शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

सावध व्हा; अन्यथा बेफिकिरी नडेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तिसऱ्या लाटेच्या धाेक्याबाबत सावध करीत असताना कल्याण-डोंबिवली शहरात मात्र नागरिकांतील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तिसऱ्या लाटेच्या धाेक्याबाबत सावध करीत असताना कल्याण-डोंबिवली शहरात मात्र नागरिकांतील बेफिकिरी वाढल्याचे दिसत आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक आहे. बहुतांश नागरिक विनामास्क बिनदिक्कत फिरत आहेत. गर्दीतही मास्क तोंडावर लावला जात नाही. घटणाऱ्या कोरोना रुग्ण संख्येला पुन्हा वाढायला ही कृती कारणीभूत ठरेल, यात शंका नाही.

नव्याने आढळून येणाऱ्या कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाल्याने कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. यात खासगी कार्यालये हॉटेल, दुकाने, मॉल, उद्याने, मैदाने खुली करताना कोरोना नियम पाळण्याचे बंधन घातले आहे. मनपा क्षेत्रात नव्याने आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या सध्या कमी आहे. मृत्यूचे प्रमाणही एक ते दोन आहे. शनिवारपर्यंतचा आढावा घेता सध्या ४९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील बहुतांश रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. कोरोना रुग्णांची कमी होत असलेली संख्या हे दिलासादायक असले तरी नागरिक कोरोनाचे नियम पाळत नसल्याचे चित्र बहुतांश ठिकाणी दिसत आहे. मुख्य रस्ते, चौक, बाजारपेठांत नागरिक बिनदिक्कत विनामास्क फिरताना दिसत आहेत. चारचाकी वाहने आणि दुचाकीवरून प्रवास करणारे नागरिक, रिक्षाचालक यांनाही मास्कचे वावडे आहे. कोरोना नियमांना नागरिकांकडून तिलांजली मिळत असल्याने कोरोना विषाणूचे संक्रमण वाढून रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना नियम पाळा, अन्यथा ही बेफिकिरी नडल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही.

-----------------------------------------------

मनपाची कारवाई थंडावली?

कोरोनाची पहिली लाट असो अथवा दुसरी लाट यात मास्क न वापरणाऱ्यांविरोधात केडीएमसी आणि पोलिसांकडून संयुक्त कारवाई सुरू आहे. कोरोनाची घटत चाललेली संख्या पाहता ही कारवाई थंडावल्याचे दिसत आहे. जनआशीर्वाद यात्रेत कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याने कल्याण परिमंडळ ३ मधील विविध पोलीस ठाण्यांमध्ये आयोजक भाजप पदाधिकाऱ्यांवर नुकतेच गुन्हे दाखल झाले. मनपा आणि पोलीसही दुर्लक्ष करीत आहेत. जूनमध्ये विनामास्क १८१२ नागरिकांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर १ ते ६ जुलै या कालावधीत १८१ जणांवर कारवाई झाली. यानंतर मनपाने दुकाने, बार यांच्याकडे मोर्चा वळविला. ही कारवाई २ ऑगस्टपर्यंत दिसून आली. त्यानंतर कारवाई झाल्याची आकडेवारी मनपाकडून दिली गेलेली नाही. दरम्यान, कारवाई सुरू असल्याचा दावा पथकांकडून केला जात आहे.

------------------------------------------------------

फोटो आहे आनंद मोरे