शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

गणवेशासाठी बँक खात्याची अट सरकारकडून रद्द; विद्यार्थी-पालकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 23:46 IST

खरेदीचे अधिकार मुख्याध्यापक, शालेय व्यवस्थापन समितीला

जान्हवी मौर्ये डोंबिवली : जिल्हा परिषदेच्या शाळेतील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांना सरकारकडून मोफत गणवेश मिळवण्यासाठी दोन वर्षांपासून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) योजनेंतर्गत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे संयुक्त खाते राष्ट्रीयीकृत बँकेत काढावे लागत होते. परंतु, विद्यार्थ्यांना गणवेश मिळवण्यास दिरंगाई होत असल्याने सरकारने या योजनेंतर्गत गणवेश ही बाब कायमस्वरूपी वगळली आहे. सरकारच्या नव्या नियमांनुसार संयुक्त खाते काढण्याची गरज नसल्याने विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे.

विद्यार्थ्यांचे पालकांसह संयुक्त खाते काढण्याची जाचक अट टाकल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना मनस्ताप सोसावा लागत होता. झीरो बॅलन्सवर विद्यार्थ्यांचे खाते उघडल्यानंतर एसएमएस, जीएसटी व किमान शुल्क रकमेच्या वजावटीमुळे विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्यासाठी दिरंगाई होत होती.

जिल्हा परिषदेच्या शाळांत ८१ हजार विद्यार्थी आहेत. यातील १० हजार विद्यार्थी वगळता इतर सर्व विद्यार्थी लाभार्थी आहेत. त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्व मुलींचा समावेश आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण समिती सदस्य सुभाष पवार यांनी २०१८ मध्ये सर्वांना गणवेश देण्याचे कबूल केले होते. त्यासाठी ६० लाखांची तरतूदही केली होती. त्यानुसार, गणवेश देण्यात आले. परंतु, या गणवेशाची रक्कम उशिराने आली. शिवाय, विद्यार्थ्यांना एकाच गणवेशाचे पैसे मिळाले. जिल्ह्यातील कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, शहापूर, मुरबाड या तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे गणवेश हे वेगवेगळे आहे. सर्व शाळांचे गणवेश हे एकसमान असावे, यासाठी शिक्षक संघटनांनी मागणी केली होती. मात्र, त्याला यश आलेले नाही.

सर्व विद्यार्थ्यांची बँक खाती नाहीतसरकारने २०१६ मध्ये विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी झीरो बॅलन्स खात्याची अट होती. मात्र, एखाद्या खात्यावर पैसे जमा झाले की, वर्षभर कोणताही व्यवहार होत नव्हता. काही मुलांचे पालक परराज्यांतून कामानिमित्त येथे आली आहेत. त्यांच्याकडे योग्य कागदपत्रे नसल्याने त्यांची खाती उघडली गेली नाहीत. बँक खात्यातून जीएसटी तसेच किमान शुल्क वजावट केल्याने काही विद्यार्थ्यांपर्यंत गणवेशाची रक्कम पोहोचलीच नव्हती.

दोन गणवेशांसाठी ६०० रुपयेदोन गणवेशांसाठी तीन वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांना ४०० रुपये अनुदान मिळत होते. मात्र, इतक्या अल्प रकमेत गणवेशाचे कापड घेऊन शिवणे शक्य नसल्याने सरकारने दोन वर्षांपूर्वी या रकमेत २०० रुपयांची वाढ केली आहे. एका गणवेशासाठी ३०० रुपये याप्रमाणे आता दोन गणवेशांसाठी विद्यार्थ्यांना ६०० रुपये मिळणार आहेत.