शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

‘बारवी’ग्रस्तांनी एमआयडीसी मुख्यालयावर दिली धडक; ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 00:57 IST

चर्चेची पहिली फेरी निष्फळ

अंबरनाथ : बारवी विस्तारीकरणात विस्थापित झालेल्या तळ्याची वाडी, देवराळ वाडी आणि कोळे वडखळ येथील ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. त्यामुळे या तीन गावांतील ग्रामस्थांनी बुधवारपासून अंबरनाथ येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्यालयाबाहेर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. सायंकाळपर्यंत या आंदोलकांशी एमआयडीसी अधिकाऱ्यांची चर्चा सुरू होती. मात्र चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरली आहे.

बारवी धरणाच्या विस्तारीकरणाचा तिसरा टप्पा २०१९ मध्ये पूर्ण झाला असून त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शहरांना अतिरिक्त पाणी उपलब्ध झाले आहे. मात्र धरणामुळे विस्थापित झालेल्या कोळे वडखळ, तळ्याची वाडी आणि देवराळवाडी या गावातील ग्रामस्थांचे पुनर्वसन अद्याप पूर्ण झालेले नाही. वडखळ येथील ग्रामस्थांना त्यांच्या सोयीच्या ठिकाणी पुनर्वसन करण्यास एमआयडीसी प्रशासनाने नकार दिला आहे. तळ्याची वाडी आणि देवराळवाडी या गावांचे नाव धरणग्रस्त म्हणून एमआयडीसी प्रशासनाच्या लेखीसुद्धा नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांना धरणाच्या विस्तारीकरणामुळे वाढलेल्या पाण्याचा फटका बसत असून ग्रामस्थ पाण्याने तीन बाजूंनी वेढले जात आहेत. चौथ्या बाजूला जंगल असल्याने त्यातून त्यांना मार्ग काढावा लागतो आहे. त्यामुळे पुनर्वसनाच्या मागणीसाठी बुधवारपासून या तीन गावांतील ग्रामस्थांनी श्रमिक मुक्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली अंबरनाथच्या एमआयडीसी मुख्यालयाबाहेर बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात केली. या वेळी ग्रामस्थ विविध गाणी गात एमआयडीसी प्रशासनाचा निषेध करताना दिसले. आंदोलनावेळी अंबरनाथ पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त पाहायला मिळाला. एमआयडीसी  त्यांना मुख्यालयात प्रवेश  दिला नाही.

तयारीनिशी उतरले आंदोलनातपुनर्वसनाच्या मागणीसाठी मुरबाड तालुक्यातील कोळे वडखळ, तळ्याची वाडी आणि देवराळ वाडी या गावांतून सुमारे अडीचशे गावकरी ठिय्या आंदोलनासाठी अंबरनाथमध्ये आले आहेत. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि महिला या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. ग्रामस्थ पुढच्या काही दिवसांची तयारी करूनच आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत.