शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

केडीएमसीतील अंतर्गत बदल्यांचा प्रस्ताव बासनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 23:58 IST

तपशील देण्यात टाळाटाळ? : राज्य सरकारच्या वेबपोर्टलवर केली तक्रार

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील अनेक अधिकारी एकाच विभागात वर्षानुवर्षे कार्यरत आहेत. संबंधित विभागातील अर्थकारणामुळे त्यांच्या बदल्यांना फाटा दिला जातो. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या कधी होणार, असा सवाल केला जात आहे. दरम्यान, महापालिका आयुक्तांनीही अंतर्गत बदल्या करण्याचे दिलेले आश्वासन कागदावरच राहिले आहे.

महापालिका मुख्यालयात एकाच कार्यलयात तीन वर्षांपेक्षा जास्त काळ अधिकारी कार्यरत आहेत. याप्रकरणी कोणता अधिकारी किती काळ कोणत्या कार्यालयात कार्यरत आहे, याची माहिती राजेश पाटील यांनी माहिती अधिकारात महापालिका प्रशासनाकडे मागितली होती. मात्र, त्यांना ही माहिती अजूनही देण्यात आलेली नाही. त्यामुळे पाटील यांनी राज्य सरकारच्या वेबपोर्टलवर याविरोधात तक्रार केली आहे.

अधिकारी बदली हा विषय प्रशासनाचा धोरणात्मक निर्णय आहे. बदलीसंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. त्यावर आयुक्तांकडून कार्यवाही अपेक्षित आहे. महापालिकेत नागरिकांचा जाहीरनामा लावण्यात आला आहे. एखादा अर्ज दिल्यावर तो किती दिवसात निकाली निघाला पाहिजे. त्या अर्जावर कार्यवाही होत नसल्यास ६० दिवसांनंतर संबंधित तक्रारदार अपिलात जाऊ शकतो किंवा त्याला डीम्ड परवानगी मिळाली, असे समजून त्याने ज्यासाठी परवानगी मागितली आहे. ते काम तो परवानगी मिळाली, असे समजून सुरू करू शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे. पदे रिक्त झाली तसेच अधिकारी, कर्मचारी निवृत्त झाल्यावर त्यांच्या जागी सरकारकडून भरती केली जात नाही. तसेच ज्यांना बढती दिली आहे, त्यांनाही चांगले विभाग दिले जात नाहीत. विभागनिहाय बदल्या होणे गरजेचे आहे, त्याकडे सामान्य प्रशासनासह आयुक्तांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पाटील यांनी केला.सात अधिकारी १० वर्षांपासून एकाच ठिकाणीमहापालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांची यादी मोठी आहे. अतिरिक्त आयुक्तांपासून लिपिकांपर्यंत लाच घेण्याची प्रकरणे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून पकडण्यात आलेली आहेत.आस्थापना, लेखा विभाग, करवसुली, नगररचना, पाणीपुरवठा विभागात सात अधिकारी १० वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. बेकायदा बांधकाम नियंत्रण विभाग, तर भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे.

टॅग्स :thaneठाणेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका