शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

‘अधिकार’विना २७ गावांच्या विकासाला खीळ

By admin | Updated: January 5, 2016 01:59 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेत २७ गावांचा समावेश झाला असला तरी त्यांचे अधिकार एमएमआरडीएकडे असल्याने विकासाचे प्रकल्प राबविण्याबाबत अडचण निर्माण झाली आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत २७ गावांचा समावेश झाला असला तरी त्यांचे अधिकार एमएमआरडीएकडे असल्याने विकासाचे प्रकल्प राबविण्याबाबत अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे एमएमआरडीएकडे असलेले ‘अधिकार’ तातडीने केडीएमसीला द्यावेत, यासाठी सत्ताधारी शिवसेनेने पुढाकार घेतला असून याबाबत पक्षाचे गटनेते रमेश जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा एमएमआरडीएचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून यासंदर्भात जलदगतीने निर्णय घेण्याची विनंती केली आहे.या २७ गावांचा १ जून २०१५ रोजी कल्याण-डोंबिवली महापालिकेत समावेश झाला. याआधी या गावांच्या विकासाची जबाबदारी एमएमआरडीएसह एमआयडीसीकडे होती. परंतु, त्यांचा केडीएमसीत समावेश होऊनसुद्धा ही परिस्थिती जैसे थे राहिली आहे. जशी अडचण केडीएमसीसमोर उभी राहिली आहे, तशीच ती एमएमआरडीएचीही झाली आहे. पाणीपुरवठा, अनधिकृत बांधकामांवरील कारवाई, कर लागू करणे आणि त्यांची वसुली, रस्ते दुरुस्ती या कामांबरोबर विकासाचे प्रकल्प राबविण्याच्या अनुषंगाने शासनाचे कोणतेही स्पष्ट आदेश नसल्याने या कामांची जबाबदारी कोणाची, याबाबत अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम पसरला आहे. परिणामी, गावांमध्ये सोयीसुविधा आणि विकासाची कामे होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. लवकरच केडीएमसीचे अंदाजपत्रक तयार केले जाणार आहे. यात २७ गावांमधील सोयीसुविधांचे नियोजन करताना कुठला विकास आराखडा वापरायचा, हा प्रश्न पडला असून उद्याने, डीपी रस्ते, कचराप्रश्न, शाळा, जलकुंभ बांधणे, जलवाहिन्या टाकणे, यात मुख्यत: रस्ते दुरुस्ती करण्यात मोठी अडचण निर्माण झाल्याकडे लक्ष वेधले आहे. याबाबत, वेळीच निर्णय न घेतल्यास लोकप्रतिनिधींना रोषाला सामोरे जावे लागेल तसेच अनधिकृत बांधकामांचे पेव फुटेल. परिणामी, ग्रामस्थांना रस्त्यांवरून चालणे दुरापास्त होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.