शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
4
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
7
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
8
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
11
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
12
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
13
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
14
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
15
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
16
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
17
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
18
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
19
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
20
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम

दुर्गाडी खाडीपुलाच्या ऑनलाइन लोकार्पणाआधी रंगली श्रेयवादाची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:30 IST

कल्याण : कल्याण दुर्गाडी खाडीपुलाच्या दोन लेनचे ऑनलाइन लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी दुपारी झाले. मात्र, त्या ...

कल्याण : कल्याण दुर्गाडी खाडीपुलाच्या दोन लेनचे ऑनलाइन लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी दुपारी झाले. मात्र, त्या आधीच पुलाच्या श्रेयवादावरून शिवसेना, भाजप आणि मनसेत लढाई रंगली होती. त्यामुळे लोकार्पणस्थळी पोलिसांनी बंदोबस्त वाढविला होता.

कार्यक्रमस्थळी मनसेचे कार्यकर्ते सकाळी साडेदहा वाजता पोहोचले. त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांना काय काम आहे अशी विचारणा करून पिटाळून लावले. पोलिसांना कुणकुण लागली की, मनसे त्या ठिकाणी काही अनुचित प्रकार करू शकते. कार्यकर्त्यांना पोलिसांनी सांगितले की, या ठिकाणी फालतुगिरी करू नका, अन्यथा गुन्हे दाखल करावे लागतील, असा दम भरल्यावर ते त्या ठिकाणाहून निघून गेले. थोड्या वेळानंतर मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर तेथे आले. त्यांनी आम्ही आंदोलन करणार नाही की, काळे झेंडे दाखविणार नाही. पुलाचे लोकार्पण होत असल्याने आनंद आहे. मात्र, या कामाकरिता मी स्वत: पाठपुरावा केला आहे. कामाची पाहणी करू द्या. त्यावेळी पोलिसांनी केवळ भोईरच पाहणी करतील, त्यांच्यासोबत कार्यकर्ते जाणार नाही, असे सांगितल्याने पोलिसांसोबत भोईर यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी सत्ताधारी शिवसेनेकडून त्यांना कार्यक्रमास बोलाविले गेले नसल्याचे सांगितले.

भोईर यांच्या या वक्तव्यावर शिवसेननेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले की, या पुलाच्या कामासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे याचा पाठपुरावा सुरू होता. त्यामुळे कोणी श्रेय घेण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही. माजी आमदारांना निमंत्रण दिले गेले नाही हा आमचा विषय नाही. हा कार्यक्रम एमएमआरडीएने आयोजित केला असल्याने त्यांनी त्यांना जाब विचारावा.

दरम्यान, एका शैक्षणिक कार्यक्रमानिमित्त कल्याणमध्ये आलेले भाजप खासदार कपिल पाटील यांनी सांगितले की, माझ्या खासदारकीच्या निवडणुकीच्या सभेला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. त्यावेळी त्यांना या पुलाच्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. या समस्येचे गांभीर्य ओळखून त्यांनी या पुलाच्या कामाला मंजुरी दिली होती. कंत्राटदाराच्या दिरंगाईमुळे पूल वेळेत पूर्ण झाला नाही. अन्यथा, या पुलाचे काम फडणवीस यांच्या कारकिर्दीत पूर्ण झाले असते. त्यामुळे श्रेय कोणीही घेऊ द्या हे काम भाजप सरकारच्या कारकिर्दीत झाले आहे.

------------------------