शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

आधारची सक्ती ही रस्त्यावरची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 01:33 IST

मतदान कार्ड, पासपोर्टवर आपली सही असते. तशी आधारकार्डवर नाही. मग आधारची गरज काय? खाजगी आयुष्याचा अधिकार सर्वांना आहे

ठाणे : मतदान कार्ड, पासपोर्टवर आपली सही असते. तशी आधारकार्डवर नाही. मग आधारची गरज काय? खाजगी आयुष्याचा अधिकार सर्वांना आहे. परंतु, आधारवरील नंबर घेऊन व्यक्तीचे आजार, सवयी, त्याच्या इतर गोष्टींची माहिती काढली जाते. एकंदरीतच टेक्नॉलॉजिने सामाजिक प्रश्न सुटत नाहीत तर उलट माणसांना यंत्र बनविले जात आहे. सर्वोच्च न्यायालय आधार कार्डची बहुदा सक्ती करणार नाही अशी अपेक्षा आहे. परंतु, हा रस्त्यावरच्या लढाईचा विषय असून याविरोधात एकत्र आलेच पाहिजे, असे मत अ‍ॅड.कामायनी बाली यांनी व्यक्त केले.आधार कार्ड योजना सुरक्षित नसल्याचे खुद्द केंद्र सरकारने कबूल केल्यानंतर देशात ब्रेक आधार चेन्स नावाची मोहिम सुरू आहे. याचा एक भाग म्हणून मंगळवारी ठाण्यात मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात आधार कार्ड लिंक तोडा- जागरण व मार्गदर्शन सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी अनिल शालिग्राम होते. यावेळी अ‍ॅड. बाली यांच्यासह बायोमेट्रिक तज्ज्ञ जे.डिसुझाही उपस्थित होते.आधारच्या माध्यमातून व्यक्तीची कोणतीही माहिती खाजगी राहत नाही, ही मुख्य समस्या आहे. ती इलेक्ट्रॉनिक माध्यमातून विविध कंपन्यांना राउटरद्वारे मिळत राहते. त्याची एक फार मोठी चेन तयार होते. ही माहिती विकली जाण्याचीही शक्यता आहे. एक आधार कार्ड काढल्यावर संपूर्ण माहिती जगात जाते. म्हणून आधार हा योग्य पर्याय नाही, असे डिसुझा यांनी सांगितले. तर बोटाचे ठसे, डोळ्यांचे फोटो हेदेखील युनिक नाहीत हे सांगताना डिसुझा यांनी स्पष्टीकरण दिले. डोळ्यांचे फोटो काढून बरोबर मध्यभागी पिनने भोक पाडले व ज्याला ते वापरायचे त्यांनी आपल्या डोळ्यासमोर धरून स्कॅन केले तेव्हा त्याचे डोळे हे ओरिजिनल माणसांसारखे स्कॅन झाले. त्यामुळे डोळ्यांचेही डुप्लिकेट करता येते. आणि असेच डुप्लिकेट वापरून साडेतीन वर्षे गुजरातमध्ये रेशन घोटाळा झाल्याचे डिसुझा यांनी सांगितले.