शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भार्इंदर, वसई, विरारसाठी पोलीस आयुक्तालय होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 01:57 IST

मीरा भाईंदरपासून पालघरपर्यंत स्वतंत्र पोलीस आयुक्तालय बनवण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी राज्य सरकारने तत्वत: मान्य केली आहे.

शशी करपे वसई : मीरा भाईंदरपासून पालघरपर्यंत स्वतंत्र पोलीस आयुक्तालय बनवण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी राज्य सरकारने तत्वत: मान्य केली आहे. राज्य सरकारने यात थोडी सुधारणा करून मीरा भाईंदर आणि वसई विरारसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय करण्याचा निर्णय जाहिर केला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात मीरा भाईंदर आणि वसई विरारसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापनेस लवकरच मंत्रीमंडळाची मंजूरी लाभेल, अशी माहिती दिली. परिसराची लोकसंख्या ३९ लाख असून ४६ संवेदनशील ठिकाणे आहेत. हे सर्व या पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारित येतील. वसई आणि विरार येथे दोन उपविभागीय कार्यालये असतील. वसई अंतर्गत सहा पोलीस ठाणी आणि तर विरार अंतर्गत सहा पोलीस ठाणी असतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.सरकारने पालघर वगळून मीरा भाईंदर आणि वसई विरारसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय बनवण्याच्या निर्णय घेतला आहे. सध्या मीरा भाईंदर परिसरात काशी मीरा, नवघर, कनकिया (मीरा रोड), भाईंदर, उत्तन अशी पोलीस ठाणी असून एक उपविभागीय पोलीस अधिकारी आहे. याठिकाणी आणखी दोन पोलीस ठाण्यांची भर पडणार आहे. तर वसई विरार परिसरात विरार, नालासोपारा, वसई, माणिकपूर, वालीव, अर्नाळा, तुळींज अशी सात पोलीस ठाणी आहेत. तर विरार, नालासोपारा आणि वसई अशी तीन पोलीस उपअधिक्षक कार्यालये आहेत. याठिकाणी आणखी सहा पोलीस ठाण्यांची भर पडणार आहे. त्यामुळे वसई विरार परिसरात १३ पोलीस ठाणी होतील.