शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

सावध व्हा; अन्यथा बेफिकिरी नडेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तिसऱ्या लाटेच्या धाेक्याबाबत सावध करीत असताना कल्याण-डोंबिवली शहरात मात्र नागरिकांतील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तिसऱ्या लाटेच्या धाेक्याबाबत सावध करीत असताना कल्याण-डोंबिवली शहरात मात्र नागरिकांतील बेफिकिरी वाढल्याचे दिसत आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक आहे. बहुतांश नागरिक विनामास्क बिनदिक्कत फिरत आहेत. गर्दीतही मास्क तोंडावर लावला जात नाही. घटणाऱ्या कोरोना रुग्ण संख्येला पुन्हा वाढायला ही कृती कारणीभूत ठरेल, यात शंका नाही.

नव्याने आढळून येणाऱ्या कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाल्याने कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. यात खासगी कार्यालये हॉटेल, दुकाने, मॉल, उद्याने, मैदाने खुली करताना कोरोना नियम पाळण्याचे बंधन घातले आहे. मनपा क्षेत्रात नव्याने आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या सध्या कमी आहे. मृत्यूचे प्रमाणही एक ते दोन आहे. शनिवारपर्यंतचा आढावा घेता सध्या ४९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील बहुतांश रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. कोरोना रुग्णांची कमी होत असलेली संख्या हे दिलासादायक असले तरी नागरिक कोरोनाचे नियम पाळत नसल्याचे चित्र बहुतांश ठिकाणी दिसत आहे. मुख्य रस्ते, चौक, बाजारपेठांत नागरिक बिनदिक्कत विनामास्क फिरताना दिसत आहेत. चारचाकी वाहने आणि दुचाकीवरून प्रवास करणारे नागरिक, रिक्षाचालक यांनाही मास्कचे वावडे आहे. कोरोना नियमांना नागरिकांकडून तिलांजली मिळत असल्याने कोरोना विषाणूचे संक्रमण वाढून रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना नियम पाळा, अन्यथा ही बेफिकिरी नडल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही.

-----------------------------------------------

मनपाची कारवाई थंडावली?

कोरोनाची पहिली लाट असो अथवा दुसरी लाट यात मास्क न वापरणाऱ्यांविरोधात केडीएमसी आणि पोलिसांकडून संयुक्त कारवाई सुरू आहे. कोरोनाची घटत चाललेली संख्या पाहता ही कारवाई थंडावल्याचे दिसत आहे. जनआशीर्वाद यात्रेत कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याने कल्याण परिमंडळ ३ मधील विविध पोलीस ठाण्यांमध्ये आयोजक भाजप पदाधिकाऱ्यांवर नुकतेच गुन्हे दाखल झाले. मनपा आणि पोलीसही दुर्लक्ष करीत आहेत. जूनमध्ये विनामास्क १८१२ नागरिकांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर १ ते ६ जुलै या कालावधीत १८१ जणांवर कारवाई झाली. यानंतर मनपाने दुकाने, बार यांच्याकडे मोर्चा वळविला. ही कारवाई २ ऑगस्टपर्यंत दिसून आली. त्यानंतर कारवाई झाल्याची आकडेवारी मनपाकडून दिली गेलेली नाही. दरम्यान, कारवाई सुरू असल्याचा दावा पथकांकडून केला जात आहे.

------------------------------------------------------

फोटो आहे आनंद मोरे