शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

भातसा धरण भरले ९५ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:49 IST

भातसानगर : शहापूर तालुक्यातील महत्त्वपूर्ण असलेले भातसा धरण भरून वाहण्यासाठी अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यातच विद्युत केंद्रातून विसर्ग ...

भातसानगर : शहापूर तालुक्यातील महत्त्वपूर्ण असलेले भातसा धरण भरून वाहण्यासाठी अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यातच विद्युत केंद्रातून विसर्ग करण्यास सुरुवात केल्याने धरण भरून वाहण्यास वेळ लागणार आहे.

तालुक्यातील तानसा, वैतरणा अप्पर वैतरणा ही धरणे कधीच भरून वाहू लागली असली तरी मुंबईला सर्वात अधिक पाणीपुरवठा करणारे भातसा अजूनही भरले नसल्याने मुंबईकरांसह उपनगर व तालुक्याला मोठी चिंता भेडसावू लागली आहे. आजच्या मितीस धरणाची पाणीपातळी वाढली आहे. ९५.६३ टक्के इतका पाणीसाठा आज झाला आहे. मात्र, विद्युत केंद्रातून १८.७३१ क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला असल्याने धरण भरून वाहण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. मंगळवारी धरणक्षेत्रात १०८.०० मिलीमीटर पाऊस झाला असून आतापर्यंत २२००.०० मिलीमीटर पाऊस झाला आहे. मंगळवारी धरणाची पाणीपातळी १४०.५७ मीटर नाेंदवली गेली असून पूर्ण संचय पातळी १४२.०७ मीटर आहे. ९७६.१० द.ल.घ.मी. क्षमता असलेल्या या धरणात सध्या ९३४.९४६ द.ल.घ.मी. पाणीसाठा झाला आहे. धरणात येणारे नद्यांच्या प्रवाहाच्या दिशेला समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरू असल्याने मातीसह गढूळ पाणी नद्या, ओढ्यांद्वारे धरणात येऊन साठले आहे.