शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

कोपरीत सिंधी समाजाने पाळला बंद, आव्हाड यांनी केलेल्या आक्षेर्पाह विधानानंतर कोपरीत पडसाद

By अजित मांडके | Updated: June 5, 2023 16:11 IST

शांततेच्या मार्गाने हाताला काळ्या फिती लावून सिंधी बांधवांनी हा बंद पाळला होता.

ठाणे : उल्हासनगर येथे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सिंधी समाजाबाबत केलेल्या आक्षेर्पाह विधानानंतर सोमवारी ठाण्यातील कोपरी भागातील सिंधी समाजाने मार्केट बंदची हाक दिली होती. शांततेच्या मार्गाने हाताला काळ्या फिती लावून सिंधी बांधवांनी हा बंद पाळला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत, एसआयटीची नियुक्ती करुन आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याची फोरेन्सीक अथवा सायबर तज्ञाद्वारे आॅडीओ व व्हिडीओ क्लीपची तपासणी करुन त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली.

मागील महिन्यात उल्हासनगर भागात एका कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना आव्हाड यांनी हे आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. आव्हाड यांचा हा व्हिडीओ मॉर्फ करण्यात आल्याचा दावा राष्टÑवादीने केला आहे. परंतु तो कुठेही मॉर्फ केला गेल्याचे दिसत नसल्याचे सिंधी बांधवांची भावना आहे. त्यानुसार सोमवारी कोपरीत ठाणे रहिवासी सिंधी समाजाच्या वतीने कोपरीतील दुकाने, मार्केट बंद ठेवले होते. या प्रकरणाची चौकशी करुन आव्हाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील निवदेन देण्यात आले.

शांततेच्या मार्गाने झालेल्या या बंद आंदोलनात सिंधी बांधवांना हाताला काळ्या फिती लावून याचा निषेध देखील केला. यावेळी आव्हाड यांच्या व्हिडीओ क्लिपची सतत्या तपासून पहावी, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, तसेच या प्रकरणाची सत्यता पडताळण्यासाठी आव्हाड यांची ब्रेन मॅपिंग टेस्ट व नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.