शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

भूखंड घोटाळा भाजपाच्या संगनमताने

By admin | Updated: May 9, 2016 01:56 IST

मीरा भाईंदरमधील भूखंडाचे आरक्षण उठवून तो बिल्डरच्या घशात घालण्याचा कट पद्धतशीरपणे रचण्यात आल्याचा आरोप शनिवारी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला

ठाणे : मीरा भाईंदरमधील भूखंडाचे आरक्षण उठवून तो बिल्डरच्या घशात घालण्याचा कट पद्धतशीरपणे रचण्यात आल्याचा आरोप शनिवारी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला. भूखंडाचा वाद ठावूक असूनही मुख्यमंत्री उद््घाटनासाठी तेथे गेले, याचाच अर्थ त्यांचाही या गैरव्यवहाराला पाठिंबा होता, असाच असल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला. हे प्रकरण धसास लावले तर ते भाजपच्या अंगलट येईल, म्हणून ठाण्याच्या जिल्हाधिकारी पदावरून अश्विनी जोशी यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याची तत्काळ उचलबांगडी करण्यात आली. आधी जोशी यांना पाठिंबा देणारे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक या प्रकरणातून काढता पाय का घेतला, असा प्रश्नही त्यांनी केला.मीरा-भाईंदरची राखीव जागा बिल्डरच्या घशात घालण्यासाठी सोयीचे व्हावे, अशा पद्धतीने प्रस्ताव मंजूर झाले. मुख्यमंत्री स्वत: त्या कार्यक्रमाच्या शुभारंभाला गेले. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना कळले, की ती जागा सरकारची आहे. तसा अहवालही त्यांनी दिला. त्यामुळे जोशी यांनी त्या जागेवरील विकासाला स्थगिती दिली होती. जोशी यांची मुदतीपूर्वी बदली झाली आणि लगेचच कोकण आयुक्तांनी स्थगिती उठवली. ती उठवताना त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा तांत्रिक आहे. कोकण आयुक्तांचा निकाल काहीही असू द्या. परंतु तांत्रिक बाजू लक्षात घेऊनच तो देण्यात आलेला आहे, हे समजून घ्यायला हवे. सरकारची ११ एकर जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रकार झाला आहे, असा तपशील त्यांनी दिला. आजतागायत बिल्डरने किंवा ज्यांनी या प्रकरणात सहभाग घेतला त्यांनी या ११ एकरच्या जागेच्या मालकीची खरी कागदपत्रे सादर केलेली नाहीत. त्यामुळे महसूल खात्याने हालचाल करायला हवी होती. ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपली भूमिका प्रामाणिकपणे बजावली. सरकार त्यांच्या पाठीशी उभे राहिले नाही. त्यांची बदली केली. त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा बाजुला ठेवण्यात आला, याकडे लक्ष वेधून सावंत म्हणाले, एखाद्या बिल्डरच्या घशात ती जागा घालण्याचा प्रयत्न केला जाणार असेल, तर त्याला आमचा तीव्र विरोध आहे. सरकारने या प्रकरणाची दखल घेऊन आरक्षण बदलावे. आम्ही कोणताही गैरकारभार खपवून घेणार नाही. जोशींच्या मागे ठामपणे उभे राहू, असे वक्तव्य पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. असे असताना आता त्यांनी अळीमिळी गुपचिळीचे धोरण का स्वीकारले? विरोध का केला नाही. शिवसेनेलाही यातून काही लाभ मिळाला का? कोणी कोणाची तोंडे बंद केली का? या सर्व प्रश्नांची उत्तरे येथील मंत्र्यांनी देणे आवश्यक आहे, अशी मागणी त्यांनी केली. आम्ही वाघ आहोत, अशा डरकाळ््या शिवसेनेचे नेते फोडतात. परंतु हे सर्कशीतले वाघ असल्याची कडवट टीकाही त्यांनी केली. भ्रष्टाचाराच्या सर्व गोष्टींत भाजपा आणि शिवसेना एकमेकांना सोयीची धोरणे घेऊन चालली आहे. शिवसेनेने सत्तेत राहून विरोधकाची भूमिका बजावायची. भाजपावर टीका करायची आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा आला की दोघांनी एकत्र यायचे, असा कारभार सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष मनोज शिंदे, संजय चौपाने उपस्थित होते. (प्रतिनिधी)