शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

भातसा धरण भरले ९५ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:49 IST

भातसानगर : शहापूर तालुक्यातील महत्त्वपूर्ण असलेले भातसा धरण भरून वाहण्यासाठी अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यातच विद्युत केंद्रातून विसर्ग ...

भातसानगर : शहापूर तालुक्यातील महत्त्वपूर्ण असलेले भातसा धरण भरून वाहण्यासाठी अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यातच विद्युत केंद्रातून विसर्ग करण्यास सुरुवात केल्याने धरण भरून वाहण्यास वेळ लागणार आहे.

तालुक्यातील तानसा, वैतरणा अप्पर वैतरणा ही धरणे कधीच भरून वाहू लागली असली तरी मुंबईला सर्वात अधिक पाणीपुरवठा करणारे भातसा अजूनही भरले नसल्याने मुंबईकरांसह उपनगर व तालुक्याला मोठी चिंता भेडसावू लागली आहे. आजच्या मितीस धरणाची पाणीपातळी वाढली आहे. ९५.६३ टक्के इतका पाणीसाठा आज झाला आहे. मात्र, विद्युत केंद्रातून १८.७३१ क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला असल्याने धरण भरून वाहण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. मंगळवारी धरणक्षेत्रात १०८.०० मिलीमीटर पाऊस झाला असून आतापर्यंत २२००.०० मिलीमीटर पाऊस झाला आहे. मंगळवारी धरणाची पाणीपातळी १४०.५७ मीटर नाेंदवली गेली असून पूर्ण संचय पातळी १४२.०७ मीटर आहे. ९७६.१० द.ल.घ.मी. क्षमता असलेल्या या धरणात सध्या ९३४.९४६ द.ल.घ.मी. पाणीसाठा झाला आहे. धरणात येणारे नद्यांच्या प्रवाहाच्या दिशेला समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरू असल्याने मातीसह गढूळ पाणी नद्या, ओढ्यांद्वारे धरणात येऊन साठले आहे.