शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
6
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
7
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
8
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
9
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
10
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
11
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
12
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
13
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
14
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
15
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
16
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
17
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
18
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
19
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
20
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या

आधारची सक्ती ही रस्त्यावरची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 01:33 IST

मतदान कार्ड, पासपोर्टवर आपली सही असते. तशी आधारकार्डवर नाही. मग आधारची गरज काय? खाजगी आयुष्याचा अधिकार सर्वांना आहे

ठाणे : मतदान कार्ड, पासपोर्टवर आपली सही असते. तशी आधारकार्डवर नाही. मग आधारची गरज काय? खाजगी आयुष्याचा अधिकार सर्वांना आहे. परंतु, आधारवरील नंबर घेऊन व्यक्तीचे आजार, सवयी, त्याच्या इतर गोष्टींची माहिती काढली जाते. एकंदरीतच टेक्नॉलॉजिने सामाजिक प्रश्न सुटत नाहीत तर उलट माणसांना यंत्र बनविले जात आहे. सर्वोच्च न्यायालय आधार कार्डची बहुदा सक्ती करणार नाही अशी अपेक्षा आहे. परंतु, हा रस्त्यावरच्या लढाईचा विषय असून याविरोधात एकत्र आलेच पाहिजे, असे मत अ‍ॅड.कामायनी बाली यांनी व्यक्त केले.आधार कार्ड योजना सुरक्षित नसल्याचे खुद्द केंद्र सरकारने कबूल केल्यानंतर देशात ब्रेक आधार चेन्स नावाची मोहिम सुरू आहे. याचा एक भाग म्हणून मंगळवारी ठाण्यात मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात आधार कार्ड लिंक तोडा- जागरण व मार्गदर्शन सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी अनिल शालिग्राम होते. यावेळी अ‍ॅड. बाली यांच्यासह बायोमेट्रिक तज्ज्ञ जे.डिसुझाही उपस्थित होते.आधारच्या माध्यमातून व्यक्तीची कोणतीही माहिती खाजगी राहत नाही, ही मुख्य समस्या आहे. ती इलेक्ट्रॉनिक माध्यमातून विविध कंपन्यांना राउटरद्वारे मिळत राहते. त्याची एक फार मोठी चेन तयार होते. ही माहिती विकली जाण्याचीही शक्यता आहे. एक आधार कार्ड काढल्यावर संपूर्ण माहिती जगात जाते. म्हणून आधार हा योग्य पर्याय नाही, असे डिसुझा यांनी सांगितले. तर बोटाचे ठसे, डोळ्यांचे फोटो हेदेखील युनिक नाहीत हे सांगताना डिसुझा यांनी स्पष्टीकरण दिले. डोळ्यांचे फोटो काढून बरोबर मध्यभागी पिनने भोक पाडले व ज्याला ते वापरायचे त्यांनी आपल्या डोळ्यासमोर धरून स्कॅन केले तेव्हा त्याचे डोळे हे ओरिजिनल माणसांसारखे स्कॅन झाले. त्यामुळे डोळ्यांचेही डुप्लिकेट करता येते. आणि असेच डुप्लिकेट वापरून साडेतीन वर्षे गुजरातमध्ये रेशन घोटाळा झाल्याचे डिसुझा यांनी सांगितले.