शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

‘केंद्रातील योजनांच्या लाभार्थ्यांनी मानले केंद्र सरकारचे आभार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:43 IST

डोंबिवली : केंद्र सरकारचे काम जास्तीतजास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनआशीर्वाद यात्रेचे माध्यम हे खूप प्रभावी आहे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री ...

डोंबिवली : केंद्र सरकारचे काम जास्तीतजास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनआशीर्वाद यात्रेचे माध्यम हे खूप प्रभावी आहे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केले. त्यामुळे सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या आहेत की नाही, हे स्पष्ट झाले आहे. नागरिक आभार मानत आहेत, म्हणजे केंद्राचे काम चांगले सुरू असल्याचे ते म्हणाले.

पाटील यांच्या यात्रेला बुधवारी कल्याणच्या दुर्गाडी चौकापासून सुरुवात झाली. यावेळी पाटील, माजी आ. नरेंद्र पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. या यात्रेत आत्मनिर्भर भारत योजना, कौशल्य विकास, प्रधानमंत्री उज्ज्वल योजना, पंतप्रधान जनधन योजना, पीक योजना, कृषी योजना, पंतप्रधान युवा योजना आदी योजनांच्या लाभार्थ्यांची पाटील यांनी चर्चा केली. तसेच या यात्रेत युवकांची बाइक रॅली काढण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा नागरिक यात्रेच्या रथावर पुष्पवृष्टी करत होते.

लालचौकी येथे प्रजापिता ब्रह्माकुमारीकडून यात्रेचे स्वागत करण्यात आले. सहजानंद चौकात युवा मोर्चातर्फे स्किल इंडियाच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रवाटप तसेच ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे स्वागत करण्यात आले. शिवाजी चौकात ३७० कलम हटविल्याबद्दल पक्षाचे आभार मानण्यात आले. मुस्लिम, जैन समाज तसेच व्यापारी संघटनेने पाटील यांचा सत्कार केला. आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून वकील संघटना व हिंदू वाहिनीतर्फे सत्कार करण्यात आला. नेताजी सुभाष चौकात रेल चाइल्ड संस्थेतर्फे स्वागत करण्यात आले. सिंडिकेट येथे मराठा, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय समाज, महिला मोर्चा व गुरुद्वारा समितीतर्फे स्वागत करण्यात आले. तर प्रेम ऑटो येथे डम्पिंग ग्राउंड, वालधुनी नदीबाबत निवेदन देण्यात आले. भाजपा शिक्षक आघाडी, खान्देश समाज, सिंधी समाज व आगरी कोळी उत्कर्ष मंडळातर्फे स्वागत व सत्कार करण्यात आले.

------------------