शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा बांधकामे नियमित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 01:15 IST

राज्य शासनाने उल्हासनगरसाठी विशेष अध्यादेश काढून बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा मार्ग मोकळा केला आहे.

उल्हासनगर : राज्य शासनाने उल्हासनगरसाठी विशेष अध्यादेश काढून बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. त्याच्या अंमलबजावणीचे सर्वाधिकार उल्हानगर महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यानुसार बेकायदा बांधकामे नियमित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून नागरिकांकडून प्रस्ताव मागवण्यात आले असल्याची माहिती आयुक्त सुधाकर देशमुख यांनी बुधवारी दिली. यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.उल्हासनगरात ८५५ बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर २००६ मध्ये राज्य शासनाने विस्थापिताचे शहर म्हणून खास उल्हासनगरसाठी अध्यादेश काढला. काही अटी-शर्तीनुसार बेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठी महापालिकेने सरसकट सर्वच बांधकामांना नोटिसा पाठवून बांधकाम नियमित करण्यासाठी आवाहन केले.त्यासाठी प्रभाग समितीनिहाय तज्ज्ञ समिती स्थापन केली. तर प्रस्ताव मंजूर करण्याचे सर्वाधिकार जिल्हाधिकारी यांना दिले होते. तब्बल २२ हजारांपेक्षा जास्त प्रस्ताव तज्ज्ञ समितीकडे आली. त्यापैकी सहा हजार २२६ प्रस्तावांची छाननी करण्यात आली.प्रत्यक्षात १०० बांधकामे नियमित होऊ न त्यांना डी फॉर्म देण्यात आला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी छाननी केलेल्या प्रस्तावांवर सही करण्यास नकार दिल्याने अध्यादेशाचे काम २००९ पासून ठप्प पडले.शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर राजकीय नेत्यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू केला. तसेच शासन अध्यादेशात बदल करण्याचा पाठपुरावा उल्हासनगर संघर्ष समितीने अनेक वर्षांपासून सुरू ठेवला.संघर्ष समितीमध्ये निवृत्त अधिकारी एस. एस. ससाणे, आय. एम. मोरे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष भानुशाली आणि वास्तुविशारद अतुल देशमुख यांचा समावेश होता.अखेर राज्य शासनाने सुरुवातीला धोकादायक इमारती नियमित करण्याचा निर्णय घेऊ न त्यांच्या पुनर्बांधणीसाठी चार चटईक्षेत्र देण्याला मंजुरी दिली. तसेच, जिल्हाधिकारीऐवजी महापालिका आयुक्तांना प्रस्तावाला अंतिम मंजुरी देण्याचा सर्वाधिकार दिला आहे.>संयुक्त पत्रकार परिषदेत दिली माहितीआयुक्त सुधाकर देशमुख, प्रांत अधिकारी जगजतसिंग गिरासे, आमदार ज्योती कालानी, महापौर पंचम कालानी, स्थायी समिती सभापती राजेश वधारिया यांनी महापौर कार्यालयात संयुक्त पत्रकार परिषद घेऊ न अध्यादेशाचे काम सुरू झाल्याची माहिती दिली. तसेच नागरिकांनी आॅनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. याआधी अर्ज केलेल्यांनीही पुन्हा अर्ज करावे, असे आयुक्त देशमुख यांनी सांगितले.