शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

इम्युनिटी वाढीसाठी तुळस, गवती चहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 23:47 IST

औषधी गुणधर्म असलेल्या रोपांची लागवड : गुणकारी वनस्पतींना नागरिकांची पसंती

अनिरुद्ध पाटील लोकमत न्यूज नेटवर्क बोर्डी :  कोविड संसर्गाचा धोका वाढत आहे. नागरिकांचा शारीरिक व मानसिक तोल डळमळीत झाला आहे. त्यामुळे आजारपणाची जाणीवही मनाला चटका लावून जाणारी आहे. शिवाय, उन्हाळा आग ओकत असताना उलटी, ताप, तसेच नैराश्याची भावना वाढते आहे. या सर्वांवर औषधी वनस्पतींचा वापर गुणकारी ठरत आहे. त्यामुळे त्यांच्या लागवडीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. 

कोरोना आजाराची बरीच लक्षणे सांगितली जातात. सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप, उलटी ही लक्षणे ऋतू बदलाच्या काळातही दिसून येतात. सध्या शहारांप्रमाणेच ग्रामीण भागात रुग्ण वाढत आहेत. त्यांना शारीरिक, मानसिक व्याधींनीही ग्रासले आहे. आजीबाईच्या बटव्यात  लहानसहान आजारांवर औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींच्या पाने, फुले, फळे, साली आणि खोडांच्या भागांपासून आरामदायी रामबाण उपाय आहेत.गुगलवर सर्च केल्यावर कोणत्या वनस्पतींपासून कशा प्रकारचा फायदा होतो, याविषयी माहिती सहज उपलब्ध आहे. संसर्गापासून संरक्षण मिळविण्यासाठी निर्बंध लागू असून, शाळांना सुटी, तर वर्क फ्रॉम होम सुरू आहे. त्यामुळे गरज व विरंगुळा म्हणून औषधी गुणधर्मयुक्त वनस्पतींच्या लागवडीकडे लोकांचा ओढा वाढला आहे. 

या पाच राेपांची वाढली मागणीकोरफड :  थंड प्रकृती, वेदनाशामक, पोट, त्वचा, केस यासाठी ही वनस्पती उपयोगी ठरते. तसेच काेरफडीमुळे पाेटाचे विकार दूर हाेत असल्यामुळे तिचे आयुर्वेदात माेठे महत्त्व आहे. सध्या या वनस्पतीला मागणी वाढल्याचे दिसत आहे. गुळवेल : तापनाशक, प्लेटलेट्स वाढविते, राेग प्रतिकारशक्ती वाढविते. सध्या काेराेनाच्या काळात राेग प्रतिकारशक्तीला महत्त्व आले आहे. त्यामुळे नागरिकांकडून या वनस्पीला घरात स्थान दिले जात असल्यामुळे मागणी वाढली आहे.

गवती चहा : थंड प्रकृती असून, तापशामक आहे. तसेच भूक वाढविते. सध्या कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही हाेत असून, त्यापासून संरक्षण करण्यात गवती चहाचा चांगला उपयाेग हाेत असल्याने नागरिक या वनस्पतीकडे वळत आहेत. अडुळसा : कफ, दमा, अस्थमा, पोटातील जंत यावर प्रभावी औषध. काेराेनाकाळात कफ, दमा यांसारख्या आजारांमुळे भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे अडुळसा घराजवळ असावा म्हणून याची राेपे नागरिक खरेदी करतात.पुदिना : कफ, दमा, तोंडाला चव येण्यासाठी, भूक वाढविणे आदी वात उपयोगी. काेराेनामुळे ताेंडाला चव लागत नसल्याच्या तक्रारी आहेत. पुदिनामुळे ताेंडाची चव टिकविण्यात मदत हाेत आहे. तसेच कफ आणि दम्यासंबंधी आजारावरही आराम मिळत आहे.

तुळस, गवतीचहा, शतावरी, पुदिना अशा विविध औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींबद्दल समाजात जागरूकता निर्माण झाली आहे. शिवाय या रोपांच्या किमती स्वस्त आणि फायदे अधिक असल्याने मागणी असते. - विनीत राऊतनर्सरी मालक, बोरिगाव 

काळाची गरज म्हणून औषधी वनस्पतींची लागवड केली जाते. ग्रामीण भागात परसबागेत, तर शहरात कुंडीत ही रोपे सहज लावता येतात. - स्नेहल पाटील गृहिणी

टॅग्स :thaneठाणेkalyanकल्याण