुरबाड रोडवरील भवानी नगरमध्ये गुरुवारी मध्यरात्री पुराचे पाणी शिरले. परिणामी अनेक चाळीतील घरांमध्ये पाणी साचल्याने त्यांच्या घरातील सर्व सामान भिजले. पाणी वाढतच असल्यामुळे भीतीने नागरिकांना घराला कुलूप लावून इतरत्र स्थलांतर करावे लागले.

वालधुनी नदीच्या किनारी भवानीनगर वसला असून नदीच्या वर पाणी आले की हा परिसर जलमय होते. त्यामुळे रहिवाशांना घर सोडावे लागते. गुरुवारी मध्यरात्री नंतर २ वाजता पाणी आल्याचे कळताच महिला आणि लहान मुलांच्या आरडाओरडीमुळे रहिवासी जागे झाले. त्यामुळे त्यांनी उंच भागातील आपले नातेवाईक व परिचितांकडे स्थलांतर केले.

येथील फॉरेस्ट सोसायटी, मातृछाया, जयदुर्गे, नागेश्वर, सुदर्शन, भीमकृपा, दित्यशिल्पा, दीपस्तंभ, प्रज्ञाकिरण, योगेश अपार्टमेंट, मयूर सोसायटी, साईनाथ वडेश्वर, आणि त्रिमूर्ती कॉलनी आदी वसाहतींना पुराच्या पाण्याचा तडाखा बसला. नागरिकांचे पहाटेपासून हाल झाले. रुनील उतेकर, गणेश नाईक, विनोद शिरवाडकर, भरत गायकवाड, मोटू जाधव, शंकर जाधव आदी स्थानिक रहिवाशांनी ज्यांच्या घरात पाणी घुसले त्यांच्या सामानासह महिला आणि लहान मुलांना सुरक्षित स्थळी हलविण्यास मदत केली. काही कार्यकर्ते सकाळी बाधितांना वडापाव, चहा, बिस्कीट पुडे वाटप करताना दिसले.

-------------------------------