शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आधारची सक्ती ही रस्त्यावरची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 01:33 IST

मतदान कार्ड, पासपोर्टवर आपली सही असते. तशी आधारकार्डवर नाही. मग आधारची गरज काय? खाजगी आयुष्याचा अधिकार सर्वांना आहे

ठाणे : मतदान कार्ड, पासपोर्टवर आपली सही असते. तशी आधारकार्डवर नाही. मग आधारची गरज काय? खाजगी आयुष्याचा अधिकार सर्वांना आहे. परंतु, आधारवरील नंबर घेऊन व्यक्तीचे आजार, सवयी, त्याच्या इतर गोष्टींची माहिती काढली जाते. एकंदरीतच टेक्नॉलॉजिने सामाजिक प्रश्न सुटत नाहीत तर उलट माणसांना यंत्र बनविले जात आहे. सर्वोच्च न्यायालय आधार कार्डची बहुदा सक्ती करणार नाही अशी अपेक्षा आहे. परंतु, हा रस्त्यावरच्या लढाईचा विषय असून याविरोधात एकत्र आलेच पाहिजे, असे मत अ‍ॅड.कामायनी बाली यांनी व्यक्त केले.आधार कार्ड योजना सुरक्षित नसल्याचे खुद्द केंद्र सरकारने कबूल केल्यानंतर देशात ब्रेक आधार चेन्स नावाची मोहिम सुरू आहे. याचा एक भाग म्हणून मंगळवारी ठाण्यात मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात आधार कार्ड लिंक तोडा- जागरण व मार्गदर्शन सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी अनिल शालिग्राम होते. यावेळी अ‍ॅड. बाली यांच्यासह बायोमेट्रिक तज्ज्ञ जे.डिसुझाही उपस्थित होते.आधारच्या माध्यमातून व्यक्तीची कोणतीही माहिती खाजगी राहत नाही, ही मुख्य समस्या आहे. ती इलेक्ट्रॉनिक माध्यमातून विविध कंपन्यांना राउटरद्वारे मिळत राहते. त्याची एक फार मोठी चेन तयार होते. ही माहिती विकली जाण्याचीही शक्यता आहे. एक आधार कार्ड काढल्यावर संपूर्ण माहिती जगात जाते. म्हणून आधार हा योग्य पर्याय नाही, असे डिसुझा यांनी सांगितले. तर बोटाचे ठसे, डोळ्यांचे फोटो हेदेखील युनिक नाहीत हे सांगताना डिसुझा यांनी स्पष्टीकरण दिले. डोळ्यांचे फोटो काढून बरोबर मध्यभागी पिनने भोक पाडले व ज्याला ते वापरायचे त्यांनी आपल्या डोळ्यासमोर धरून स्कॅन केले तेव्हा त्याचे डोळे हे ओरिजिनल माणसांसारखे स्कॅन झाले. त्यामुळे डोळ्यांचेही डुप्लिकेट करता येते. आणि असेच डुप्लिकेट वापरून साडेतीन वर्षे गुजरातमध्ये रेशन घोटाळा झाल्याचे डिसुझा यांनी सांगितले.