शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘केंद्रातील योजनांच्या लाभार्थ्यांनी मानले केंद्र सरकारचे आभार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:43 IST

डोंबिवली : केंद्र सरकारचे काम जास्तीतजास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनआशीर्वाद यात्रेचे माध्यम हे खूप प्रभावी आहे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री ...

डोंबिवली : केंद्र सरकारचे काम जास्तीतजास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनआशीर्वाद यात्रेचे माध्यम हे खूप प्रभावी आहे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केले. त्यामुळे सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या आहेत की नाही, हे स्पष्ट झाले आहे. नागरिक आभार मानत आहेत, म्हणजे केंद्राचे काम चांगले सुरू असल्याचे ते म्हणाले.

पाटील यांच्या यात्रेला बुधवारी कल्याणच्या दुर्गाडी चौकापासून सुरुवात झाली. यावेळी पाटील, माजी आ. नरेंद्र पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. या यात्रेत आत्मनिर्भर भारत योजना, कौशल्य विकास, प्रधानमंत्री उज्ज्वल योजना, पंतप्रधान जनधन योजना, पीक योजना, कृषी योजना, पंतप्रधान युवा योजना आदी योजनांच्या लाभार्थ्यांची पाटील यांनी चर्चा केली. तसेच या यात्रेत युवकांची बाइक रॅली काढण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा नागरिक यात्रेच्या रथावर पुष्पवृष्टी करत होते.

लालचौकी येथे प्रजापिता ब्रह्माकुमारीकडून यात्रेचे स्वागत करण्यात आले. सहजानंद चौकात युवा मोर्चातर्फे स्किल इंडियाच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रवाटप तसेच ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे स्वागत करण्यात आले. शिवाजी चौकात ३७० कलम हटविल्याबद्दल पक्षाचे आभार मानण्यात आले. मुस्लिम, जैन समाज तसेच व्यापारी संघटनेने पाटील यांचा सत्कार केला. आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून वकील संघटना व हिंदू वाहिनीतर्फे सत्कार करण्यात आला. नेताजी सुभाष चौकात रेल चाइल्ड संस्थेतर्फे स्वागत करण्यात आले. सिंडिकेट येथे मराठा, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय समाज, महिला मोर्चा व गुरुद्वारा समितीतर्फे स्वागत करण्यात आले. तर प्रेम ऑटो येथे डम्पिंग ग्राउंड, वालधुनी नदीबाबत निवेदन देण्यात आले. भाजपा शिक्षक आघाडी, खान्देश समाज, सिंधी समाज व आगरी कोळी उत्कर्ष मंडळातर्फे स्वागत व सत्कार करण्यात आले.

------------------