शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

 भाईं वैद्य यांनी विविध क्षेत्रात, प्रामुख्याने सामाजिक, श्रमजिवी क्षेत्रात परिवर्तनवादी विचारांचे असंख्य कार्यकर्ते निर्माण केले. तेच भाईंचे कार्य पुढे नेतील. - प्रकाश कांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 17:09 IST

ठाणे : कोणतेही काम ,सामाजिक चळवळ, प्रामाणिकपणे केली तर हमखास यश येतेच पण त्याला लागणारा पैसाही कमी पडत नाही. हे ज्येष्ठ समाजवादी नेते ,राष्ट्र सेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष भाई वैद्य यांच्या कामातून दिसून येते, भाईंनी विविध क्षेत्रात, प्रामुख्याने सामाजिक, श्रमजिवी क्षेत्रात परिवर्तनवादी विचारांचे असंख्य कार्यकर्ते निर्माण केले. तेच भाईंचे कार्य ...

ठळक मुद्देभाई वैद्य यांना आदरांजली... तेच भाईंचे कार्य पुढे नेतील. - प्रकाश कांबळे पत्रकार विनायक उर्फ अण्णा बेटावदकर, नगरसेवक दशरथ पाटील, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष संदेश पाटील उपस्थित

ठाणे : कोणतेही काम ,सामाजिक चळवळ, प्रामाणिकपणे केली तर हमखास यश येतेच पण त्याला लागणारा पैसाही कमी पडत नाही. हे ज्येष्ठ समाजवादी नेते ,राष्ट्र सेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष भाई वैद्य यांच्या कामातून दिसून येते, भाईंनी विविध क्षेत्रात, प्रामुख्याने सामाजिक, श्रमजिवी क्षेत्रात परिवर्तनवादी विचारांचे असंख्य कार्यकर्ते निर्माण केले. तेच भाईंचे कार्य पुढे नेतील, असा विश्वास राष्ट्र सेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व विश्वस्त प्रकाश कांबळे यांनी व्यक्त केला.

     राष्ट्र सेवा दल-ठाणे जिल्हा आणि समाजवादी ,समविचारी संस्था संघटना यांच्या वतीने ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयात प्रकाश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत भाई वैद्य यांना आदरांजली वाहण्यात आली. प्रमुख वक्ते म्हणून भाईंच्या सहवासातील पत्रकार विनायक उर्फ अण्णा बेटावदकर, नगरसेवक दशरथ पाटील, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष संदेश पाटील उपस्थित होते, सेवा दलाचे पुर्णवेळ कार्यकर्ते सुहास कोते यांनी प्रास्ताविक व सुत्रसंचलन केले. एकलव्य प्रतिष्ठानचे मोहन सकपाळ, लोकजागर, अनुबंधच्या मीनल सोहोनी, समता विचार प्रसारक संस्थेचे जगदीश खैरासिया , ठाणे मतदाता जनजागरण संस्थेचे उन्मेष बागवे, साम्यकुल, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे जीवराज सावंत, राष्ट्र सेवा दल कलापथकाचे प्रमुख सदानंद राणे, पंचायत भारतीचे सतिश वैवुडे, तसेच स्वराज अभियानचे संजीव साने यांनी भाई वैद्य यांच्यावर लिहीलेला लेख वाचून दाखवण्यात आला. अनेकांनी भाईंच्या आठवणीना उजाळा देत त्यांच्या कार्याची माहिती दिली.. भाई सामाजिक संस्था-संघटनांचे नुसते मार्गदर्शकच नव्हते तर, खऱ्या अर्थाने ते आधार स्तंभही होते. राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष असताना एनराँनचा सत्याग्रह तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती आंदोलन, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचा महत्वाचा सहभाग, भारत यात्रेतील चार हजार कि.मि.ची पदयात्रा. बँ. ए.आर,अंतुले सरकार विरोधातील मोर्चा. या बरोबरच मंत्री असताना निवृत्त झालेल्या कर्मचार्यांचे निवृत्तीवेतन महागाई भत्ताशी जोडण्याचा निर्णय तसेच पोलिस कर्मचार्यांचे हाफ पँट ऐवजी फुल पँट करण्याचा निर्णय घेतला, अटकेत असलेल्या स्मगलरच्या सुटकेसाठी लाच घेवून आलेल्यांना रंगेहात पकडून दिले. पुणे महापालिकेच्या महापौर पदाच्या वेळची त्यांची कामे. श्रमिकांच्या वस्त्यातील सुविधांसाठी केलेले प्रयत्न, अशा अनेक विषयांवर वक्त्यांनी आपले अनुभव सांगून ,उत्तम वक्ता, साक्षेपी व्यासंगी अभ्यासक, उत्तम संघटक म्हणून त्यांच्याबद्दल सर्वांनाच आदर होता. भाई गृहराज्यमंत्री असताना लेखनात कसे मार्गदर्शन मिळाले हे अनेक उदाहरणे देऊन जेष्ठ पत्रकार अण्णा बेटावदकर यांनी सांगितले. ठाण्याचे पहिले पोलीस आयुक्त रिबेरो, तसेच सतीश सहानी,अशा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा करून अधिकारापेक्षा स्नेहाचे संबध ठेऊन अनेक कठीण प्रसंगात बातम्या कशा मिळवता येतात. चुकीच्या माहितीच्या आधारे दिलेल्या बातमीचा समाजावर कसे परिणाम होतात अशी अनेक उदाहरणे ते सागत. १९६० साली पुणे येथे मॉडर्न हायस्कूल (जंगली महाराज रोड) येथे झालेल्या शिबिरात भाईनी तत्कालीन राजकीय पक्ष,व सार्वत्रिक निवडणुकांतील प्रचाराचा मतदारावर कसा परिणाम होतो, ही त्यांची त्यावेळची शिबिरातील बौद्धिके लेखन करताना आपल्याला कशी मार्गदर्शक ठरली ते पत्रकार अण्णा बेटावदकर यांनी सांगितले. ही आदरांजली सभा  मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे येथे झाली. सभेला ठाणे, भिवंडी, कल्याण, मुरबाड, अंबरनाथ, मुंबई भागातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई