शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोविड अर्थसाहाय्याचे १४,९६२ रिक्षाचालक लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कोविड काळातील निर्बंधांमुळे राज्य शासनाने मे महिन्यात रिक्षाचालकांना १५०० रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : कोविड काळातील निर्बंधांमुळे राज्य शासनाने मे महिन्यात रिक्षाचालकांना १५०० रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. यासाठी कल्याण आरटीओमध्ये आतापर्यंत २४ हजार २७२ रिक्षाचालक मालकांनी अर्ज केले असून, त्यापैकी १४ हजार ९६२ रिक्षाचालक या मदतीचे लाभार्थी झाले आहेत.

रिक्षाचालकांना अर्थसाहाय्य करण्यासाठी नोंदणी, कागदपत्रांच्या छाननीचे काम सुरू आहे. आतापर्यंत दोन, अडीच महिन्यांत आलेल्या अर्जांमध्ये सुमारे साडेसहा हजार अर्ज नामंजूर, रद्द झाले आहेत. कागदपत्रांची पूर्तता न करणे, तसेच तेचतेच अर्ज पुन्हा येणे यासह अन्य विविध तांत्रिक कारणांमुळे ते अर्ज रद्द, बाद झाले असल्याची तांत्रिक माहिती समोर आली आहे. आताही २ हजार १८९ अर्ज विचाराधीन असून, त्यांना लवकरच अर्थसाहाय्य मिळणार असल्याचे सांगण्यात आले. २४७ अर्जांवर काम होणे बाकी असून, लवकरच ते अर्जदेखील मार्गी लागतील, असेही सांगण्यात आले.

-------

राज्य शासनाच्या अर्थसाहाय्याचे जे रिक्षाचालक, मालक लाभार्थी आहेत, त्यापैकी हजारो जणांना तो लाभ मिळाला आहे. जे तांत्रिक बाबींमुळे रद्द, नामंजूर झाले, त्याबाबत लगेचच संबंधितांना सांगण्यात येते. नवे अर्ज येतात त्यावर काम सुरू आहे. शासन निकषानुसार जेवढे लाभार्थी असतील त्यांना ते मिळवून देण्यासाठी आमचे अधिकारी, कर्मचारी सातत्याने कार्यमग्न आहेत. तांत्रिकदृष्ट्या जे अर्ज योग्य असतील, त्यांना तत्काळ लाभ मिळण्यासाठी आमचा प्रयत्न असतो.

तानाजी चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण