शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

भार्इंदर, वसई, विरारसाठी पोलीस आयुक्तालय होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 01:57 IST

मीरा भाईंदरपासून पालघरपर्यंत स्वतंत्र पोलीस आयुक्तालय बनवण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी राज्य सरकारने तत्वत: मान्य केली आहे.

शशी करपे वसई : मीरा भाईंदरपासून पालघरपर्यंत स्वतंत्र पोलीस आयुक्तालय बनवण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी राज्य सरकारने तत्वत: मान्य केली आहे. राज्य सरकारने यात थोडी सुधारणा करून मीरा भाईंदर आणि वसई विरारसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय करण्याचा निर्णय जाहिर केला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात मीरा भाईंदर आणि वसई विरारसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापनेस लवकरच मंत्रीमंडळाची मंजूरी लाभेल, अशी माहिती दिली. परिसराची लोकसंख्या ३९ लाख असून ४६ संवेदनशील ठिकाणे आहेत. हे सर्व या पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारित येतील. वसई आणि विरार येथे दोन उपविभागीय कार्यालये असतील. वसई अंतर्गत सहा पोलीस ठाणी आणि तर विरार अंतर्गत सहा पोलीस ठाणी असतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.सरकारने पालघर वगळून मीरा भाईंदर आणि वसई विरारसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय बनवण्याच्या निर्णय घेतला आहे. सध्या मीरा भाईंदर परिसरात काशी मीरा, नवघर, कनकिया (मीरा रोड), भाईंदर, उत्तन अशी पोलीस ठाणी असून एक उपविभागीय पोलीस अधिकारी आहे. याठिकाणी आणखी दोन पोलीस ठाण्यांची भर पडणार आहे. तर वसई विरार परिसरात विरार, नालासोपारा, वसई, माणिकपूर, वालीव, अर्नाळा, तुळींज अशी सात पोलीस ठाणी आहेत. तर विरार, नालासोपारा आणि वसई अशी तीन पोलीस उपअधिक्षक कार्यालये आहेत. याठिकाणी आणखी सहा पोलीस ठाण्यांची भर पडणार आहे. त्यामुळे वसई विरार परिसरात १३ पोलीस ठाणी होतील.