शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

मार्चची सुरुवातच 40 अंश सेल्सिअसने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 00:54 IST

उन्हाळ्याने झाले हैराण : क्षुधाशांतीकरिता थंड पेयांकडे पुन्हा वळले

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  : ठाण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना मागील काही दिवसांपासून ठाण्यात उन्हाचा पाराही वाढू लागला आहे. गेल्या काही दिवसांतील शहराचे दिवसाचे तापमान ३८ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत  गेल्याचे दिसून आले आहे. गुरुवारी दुपारी २.३० च्या सुमारास ठाण्याचा पारा ४० अंश सेल्सिअसवर गेल्याने ठाणेकरांच्या अंगाची लाहीलाही होत होती व घामाच्या धारा वाहत होत्या. त्यामुळे अनेकांनी थंड पाण्याबरोबर शीतपेय पिण्याकडे आपला मोर्चा वळवला आहे.मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तापमानाचा पारा ४० अंशाच्या पुढे गेल्याने ठाण्याचा विदर्भ झाला का, असा भास होऊ लागला आहे. ठाण्यात फेब्रुवारी अखेरपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेची यंत्रणा सतर्क झाली आहे. रोजच्या रोज शहरात १५० ते २०० नवे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे ठाणेकर सुरक्षेच्या दृष्टीने घरात राहणे पसंत करीत आहेत. दुसरीकडे ठाण्याचा पारा वाढल्याने काही ठाणेकर नागरिक घरात गरम होत असल्याने हवा खाण्यासाठी घराबाहेर पडू लागले आहेत. ठाण्यात एप्रिल महिन्याच्या अखेरीस व मे महिन्यात पारा भलताच वाढताना दिसतो. यंदा मार्च महिना सुरू होताच ठाण्याचा पारा ४० अंशाच्या पार जाऊ लागल्याने एप्रिल, मे आणि अर्धा जून या महिन्यांत ठाण्यात काय अवस्था होईल, याची कल्पनाही न केलेली बरे, असे ठाणेकर बोलत आहेत. ठाण्याचा पारा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यंदा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच शहरातील तापमान ३५ अंशाच्या आसपास होते. फेब्रुवारी महिना संपेपर्यंत तापमानाने ३८ अंशांचा पल्ला पार केला होता. हीच परिस्थिती मार्च महिन्यात कायम आहे. यंदाच्या वर्षी उष्म्यात वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. तो खरा ठरला आहे. सकाळपासूनच उष्मा जाणवत होता. दुपारी त्यात आणखी वाढ झाली. त्यामुळे उसाचा रस, ज्युस, कोल्ड्रिंक यांच्या मागणीत वाढ झाली. अनेक जण हॉटेल, टपऱ्या येथे जमून थंडगार पेयांचा आस्वाद घेताना दिसत होते. 

कोरोनाच्या भीतीमुळे काहींनी थंड पाणी पिणे, थंड पदार्थ खाणे सोडले आहे. परंतु जर उन्हाळा असाच वाढत राहिला तर कोरडा पडलेला घसा थंड करण्याकरिता शीतपेयांखेरीज पर्याय असणार नाही. 

टॅग्स :Heat Strokeउष्माघात