शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

 भाईं वैद्य यांनी विविध क्षेत्रात, प्रामुख्याने सामाजिक, श्रमजिवी क्षेत्रात परिवर्तनवादी विचारांचे असंख्य कार्यकर्ते निर्माण केले. तेच भाईंचे कार्य पुढे नेतील. - प्रकाश कांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 17:09 IST

ठाणे : कोणतेही काम ,सामाजिक चळवळ, प्रामाणिकपणे केली तर हमखास यश येतेच पण त्याला लागणारा पैसाही कमी पडत नाही. हे ज्येष्ठ समाजवादी नेते ,राष्ट्र सेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष भाई वैद्य यांच्या कामातून दिसून येते, भाईंनी विविध क्षेत्रात, प्रामुख्याने सामाजिक, श्रमजिवी क्षेत्रात परिवर्तनवादी विचारांचे असंख्य कार्यकर्ते निर्माण केले. तेच भाईंचे कार्य ...

ठळक मुद्देभाई वैद्य यांना आदरांजली... तेच भाईंचे कार्य पुढे नेतील. - प्रकाश कांबळे पत्रकार विनायक उर्फ अण्णा बेटावदकर, नगरसेवक दशरथ पाटील, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष संदेश पाटील उपस्थित

ठाणे : कोणतेही काम ,सामाजिक चळवळ, प्रामाणिकपणे केली तर हमखास यश येतेच पण त्याला लागणारा पैसाही कमी पडत नाही. हे ज्येष्ठ समाजवादी नेते ,राष्ट्र सेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष भाई वैद्य यांच्या कामातून दिसून येते, भाईंनी विविध क्षेत्रात, प्रामुख्याने सामाजिक, श्रमजिवी क्षेत्रात परिवर्तनवादी विचारांचे असंख्य कार्यकर्ते निर्माण केले. तेच भाईंचे कार्य पुढे नेतील, असा विश्वास राष्ट्र सेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व विश्वस्त प्रकाश कांबळे यांनी व्यक्त केला.

     राष्ट्र सेवा दल-ठाणे जिल्हा आणि समाजवादी ,समविचारी संस्था संघटना यांच्या वतीने ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयात प्रकाश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत भाई वैद्य यांना आदरांजली वाहण्यात आली. प्रमुख वक्ते म्हणून भाईंच्या सहवासातील पत्रकार विनायक उर्फ अण्णा बेटावदकर, नगरसेवक दशरथ पाटील, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष संदेश पाटील उपस्थित होते, सेवा दलाचे पुर्णवेळ कार्यकर्ते सुहास कोते यांनी प्रास्ताविक व सुत्रसंचलन केले. एकलव्य प्रतिष्ठानचे मोहन सकपाळ, लोकजागर, अनुबंधच्या मीनल सोहोनी, समता विचार प्रसारक संस्थेचे जगदीश खैरासिया , ठाणे मतदाता जनजागरण संस्थेचे उन्मेष बागवे, साम्यकुल, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे जीवराज सावंत, राष्ट्र सेवा दल कलापथकाचे प्रमुख सदानंद राणे, पंचायत भारतीचे सतिश वैवुडे, तसेच स्वराज अभियानचे संजीव साने यांनी भाई वैद्य यांच्यावर लिहीलेला लेख वाचून दाखवण्यात आला. अनेकांनी भाईंच्या आठवणीना उजाळा देत त्यांच्या कार्याची माहिती दिली.. भाई सामाजिक संस्था-संघटनांचे नुसते मार्गदर्शकच नव्हते तर, खऱ्या अर्थाने ते आधार स्तंभही होते. राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष असताना एनराँनचा सत्याग्रह तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती आंदोलन, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचा महत्वाचा सहभाग, भारत यात्रेतील चार हजार कि.मि.ची पदयात्रा. बँ. ए.आर,अंतुले सरकार विरोधातील मोर्चा. या बरोबरच मंत्री असताना निवृत्त झालेल्या कर्मचार्यांचे निवृत्तीवेतन महागाई भत्ताशी जोडण्याचा निर्णय तसेच पोलिस कर्मचार्यांचे हाफ पँट ऐवजी फुल पँट करण्याचा निर्णय घेतला, अटकेत असलेल्या स्मगलरच्या सुटकेसाठी लाच घेवून आलेल्यांना रंगेहात पकडून दिले. पुणे महापालिकेच्या महापौर पदाच्या वेळची त्यांची कामे. श्रमिकांच्या वस्त्यातील सुविधांसाठी केलेले प्रयत्न, अशा अनेक विषयांवर वक्त्यांनी आपले अनुभव सांगून ,उत्तम वक्ता, साक्षेपी व्यासंगी अभ्यासक, उत्तम संघटक म्हणून त्यांच्याबद्दल सर्वांनाच आदर होता. भाई गृहराज्यमंत्री असताना लेखनात कसे मार्गदर्शन मिळाले हे अनेक उदाहरणे देऊन जेष्ठ पत्रकार अण्णा बेटावदकर यांनी सांगितले. ठाण्याचे पहिले पोलीस आयुक्त रिबेरो, तसेच सतीश सहानी,अशा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा करून अधिकारापेक्षा स्नेहाचे संबध ठेऊन अनेक कठीण प्रसंगात बातम्या कशा मिळवता येतात. चुकीच्या माहितीच्या आधारे दिलेल्या बातमीचा समाजावर कसे परिणाम होतात अशी अनेक उदाहरणे ते सागत. १९६० साली पुणे येथे मॉडर्न हायस्कूल (जंगली महाराज रोड) येथे झालेल्या शिबिरात भाईनी तत्कालीन राजकीय पक्ष,व सार्वत्रिक निवडणुकांतील प्रचाराचा मतदारावर कसा परिणाम होतो, ही त्यांची त्यावेळची शिबिरातील बौद्धिके लेखन करताना आपल्याला कशी मार्गदर्शक ठरली ते पत्रकार अण्णा बेटावदकर यांनी सांगितले. ही आदरांजली सभा  मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे येथे झाली. सभेला ठाणे, भिवंडी, कल्याण, मुरबाड, अंबरनाथ, मुंबई भागातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई