शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत जास्मिन लांबोरियाची 'सुवर्ण' कामगिरी!
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

मोदींच्या चुकांमुळेच देशाची पीछेहाट, प्रज्ञा पवार यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:13 IST

मी लहानसहान विचार करत नाही, मोठी स्वप्ने पाहतो असे प्रधानसेवक नरेंद्र मोदी सरदार सरोवराच्या उद्घाटनप्रसंगी सांगत होते. पण मी चुकाही तशा मोठ्याच करतो, हे त्यांनी सांगितले नाही.

ठाणे : मी लहानसहान विचार करत नाही, मोठी स्वप्ने पाहतो असे प्रधानसेवक नरेंद्र मोदी सरदार सरोवराच्या उद्घाटनप्रसंगी सांगत होते. पण मी चुकाही तशा मोठ्याच करतो, हे त्यांनी सांगितले नाही. पण त्यांच्या अशा चुकांमुळेच भारत देश मागे जातो आहे. तसेही विद्यमान सत्ताधाºयांना आणि नागपुरातून त्यांचा रिमोट हाताळणा-यांना भारताला राज्यघटनापूर्व काळात न्यायचे आहे, अशी परखड टीका ज्येष्ठ साहित्यिका डॉ. प्रज्ञा पवार यांनी केली.कोकण मराठी साहित्य परिषदेचे सहावे ठाणे जिल्हा साहित्य संमेलन रविवारी सहयोग मंदिर येथे रंगले. त्याच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. स्वातंत्र्यपूर्व काळात सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा प्रश्न विचारणाºया टिळकांना मंडालेच्या तुरूंगात धाडले गेले. मात्र स्वातंत्र्याला ६७ वर्षे उलटल्यावर आलेल्या हिंदुत्त्ववादी सरकारच्या काळात तर लेखकांना थेट मृत्यूलोकी धाडले जात आहे. या देशात लिहिण्याची कृती केल्यामुळेच डॉ.दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौैरी लंकेश यांच्या हत्या होतात आणि नंतर सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल अर्वाच्च भाषेत टीका केली जाते. त्यामुळे लिहित्या लेखकाच्या शब्दांची धग कुणाला पोळते, जाळते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. म्हणूनच लेखकाची ताकद संपवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील पहिला घाला आणीबाणीपर्वात म्हणजे इंदिरा गांधी पंतप्रधान असताना घातला गेला होता. पण त्याचे उत्तर भारतातील शहाण्यासुरत्या नागरिकांनी तत्काळ मतपेटीतून दिले. १९७५ ची आणीबाणी तरी घोषित होती. पण गेल्या तीन वर्षांपासन भारतामध्ये अघोषित आणीबाणीचे पर्व सुरू झाले असल्याचा दावा त्यांनी केली.दक्षिण आशियाई देशांतील लहान-मोठे विरोध कधीच गळून पडले आहेत. जसा पाकिस्तान तसा भारत, भारत तसा बांगलादेश, बांगलादेश तसा म्यानमार अशी ही साखळी आहे. या अर्थाने ‘अखंड भारताचे’ स्वप्न पूर्ण झाले आहे. पण त्यात भारतीयत्त्व मात्र हरवून ‘अखंड पाकिस्तान’ निर्माण झाला आहे, अशी भीती पवार यांनी मांडली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी