शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीतील अंतर्गत बदल्यांचा प्रस्ताव बासनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 23:58 IST

तपशील देण्यात टाळाटाळ? : राज्य सरकारच्या वेबपोर्टलवर केली तक्रार

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील अनेक अधिकारी एकाच विभागात वर्षानुवर्षे कार्यरत आहेत. संबंधित विभागातील अर्थकारणामुळे त्यांच्या बदल्यांना फाटा दिला जातो. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या कधी होणार, असा सवाल केला जात आहे. दरम्यान, महापालिका आयुक्तांनीही अंतर्गत बदल्या करण्याचे दिलेले आश्वासन कागदावरच राहिले आहे.

महापालिका मुख्यालयात एकाच कार्यलयात तीन वर्षांपेक्षा जास्त काळ अधिकारी कार्यरत आहेत. याप्रकरणी कोणता अधिकारी किती काळ कोणत्या कार्यालयात कार्यरत आहे, याची माहिती राजेश पाटील यांनी माहिती अधिकारात महापालिका प्रशासनाकडे मागितली होती. मात्र, त्यांना ही माहिती अजूनही देण्यात आलेली नाही. त्यामुळे पाटील यांनी राज्य सरकारच्या वेबपोर्टलवर याविरोधात तक्रार केली आहे.

अधिकारी बदली हा विषय प्रशासनाचा धोरणात्मक निर्णय आहे. बदलीसंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. त्यावर आयुक्तांकडून कार्यवाही अपेक्षित आहे. महापालिकेत नागरिकांचा जाहीरनामा लावण्यात आला आहे. एखादा अर्ज दिल्यावर तो किती दिवसात निकाली निघाला पाहिजे. त्या अर्जावर कार्यवाही होत नसल्यास ६० दिवसांनंतर संबंधित तक्रारदार अपिलात जाऊ शकतो किंवा त्याला डीम्ड परवानगी मिळाली, असे समजून त्याने ज्यासाठी परवानगी मागितली आहे. ते काम तो परवानगी मिळाली, असे समजून सुरू करू शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे. पदे रिक्त झाली तसेच अधिकारी, कर्मचारी निवृत्त झाल्यावर त्यांच्या जागी सरकारकडून भरती केली जात नाही. तसेच ज्यांना बढती दिली आहे, त्यांनाही चांगले विभाग दिले जात नाहीत. विभागनिहाय बदल्या होणे गरजेचे आहे, त्याकडे सामान्य प्रशासनासह आयुक्तांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पाटील यांनी केला.सात अधिकारी १० वर्षांपासून एकाच ठिकाणीमहापालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांची यादी मोठी आहे. अतिरिक्त आयुक्तांपासून लिपिकांपर्यंत लाच घेण्याची प्रकरणे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून पकडण्यात आलेली आहेत.आस्थापना, लेखा विभाग, करवसुली, नगररचना, पाणीपुरवठा विभागात सात अधिकारी १० वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. बेकायदा बांधकाम नियंत्रण विभाग, तर भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे.

टॅग्स :thaneठाणेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका