शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
4
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
5
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
6
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
7
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
8
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
9
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
10
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
11
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
12
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
13
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
14
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
15
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
16
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
17
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
18
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
19
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
20
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!

‘बारवी’ग्रस्तांनी एमआयडीसी मुख्यालयावर दिली धडक; ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 00:57 IST

चर्चेची पहिली फेरी निष्फळ

अंबरनाथ : बारवी विस्तारीकरणात विस्थापित झालेल्या तळ्याची वाडी, देवराळ वाडी आणि कोळे वडखळ येथील ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. त्यामुळे या तीन गावांतील ग्रामस्थांनी बुधवारपासून अंबरनाथ येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्यालयाबाहेर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. सायंकाळपर्यंत या आंदोलकांशी एमआयडीसी अधिकाऱ्यांची चर्चा सुरू होती. मात्र चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरली आहे.

बारवी धरणाच्या विस्तारीकरणाचा तिसरा टप्पा २०१९ मध्ये पूर्ण झाला असून त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शहरांना अतिरिक्त पाणी उपलब्ध झाले आहे. मात्र धरणामुळे विस्थापित झालेल्या कोळे वडखळ, तळ्याची वाडी आणि देवराळवाडी या गावातील ग्रामस्थांचे पुनर्वसन अद्याप पूर्ण झालेले नाही. वडखळ येथील ग्रामस्थांना त्यांच्या सोयीच्या ठिकाणी पुनर्वसन करण्यास एमआयडीसी प्रशासनाने नकार दिला आहे. तळ्याची वाडी आणि देवराळवाडी या गावांचे नाव धरणग्रस्त म्हणून एमआयडीसी प्रशासनाच्या लेखीसुद्धा नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांना धरणाच्या विस्तारीकरणामुळे वाढलेल्या पाण्याचा फटका बसत असून ग्रामस्थ पाण्याने तीन बाजूंनी वेढले जात आहेत. चौथ्या बाजूला जंगल असल्याने त्यातून त्यांना मार्ग काढावा लागतो आहे. त्यामुळे पुनर्वसनाच्या मागणीसाठी बुधवारपासून या तीन गावांतील ग्रामस्थांनी श्रमिक मुक्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली अंबरनाथच्या एमआयडीसी मुख्यालयाबाहेर बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात केली. या वेळी ग्रामस्थ विविध गाणी गात एमआयडीसी प्रशासनाचा निषेध करताना दिसले. आंदोलनावेळी अंबरनाथ पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त पाहायला मिळाला. एमआयडीसी  त्यांना मुख्यालयात प्रवेश  दिला नाही.

तयारीनिशी उतरले आंदोलनातपुनर्वसनाच्या मागणीसाठी मुरबाड तालुक्यातील कोळे वडखळ, तळ्याची वाडी आणि देवराळ वाडी या गावांतून सुमारे अडीचशे गावकरी ठिय्या आंदोलनासाठी अंबरनाथमध्ये आले आहेत. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि महिला या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. ग्रामस्थ पुढच्या काही दिवसांची तयारी करूनच आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत.