शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गणवेशासाठी बँक खात्याची अट सरकारकडून रद्द; विद्यार्थी-पालकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 23:46 IST

खरेदीचे अधिकार मुख्याध्यापक, शालेय व्यवस्थापन समितीला

जान्हवी मौर्ये डोंबिवली : जिल्हा परिषदेच्या शाळेतील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांना सरकारकडून मोफत गणवेश मिळवण्यासाठी दोन वर्षांपासून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) योजनेंतर्गत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे संयुक्त खाते राष्ट्रीयीकृत बँकेत काढावे लागत होते. परंतु, विद्यार्थ्यांना गणवेश मिळवण्यास दिरंगाई होत असल्याने सरकारने या योजनेंतर्गत गणवेश ही बाब कायमस्वरूपी वगळली आहे. सरकारच्या नव्या नियमांनुसार संयुक्त खाते काढण्याची गरज नसल्याने विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे.

विद्यार्थ्यांचे पालकांसह संयुक्त खाते काढण्याची जाचक अट टाकल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना मनस्ताप सोसावा लागत होता. झीरो बॅलन्सवर विद्यार्थ्यांचे खाते उघडल्यानंतर एसएमएस, जीएसटी व किमान शुल्क रकमेच्या वजावटीमुळे विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्यासाठी दिरंगाई होत होती.

जिल्हा परिषदेच्या शाळांत ८१ हजार विद्यार्थी आहेत. यातील १० हजार विद्यार्थी वगळता इतर सर्व विद्यार्थी लाभार्थी आहेत. त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्व मुलींचा समावेश आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण समिती सदस्य सुभाष पवार यांनी २०१८ मध्ये सर्वांना गणवेश देण्याचे कबूल केले होते. त्यासाठी ६० लाखांची तरतूदही केली होती. त्यानुसार, गणवेश देण्यात आले. परंतु, या गणवेशाची रक्कम उशिराने आली. शिवाय, विद्यार्थ्यांना एकाच गणवेशाचे पैसे मिळाले. जिल्ह्यातील कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, शहापूर, मुरबाड या तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे गणवेश हे वेगवेगळे आहे. सर्व शाळांचे गणवेश हे एकसमान असावे, यासाठी शिक्षक संघटनांनी मागणी केली होती. मात्र, त्याला यश आलेले नाही.

सर्व विद्यार्थ्यांची बँक खाती नाहीतसरकारने २०१६ मध्ये विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी झीरो बॅलन्स खात्याची अट होती. मात्र, एखाद्या खात्यावर पैसे जमा झाले की, वर्षभर कोणताही व्यवहार होत नव्हता. काही मुलांचे पालक परराज्यांतून कामानिमित्त येथे आली आहेत. त्यांच्याकडे योग्य कागदपत्रे नसल्याने त्यांची खाती उघडली गेली नाहीत. बँक खात्यातून जीएसटी तसेच किमान शुल्क वजावट केल्याने काही विद्यार्थ्यांपर्यंत गणवेशाची रक्कम पोहोचलीच नव्हती.

दोन गणवेशांसाठी ६०० रुपयेदोन गणवेशांसाठी तीन वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांना ४०० रुपये अनुदान मिळत होते. मात्र, इतक्या अल्प रकमेत गणवेशाचे कापड घेऊन शिवणे शक्य नसल्याने सरकारने दोन वर्षांपूर्वी या रकमेत २०० रुपयांची वाढ केली आहे. एका गणवेशासाठी ३०० रुपये याप्रमाणे आता दोन गणवेशांसाठी विद्यार्थ्यांना ६०० रुपये मिळणार आहेत.