शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

भवानीनगर पुराच्या पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चिकणघर : कल्याण शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कल्याण-मुरबाड रोडवरील भवानी नगरमध्ये गुरुवारी मध्यरात्री पुराचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चिकणघर : कल्याण शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कल्याण-मुरबाड रोडवरील भवानी नगरमध्ये गुरुवारी मध्यरात्री पुराचे पाणी शिरले. परिणामी अनेक चाळीतील घरांमध्ये पाणी साचल्याने त्यांच्या घरातील सर्व सामान भिजले. पाणी वाढतच असल्यामुळे भीतीने नागरिकांना घराला कुलूप लावून इतरत्र स्थलांतर करावे लागले.

वालधुनी नदीच्या किनारी भवानीनगर वसला असून नदीच्या वर पाणी आले की हा परिसर जलमय होते. त्यामुळे रहिवाशांना घर सोडावे लागते. गुरुवारी मध्यरात्री नंतर २ वाजता पाणी आल्याचे कळताच महिला आणि लहान मुलांच्या आरडाओरडीमुळे रहिवासी जागे झाले. त्यामुळे त्यांनी उंच भागातील आपले नातेवाईक व परिचितांकडे स्थलांतर केले.

येथील फॉरेस्ट सोसायटी, मातृछाया, जयदुर्गे, नागेश्वर, सुदर्शन, भीमकृपा, दित्यशिल्पा, दीपस्तंभ, प्रज्ञाकिरण, योगेश अपार्टमेंट, मयूर सोसायटी, साईनाथ वडेश्वर, आणि त्रिमूर्ती कॉलनी आदी वसाहतींना पुराच्या पाण्याचा तडाखा बसला. नागरिकांचे पहाटेपासून हाल झाले. रुनील उतेकर, गणेश नाईक, विनोद शिरवाडकर, भरत गायकवाड, मोटू जाधव, शंकर जाधव आदी स्थानिक रहिवाशांनी ज्यांच्या घरात पाणी घुसले त्यांच्या सामानासह महिला आणि लहान मुलांना सुरक्षित स्थळी हलविण्यास मदत केली. काही कार्यकर्ते सकाळी बाधितांना वडापाव, चहा, बिस्कीट पुडे वाटप करताना दिसले.

-------------------------------