शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

भालचंद्र नेमाडे यांचे साहित्य कोणत्याही वादापेक्षा मोठे - जयंत पवार यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 06:08 IST

कोणत्याही साहित्याची केवळ लाट असून चालत नाही. त्यामागे विचार असेल तरच तो लेखक व ते साहित्य टिकते. वरवरची निर्माण होणारी वादग्रस्तता ही माध्यमे तयार करतात. ज्ञानपीठविजेते भालचंद्र नेमाडे यांचे साहित्य समजून न घेता ते काय बोलतात, याचा अर्थ काढून वाद निर्माण केले आहेत.

कल्याण : कोणत्याही साहित्याची केवळ लाट असून चालत नाही. त्यामागे विचार असेल तरच तो लेखक व ते साहित्य टिकते. वरवरची निर्माण होणारी वादग्रस्तता ही माध्यमे तयार करतात. ज्ञानपीठविजेते भालचंद्र नेमाडे यांचे साहित्य समजून न घेता ते काय बोलतात, याचा अर्थ काढून वाद निर्माण केले आहेत. त्यांची अनेक विधाने मूलभूत आहेत, तर काही वादग्रस्त विधाने काहींना न पटणारीही आहेत. त्यामुळे नेमाडे कायम वेगळ्या कारणाने चर्चेत राहतात. त्यांचे साहित्य त्यापलीकडे मोठे आहे. त्यांच्या कादंबºया, कविता या वादापेक्षा मोठ्या आहेत. त्यामुळे त्या टिकणार आहेत. त्यांची लाट म्हणतो. ती लाट आहे, असे मला वाटत नाही, असे मत ज्येष्ठ नाटककार व पत्रकार जयंत पवार यांनी व्यक्त केले आहे.कल्याण सार्वजनिक वाचनालयाच्या लेखन कार्यशाळेत ज्येष्ठ सर्जनशील लेखक राजन खान यांनी नेमाडे यांच्या साहित्याच्या लाटेचे दिवस भरले, असे विधान केले होते. त्यावर जयंत पवार यांनी उपरोक्त मत व्यक्त केले.पवार यांनी सांगितले की, मराठी साहित्यात अशी कोणाची आणखी लाट होती, हे मला माहीत नाही. कोणाची अशी लाट नसते. त्यांच्याभोवती त्यांच्या चांगल्यावाईट कारणांनी वलय निर्माण होते. त्यात्या व्यक्ती प्रकाशझोतात येतात. त्यात सकस साहित्य टिकते. नेमाडे यांचे साहित्य सकस आहे. ते वाद आणि लाटेच्या पलीकडचे आहे. त्यामुळे ते नष्ट होणार नाही. त्यांचा देशीवाद हे त्यांच्याभोवतीच्या वादाचे मूळ आहे. तो देशीवाद टिकेल की नाही, माहीत नाही. मात्र, राजन खान यांनी २२ वर्षे कोठून शोधून काढले, हे मला समजत नाही. त्यामागचे तर्कशास्त्र समजत नाही.काळ बदलतो त्याप्रमाणे नवनवीन प्रवाह येत असतात. नेमाडेंच्या मांडलेल्या विचारांना ओलांडून पुढे जाणारे विचार येतील. असे जगातील सगळ्याच साहित्यिकांबाबत झाले आहे. त्यामुळे प्रवाहात सकस साहित्य टिक ते. त्यांचा देशीवाद, उत्तर आधुनिकवाद तो देखील कधीतरी काळाच्या मागे जाईल. त्या अर्थाने देशीवाददेखील मागे जाईल. पण, नेमाडेंची लाट जाईल, या विधानात मला फार काही मोठे वाटत नाही. नेमाडे यांचे साहित्य नष्ट होणार नाही. आताच्या पिढीलाही आवडणारे साहित्य आहे. त्याअर्थाने खान यांच्या बोलण्यात मला तथ्य वाटत नाही, असे स्पष्ट करत पवार यांनी खान यांचा मुद्दा खोडून काढला आहे.लेखक व कवी श्रीकांत देशमुख यांनी सांगितले की, मराठीत जे निवडक लेखक आहेत, त्यापैकी भालचंद्र नेमाडे एक आहेत. त्यांच्याबाबतीत राजन खान यांनी असे वक्तव्य करणे धाडसाचे आहे. त्या त्या काळावर अनावत प्रभाव अधूनमधून येत असतो. तो कायम राहतो .तो पुसता येत नाही. अभिजात साहित्याची मुद्रा कोणालाही पुसता येत नाही. खान हे साहित्यातील २२ वर्षांच्या लाटेचा अंदाज बांधतात. २०-२२ वयातील मुलांना ही कादंबरी आपली वाटतात. नेमाडेचा प्रभाव ओसरणे म्हणजे काय? प्रभाव म्हणजे केवळ अनुकरण नाही. त्यांचा प्रभाव घेऊन त्यांच्याही पुढे गेले पाहिजे. हा खरा प्रभाव असतो. त्यांचा प्रभाव कायम आहे, असे म्हणता येणार नाही. जाणिवांचा विस्तार कसा होतो, हे पाहिले पाहिजे. ‘अभिजात’ या क क्षेत आपल्याला कधीही त्यांचा प्रभाव खोडून काढता येत नाही. त्याकडे नकारात्मक रीतीने पाहता येत नाही. सकारात्मक पद्धतीने प्रभाव समजून घेतला पाहिजे. श्याम मनोहर, भाऊ पाध्ये हे त्यांना समकालीन आहेत. ते कधीही आउटडेटेड वाटणार नाहीत. वास्तववाद एखाद्याच्या प्रभावांचा भाग असतो, असे नाही. सदानंद देशमुख, प्रवीण बांदेकर यांच्या कादंबरीतही वास्तववाद कायम आहे. खान ज्या पद्धतीने बोलतात, ते नकारात्मक वाटते. नकारात्मक दृष्टीने पाहिल्यास साहित्याचे नुकसान होते. प्रभावपासून पुढे जाणे म्हणजे साहित्याचे गुणवर्तन होईल.साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी आपल्याला या विषयावर भाष्य करायचे नसल्याचे स्पष्ट केले.कालातीत असण्यातच साहित्याचे यश सामावलेलेतुकाराम, महात्मा फुले, साने गुरुजी यांचे लेखन आजही चिंरजीव आहे. ते लेखन अभिजात आहे, त्यांची मुद्रा कोणालाही पुसता येत नाही. ज्यावेळी नवीन पिढी येते ते त्या काळातील साहित्य वाचते. खान हे २२ वर्षांचा अंदाज बांधतात, याकडे श्रीकांत देशमुख यांनी लक्ष वेधले.अजून ५० वर्षांनी नवीन कॉलेजला जाणारा मुलगा नेमाडे यांच्या ‘कोसला’ कादंबरीचे नाव कानांवर आल्यास ती वाचणार आहे. यातच त्या कादंबरीचे यश सामावलेले आहे, असा दाखला त्यांनी दिला. त्यामुळे अशा साहित्यावरील राजन खान यांचे लाट ओसरल्याचे वक्तव्य धाडसाचे वाटते, असे ते म्हणाले.