शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

यंदाच्या पावसाळ्यात बारवीत वाढीव पाणी

By admin | Updated: May 7, 2016 00:43 IST

बारवी धरणाची उंची वाढविण्याचे काम पूर्ण झाले असून फक्त दरवाजे बसविणे शिल्लक आहे. ते काम महिनाअखेरीस सुरू होईल. त्यामुळे यंदाच्या पावसाळ््या बारवी धरणात जादा पाणी

डोंबिवली : बारवी धरणाची उंची वाढविण्याचे काम पूर्ण झाले असून फक्त दरवाजे बसविणे शिल्लक आहे. ते काम महिनाअखेरीस सुरू होईल. त्यामुळे यंदाच्या पावसाळ््या बारवी धरणात जादा पाणी साठविण्यास सुरूवात होईल. त्यामुळे ४० टक्के जादा साठा उपलब्ध होणार असून पुढच्या वर्षी पाणीटंचाईची स्थिती राहणार नाही, अशी माहिती एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता प्रकाश लोणकर यांनी दिली. या वेळी डोंबिवली एमआयडीसीचे प्रमुख अभियंता शंकर जगताप आणि संजीव साळवे उपस्थित होते. डोंबिवली पत्रकार संघाच्यावतीने शुक्रवारी बारवी धरणाची सद्यस्थिती आणि विस्थापितांचे पुनर्वसन यांची पाहणी करण्यासाठी दौरा झाला. तेव्हा पत्रकारांना माहिती देताना लोणकर आणि जगताप यांनी सांगितले, धरणाची उंची तीन मीटरने वाढवली आहे. पाणी साठवल्याने विस्थापित होणाऱ्या काचकोली आणि तोंडली गावातील ४० कुटुंबांसाठी गावठाणात संक्र मण शिबिराची सोय करणार आहे. धरणाची उंची वाढविल्याने सहा गावे आणि पाच पाड्यांमधील १७८ कुटुंबियांचे पुनर्वसन केले जाणार आहे. काहींनी नोकरी आणि जमिनीच्या मूल्यांकनावरून स्थलांतरित होण्यास विरोध केला आहे. या गावांचे सर्वेक्षण २००९ मध्ये केले होते. मात्र आता २०१४ च्या बाजारभावाने घराचे पैसे हवे आहेत. पूर्वी ७६५ कुटुंबीय होते. ती आता ११०५ झाली आहेत. तसेच प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबियांना केडीएमसी आणि ठाणे महापालिकेत नोकरीची हमी हवी आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सध्या बारवी धरणालगत वीजनिर्मिती प्रकल्प सुरु असून त्यातून १.१ मेगावॅट वीज तयार होऊन वॉटर फिल्टर प्लांटसाठी वापरली जाते. (प्रतिनिधी)यंदा जादा पाणीसध्या बारवी धरणात ४३.११ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी याच दिवसापर्यंत ४२.९६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता. पूर्वी बारवी धरणाची उंची ६५.६० इतकी होती. ती आता ६८.६० इतकी झाली आहे. यामुळे धरणात २३२.५० दशलक्ष घनमीटरपर्यंत पाणीसाठा वाढणार आहे. धरणात ११ नवीन वक्र ाकार दरवाजे लावण्याचे काम सुरू असून ते या महिन्याभरात सुरु करण्यात येतील असे जगताप यांनी सांगितले.