शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

इम्युनिटी वाढीसाठी तुळस, गवती चहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 23:47 IST

औषधी गुणधर्म असलेल्या रोपांची लागवड : गुणकारी वनस्पतींना नागरिकांची पसंती

अनिरुद्ध पाटील लोकमत न्यूज नेटवर्क बोर्डी :  कोविड संसर्गाचा धोका वाढत आहे. नागरिकांचा शारीरिक व मानसिक तोल डळमळीत झाला आहे. त्यामुळे आजारपणाची जाणीवही मनाला चटका लावून जाणारी आहे. शिवाय, उन्हाळा आग ओकत असताना उलटी, ताप, तसेच नैराश्याची भावना वाढते आहे. या सर्वांवर औषधी वनस्पतींचा वापर गुणकारी ठरत आहे. त्यामुळे त्यांच्या लागवडीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. 

कोरोना आजाराची बरीच लक्षणे सांगितली जातात. सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप, उलटी ही लक्षणे ऋतू बदलाच्या काळातही दिसून येतात. सध्या शहारांप्रमाणेच ग्रामीण भागात रुग्ण वाढत आहेत. त्यांना शारीरिक, मानसिक व्याधींनीही ग्रासले आहे. आजीबाईच्या बटव्यात  लहानसहान आजारांवर औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींच्या पाने, फुले, फळे, साली आणि खोडांच्या भागांपासून आरामदायी रामबाण उपाय आहेत.गुगलवर सर्च केल्यावर कोणत्या वनस्पतींपासून कशा प्रकारचा फायदा होतो, याविषयी माहिती सहज उपलब्ध आहे. संसर्गापासून संरक्षण मिळविण्यासाठी निर्बंध लागू असून, शाळांना सुटी, तर वर्क फ्रॉम होम सुरू आहे. त्यामुळे गरज व विरंगुळा म्हणून औषधी गुणधर्मयुक्त वनस्पतींच्या लागवडीकडे लोकांचा ओढा वाढला आहे. 

या पाच राेपांची वाढली मागणीकोरफड :  थंड प्रकृती, वेदनाशामक, पोट, त्वचा, केस यासाठी ही वनस्पती उपयोगी ठरते. तसेच काेरफडीमुळे पाेटाचे विकार दूर हाेत असल्यामुळे तिचे आयुर्वेदात माेठे महत्त्व आहे. सध्या या वनस्पतीला मागणी वाढल्याचे दिसत आहे. गुळवेल : तापनाशक, प्लेटलेट्स वाढविते, राेग प्रतिकारशक्ती वाढविते. सध्या काेराेनाच्या काळात राेग प्रतिकारशक्तीला महत्त्व आले आहे. त्यामुळे नागरिकांकडून या वनस्पीला घरात स्थान दिले जात असल्यामुळे मागणी वाढली आहे.

गवती चहा : थंड प्रकृती असून, तापशामक आहे. तसेच भूक वाढविते. सध्या कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही हाेत असून, त्यापासून संरक्षण करण्यात गवती चहाचा चांगला उपयाेग हाेत असल्याने नागरिक या वनस्पतीकडे वळत आहेत. अडुळसा : कफ, दमा, अस्थमा, पोटातील जंत यावर प्रभावी औषध. काेराेनाकाळात कफ, दमा यांसारख्या आजारांमुळे भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे अडुळसा घराजवळ असावा म्हणून याची राेपे नागरिक खरेदी करतात.पुदिना : कफ, दमा, तोंडाला चव येण्यासाठी, भूक वाढविणे आदी वात उपयोगी. काेराेनामुळे ताेंडाला चव लागत नसल्याच्या तक्रारी आहेत. पुदिनामुळे ताेंडाची चव टिकविण्यात मदत हाेत आहे. तसेच कफ आणि दम्यासंबंधी आजारावरही आराम मिळत आहे.

तुळस, गवतीचहा, शतावरी, पुदिना अशा विविध औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींबद्दल समाजात जागरूकता निर्माण झाली आहे. शिवाय या रोपांच्या किमती स्वस्त आणि फायदे अधिक असल्याने मागणी असते. - विनीत राऊतनर्सरी मालक, बोरिगाव 

काळाची गरज म्हणून औषधी वनस्पतींची लागवड केली जाते. ग्रामीण भागात परसबागेत, तर शहरात कुंडीत ही रोपे सहज लावता येतात. - स्नेहल पाटील गृहिणी

टॅग्स :thaneठाणेkalyanकल्याण