शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गाडी खाडीपुलाच्या ऑनलाइन लोकार्पणाआधी रंगली श्रेयवादाची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:30 IST

कल्याण : कल्याण दुर्गाडी खाडीपुलाच्या दोन लेनचे ऑनलाइन लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी दुपारी झाले. मात्र, त्या ...

कल्याण : कल्याण दुर्गाडी खाडीपुलाच्या दोन लेनचे ऑनलाइन लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी दुपारी झाले. मात्र, त्या आधीच पुलाच्या श्रेयवादावरून शिवसेना, भाजप आणि मनसेत लढाई रंगली होती. त्यामुळे लोकार्पणस्थळी पोलिसांनी बंदोबस्त वाढविला होता.

कार्यक्रमस्थळी मनसेचे कार्यकर्ते सकाळी साडेदहा वाजता पोहोचले. त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांना काय काम आहे अशी विचारणा करून पिटाळून लावले. पोलिसांना कुणकुण लागली की, मनसे त्या ठिकाणी काही अनुचित प्रकार करू शकते. कार्यकर्त्यांना पोलिसांनी सांगितले की, या ठिकाणी फालतुगिरी करू नका, अन्यथा गुन्हे दाखल करावे लागतील, असा दम भरल्यावर ते त्या ठिकाणाहून निघून गेले. थोड्या वेळानंतर मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर तेथे आले. त्यांनी आम्ही आंदोलन करणार नाही की, काळे झेंडे दाखविणार नाही. पुलाचे लोकार्पण होत असल्याने आनंद आहे. मात्र, या कामाकरिता मी स्वत: पाठपुरावा केला आहे. कामाची पाहणी करू द्या. त्यावेळी पोलिसांनी केवळ भोईरच पाहणी करतील, त्यांच्यासोबत कार्यकर्ते जाणार नाही, असे सांगितल्याने पोलिसांसोबत भोईर यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी सत्ताधारी शिवसेनेकडून त्यांना कार्यक्रमास बोलाविले गेले नसल्याचे सांगितले.

भोईर यांच्या या वक्तव्यावर शिवसेननेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले की, या पुलाच्या कामासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे याचा पाठपुरावा सुरू होता. त्यामुळे कोणी श्रेय घेण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही. माजी आमदारांना निमंत्रण दिले गेले नाही हा आमचा विषय नाही. हा कार्यक्रम एमएमआरडीएने आयोजित केला असल्याने त्यांनी त्यांना जाब विचारावा.

दरम्यान, एका शैक्षणिक कार्यक्रमानिमित्त कल्याणमध्ये आलेले भाजप खासदार कपिल पाटील यांनी सांगितले की, माझ्या खासदारकीच्या निवडणुकीच्या सभेला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. त्यावेळी त्यांना या पुलाच्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. या समस्येचे गांभीर्य ओळखून त्यांनी या पुलाच्या कामाला मंजुरी दिली होती. कंत्राटदाराच्या दिरंगाईमुळे पूल वेळेत पूर्ण झाला नाही. अन्यथा, या पुलाचे काम फडणवीस यांच्या कारकिर्दीत पूर्ण झाले असते. त्यामुळे श्रेय कोणीही घेऊ द्या हे काम भाजप सरकारच्या कारकिर्दीत झाले आहे.

------------------------