शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या जंगलांपर्यंत भारताला मारले'; पाकिस्तानी नेत्याची विधानसभेत जाहीर कबुली
2
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
3
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
4
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
5
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
6
नितीश कुमार 10व्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री; NDA च्या बैठकीत शिक्कामोर्तब, उद्या शपथविधी
7
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
8
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
9
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
10
शिंदे शिवसेना की भाजपने घातला पहिला घाव? परस्परांचे माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा
11
“महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा”: काँग्रेस
12
'धुरंधर' चित्रपटाचा ट्रेलर पाहून ध्रुव राठी संतापला; थेट ISIS शी केली तुलना, म्हणाला...
13
'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला दिलाय मोठा दणका; ६ महिन्यांनंतरही 'नूर खान एअरबेस' पूर्ववत होईना!
14
पाकिस्तानमुळे मोठे आर्थिक नुकसान, आम्हाला चीन..; एअर इंडियाची केंद्र सरकारकडे 'ही' मागणी
15
'मिसेस देशपांडे'मध्ये दिसणार माधुरी दीक्षित, केली नव्या सीरिजची घोषणा; सोबत मराठी अभिनेता
16
सूडाची भावना! पत्नीचे पुतण्याशी संबंध; पतीला समजताच झाडल्या गोळ्या, स्वत:लाही संपवलं
17
काय आहे ही 'टीना', नफा घटला तरीही एलजीचे शेअर्स ४ टक्क्यांनी वाढले; ब्रोकर्सनी दिले मोठे टार्गेट...
18
जैश-ए-मोहम्मदची परिस्थिती बिघडली, दहशतवाद्यांना थंडीपासून वाचवण्यासाठी पैसे मागण्याची आली वेळ
19
काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; बैठकीत काय ठरले? सुप्रिया सुळेंनी दिली मोठी अपडेट
20
₹३८ च्या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला ५८८४% परतावा! काय आहे कंपनीचा व्यवसाय?
Daily Top 2Weekly Top 5

‘बारवी’ग्रस्तांनी एमआयडीसी मुख्यालयावर दिली धडक; ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 00:57 IST

चर्चेची पहिली फेरी निष्फळ

अंबरनाथ : बारवी विस्तारीकरणात विस्थापित झालेल्या तळ्याची वाडी, देवराळ वाडी आणि कोळे वडखळ येथील ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. त्यामुळे या तीन गावांतील ग्रामस्थांनी बुधवारपासून अंबरनाथ येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्यालयाबाहेर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. सायंकाळपर्यंत या आंदोलकांशी एमआयडीसी अधिकाऱ्यांची चर्चा सुरू होती. मात्र चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरली आहे.

बारवी धरणाच्या विस्तारीकरणाचा तिसरा टप्पा २०१९ मध्ये पूर्ण झाला असून त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शहरांना अतिरिक्त पाणी उपलब्ध झाले आहे. मात्र धरणामुळे विस्थापित झालेल्या कोळे वडखळ, तळ्याची वाडी आणि देवराळवाडी या गावातील ग्रामस्थांचे पुनर्वसन अद्याप पूर्ण झालेले नाही. वडखळ येथील ग्रामस्थांना त्यांच्या सोयीच्या ठिकाणी पुनर्वसन करण्यास एमआयडीसी प्रशासनाने नकार दिला आहे. तळ्याची वाडी आणि देवराळवाडी या गावांचे नाव धरणग्रस्त म्हणून एमआयडीसी प्रशासनाच्या लेखीसुद्धा नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांना धरणाच्या विस्तारीकरणामुळे वाढलेल्या पाण्याचा फटका बसत असून ग्रामस्थ पाण्याने तीन बाजूंनी वेढले जात आहेत. चौथ्या बाजूला जंगल असल्याने त्यातून त्यांना मार्ग काढावा लागतो आहे. त्यामुळे पुनर्वसनाच्या मागणीसाठी बुधवारपासून या तीन गावांतील ग्रामस्थांनी श्रमिक मुक्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली अंबरनाथच्या एमआयडीसी मुख्यालयाबाहेर बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात केली. या वेळी ग्रामस्थ विविध गाणी गात एमआयडीसी प्रशासनाचा निषेध करताना दिसले. आंदोलनावेळी अंबरनाथ पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त पाहायला मिळाला. एमआयडीसी  त्यांना मुख्यालयात प्रवेश  दिला नाही.

तयारीनिशी उतरले आंदोलनातपुनर्वसनाच्या मागणीसाठी मुरबाड तालुक्यातील कोळे वडखळ, तळ्याची वाडी आणि देवराळ वाडी या गावांतून सुमारे अडीचशे गावकरी ठिय्या आंदोलनासाठी अंबरनाथमध्ये आले आहेत. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि महिला या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. ग्रामस्थ पुढच्या काही दिवसांची तयारी करूनच आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत.