शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बुडणाऱ्यांना वाचवणाऱ्या कौस्तुभ तारमाळेला मरणोत्तर सर्वोत्तम जीवनरक्षक पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 02:31 IST

भातसा नदीच्या वाहत्या खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्यापैकी पाच मुले खोल नदीतील पाण्याच्या भोवऱ्यात अडकली व बुडू लागली.

ठाणे : पाण्यात बुडणाऱ्या मुलांचे प्राण वाचवताना कौस्तुभ भगवान तारमाळे या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्याच्या या कार्याची दखल घेऊन त्यास केंद्र शासनाचे ‘सर्वोत्तम जीवनरक्षापदक’ मरणोत्तर जाहीर झाले होते. हे पदक त्याची आई रत्नप्रभा तारमाळे यांना राज्याचे सार्वजनिक बांधकाम, आरोग्य व कुटुंबकल्याण तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. यावेळी त्यांना सन्मानपत्र, पदक व दोन लक्ष रूपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात हा कार्यक्र म पार पडला. १२ मे २०१८ रोजी खडवली (कासणे) येथील भातसा नदीत पोहण्यासाठी सात मुले खोल गेली होती. भातसा नदीच्या वाहत्या खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्यापैकी पाच मुले खोल नदीतील पाण्याच्या भोवऱ्यात अडकली व बुडू लागली. हे भातसा नदीच्या किनाºयावर उभ्या असलेल्या कौस्तुभ (२४ रा. मौजे-शेई, ता. शहापूर) याने पाहिले व क्षणाचाही विलंब न लावता पाण्यात बुडणाऱ्या मुलांना वाचवण्यासाठी नदीमध्ये उडी मारून त्या मुलांचे प्राण वाचवले. मात्र, बुडणाऱ्या मुलांना वाचवताना शारीरिक क्षमता कमी झाल्यामुळे कौस्तुभ यांचा मृत्यू झाला होता.

या पुरस्कारावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा जाधव, आमदार किसन कथोरे, आमदार शांताराम मोरे, आमदार गणपत गायकवाड, जिल्हा पालक सचिव सतीश गवई, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, जिल्हा अधीक्षककृषी अधिकारी अंकुश माने उपस्थित होते. याप्रकरणी कौस्तुभ तारमाळे यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता दाखवलेल्या अतुलनीय शौर्यासाठी केंद्र शासनाच्या जीवनरक्षापदक पुरस्कार २०१८ साठी त्यांचा प्रस्ताव विहित नमुन्यात गृह विभाग महाराष्ट्र शासनातर्फे केंद्र शासनास सादर करण्यात आला होता. त्यानुसार, गृह मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्याकडील पत्रान्वये कौस्तुभ याची २०१८ साठी जीवनरक्षापदक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. हे शुक्रवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांच्या आईस प्रदान करण्यात आले.

टॅग्स :thaneठाणे