शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सावध व्हा; अन्यथा बेफिकिरी नडेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तिसऱ्या लाटेच्या धाेक्याबाबत सावध करीत असताना कल्याण-डोंबिवली शहरात मात्र नागरिकांतील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तिसऱ्या लाटेच्या धाेक्याबाबत सावध करीत असताना कल्याण-डोंबिवली शहरात मात्र नागरिकांतील बेफिकिरी वाढल्याचे दिसत आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक आहे. बहुतांश नागरिक विनामास्क बिनदिक्कत फिरत आहेत. गर्दीतही मास्क तोंडावर लावला जात नाही. घटणाऱ्या कोरोना रुग्ण संख्येला पुन्हा वाढायला ही कृती कारणीभूत ठरेल, यात शंका नाही.

नव्याने आढळून येणाऱ्या कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाल्याने कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. यात खासगी कार्यालये हॉटेल, दुकाने, मॉल, उद्याने, मैदाने खुली करताना कोरोना नियम पाळण्याचे बंधन घातले आहे. मनपा क्षेत्रात नव्याने आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या सध्या कमी आहे. मृत्यूचे प्रमाणही एक ते दोन आहे. शनिवारपर्यंतचा आढावा घेता सध्या ४९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील बहुतांश रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. कोरोना रुग्णांची कमी होत असलेली संख्या हे दिलासादायक असले तरी नागरिक कोरोनाचे नियम पाळत नसल्याचे चित्र बहुतांश ठिकाणी दिसत आहे. मुख्य रस्ते, चौक, बाजारपेठांत नागरिक बिनदिक्कत विनामास्क फिरताना दिसत आहेत. चारचाकी वाहने आणि दुचाकीवरून प्रवास करणारे नागरिक, रिक्षाचालक यांनाही मास्कचे वावडे आहे. कोरोना नियमांना नागरिकांकडून तिलांजली मिळत असल्याने कोरोना विषाणूचे संक्रमण वाढून रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना नियम पाळा, अन्यथा ही बेफिकिरी नडल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही.

-----------------------------------------------

मनपाची कारवाई थंडावली?

कोरोनाची पहिली लाट असो अथवा दुसरी लाट यात मास्क न वापरणाऱ्यांविरोधात केडीएमसी आणि पोलिसांकडून संयुक्त कारवाई सुरू आहे. कोरोनाची घटत चाललेली संख्या पाहता ही कारवाई थंडावल्याचे दिसत आहे. जनआशीर्वाद यात्रेत कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याने कल्याण परिमंडळ ३ मधील विविध पोलीस ठाण्यांमध्ये आयोजक भाजप पदाधिकाऱ्यांवर नुकतेच गुन्हे दाखल झाले. मनपा आणि पोलीसही दुर्लक्ष करीत आहेत. जूनमध्ये विनामास्क १८१२ नागरिकांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर १ ते ६ जुलै या कालावधीत १८१ जणांवर कारवाई झाली. यानंतर मनपाने दुकाने, बार यांच्याकडे मोर्चा वळविला. ही कारवाई २ ऑगस्टपर्यंत दिसून आली. त्यानंतर कारवाई झाल्याची आकडेवारी मनपाकडून दिली गेलेली नाही. दरम्यान, कारवाई सुरू असल्याचा दावा पथकांकडून केला जात आहे.

------------------------------------------------------

फोटो आहे आनंद मोरे