शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

‘अधिकार’विना २७ गावांच्या विकासाला खीळ

By admin | Updated: January 5, 2016 01:59 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेत २७ गावांचा समावेश झाला असला तरी त्यांचे अधिकार एमएमआरडीएकडे असल्याने विकासाचे प्रकल्प राबविण्याबाबत अडचण निर्माण झाली आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत २७ गावांचा समावेश झाला असला तरी त्यांचे अधिकार एमएमआरडीएकडे असल्याने विकासाचे प्रकल्प राबविण्याबाबत अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे एमएमआरडीएकडे असलेले ‘अधिकार’ तातडीने केडीएमसीला द्यावेत, यासाठी सत्ताधारी शिवसेनेने पुढाकार घेतला असून याबाबत पक्षाचे गटनेते रमेश जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा एमएमआरडीएचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून यासंदर्भात जलदगतीने निर्णय घेण्याची विनंती केली आहे.या २७ गावांचा १ जून २०१५ रोजी कल्याण-डोंबिवली महापालिकेत समावेश झाला. याआधी या गावांच्या विकासाची जबाबदारी एमएमआरडीएसह एमआयडीसीकडे होती. परंतु, त्यांचा केडीएमसीत समावेश होऊनसुद्धा ही परिस्थिती जैसे थे राहिली आहे. जशी अडचण केडीएमसीसमोर उभी राहिली आहे, तशीच ती एमएमआरडीएचीही झाली आहे. पाणीपुरवठा, अनधिकृत बांधकामांवरील कारवाई, कर लागू करणे आणि त्यांची वसुली, रस्ते दुरुस्ती या कामांबरोबर विकासाचे प्रकल्प राबविण्याच्या अनुषंगाने शासनाचे कोणतेही स्पष्ट आदेश नसल्याने या कामांची जबाबदारी कोणाची, याबाबत अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम पसरला आहे. परिणामी, गावांमध्ये सोयीसुविधा आणि विकासाची कामे होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. लवकरच केडीएमसीचे अंदाजपत्रक तयार केले जाणार आहे. यात २७ गावांमधील सोयीसुविधांचे नियोजन करताना कुठला विकास आराखडा वापरायचा, हा प्रश्न पडला असून उद्याने, डीपी रस्ते, कचराप्रश्न, शाळा, जलकुंभ बांधणे, जलवाहिन्या टाकणे, यात मुख्यत: रस्ते दुरुस्ती करण्यात मोठी अडचण निर्माण झाल्याकडे लक्ष वेधले आहे. याबाबत, वेळीच निर्णय न घेतल्यास लोकप्रतिनिधींना रोषाला सामोरे जावे लागेल तसेच अनधिकृत बांधकामांचे पेव फुटेल. परिणामी, ग्रामस्थांना रस्त्यांवरून चालणे दुरापास्त होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.