शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

अभिनय कट्ट्यावर जमली 'बालझुंबड' : बालकलाकारांनी सादर केले 'शुभम करोती म्हणा' 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 16:28 IST

अभिनय कट्टा नवोदित कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ.इथे कलाकारांच्या अंतर्गत कलागुणांना वाव मिळतोच सोबत माणूस म्हणून कलाकार जास्तीत जास्त प्रगल्भ होतो.

ठळक मुद्देअभिनय कट्ट्यावर जमली 'बालझुंबड'बालकलाकारांनी सादर केले 'शुभम करोती म्हणा' शाळा बालकलाकारांची म्हणजे एक आगळावेगळा समर कॅम्प

ठाणे :  बालकलाकारांसाठी अभिनय कट्ट्यावर विशेष बालसंस्कारशास्त्र हा विशेष उपक्रम राबविला जातो.त्यात अभिनय,नृत्य,संगीत,निसर्ग,खेळ,अभ्यास,योग असे विविध संस्कार बालकलाकारांवर केले जातात.मे महिन्याच्या सुट्टीचा योग्य विनियोग करण्यासाठी ठाणे व मुंबईतील बालकलाकारांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध होती ती म्हणजे अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली *'शाळा बालकलाकारांची'.* 

        शाळा बालकलाकारांची म्हणजे एक आगळावेगळा समर कॅम्प जिथे मुलांच्या अभिनय नृत्य ह्या शाळेत कलागुणांसोबत किल्ल्याचं महत्व,मैदानी खेळ,बौद्धिक खेळ,खेळ भातुकलीचा,नाटक आणि मराठी साहित्याच महत्व आशा विविध विषय मनोरंजक रित्या शिकवण्यात आल्या.पहिल्या वर्गाच्या यशस्वी पुर्ततेनंतर लोकाग्रहास्तव दुसऱ्या वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.अभिनय कट्ट्याच्या शाळा बालकलाकारांची च्या दुसऱ्या वर्गातील बालकलाकारांनी अभिनय कट्टा क्रमांक ४३१ वर 'बालझुंबड' सादर करून धम्माल उडवली.  बालझुंबड चे विशेष आकर्षण होते ते अभिनय कट्टा संस्थापक अध्यक्ष किरण नाकती लिखित आणि दिग्दर्शित बालनाट्य 'शुभम करोती म्हणा'.* *पाश्चात्य संस्कृतीकडे झुकणाऱ्या लहान तसेच तरुणपिढीला आपल्या संस्कृतीची खरी ओळख करून देने म्हणजे 'शुभम करोती म्हणा' बालनाट्य.* *शाळेतील स्नेहसंमेलनात इंग्रजी गाण्यावर थिरकणाऱ्या बच्चेकंपनीना शाळेतील शिक्षक मराठी संस्कृतीची ओळख करून देणारा कार्यक्रम करायला लावतात.* *त्यातूनच मुलांना आपल्या संस्कृतीचा इतिहास समजून येतो.* *सदर बालनाट्यात शर्वरी पंच,ऋषिकेश काटे,अमेय कुलकर्णी , आरोही खानखोजे ह्यांनी विद्यार्थ्यांची; श्लोक  पंच ,पार्थिवी भागवत,परी थोरात,लानी थोरात ह्यांनी शिक्षकांची भूमिका साकारली.*

*मनन मादुसकर व समृद्धी सावंत ह्यांनी शेतकरी,मन्सव मादुसकर ह्यांने लोकमान्य टिळक,स्वरा जोशी हिने सावित्रीबाई फुले,यशिका चौहान हिने झाशीची राणी लक्ष्मीबाई ह्यांची भूमिका साकारली.सादर बालनाट्याचे संगीत श्रेयस साळुंके आणि प्रकाशयोजना वैभव चौधरी ह्यांनी केले.

      मराठी साहित्य संवर्धनासाठी शालेय पाठयपुस्तकातील कविता व धड्यांचे वाचन 'शाळा बालकलाकारांची' मधील महत्वाचा उपक्रम होता. *शर्वरी पंच हिने 'सत्यम शिवम सुंदरम', परी थोरात हिने 'प्रश्न', आरोही खानखोजे हिने 'डराव डराव', मनन मादुसकर ह्याने 'चिऊताईच्या पिला', अमेय कुलकर्णी ह्याने 'येरे येरे पावसा', ऋषिकेश काटे ह्याने 'टप टप पडती ', यशिका चौहान हिने 'नाच रे मोरा' आणि मनस्व मादुसकर ह्याने 'कावळ्याची चोच' आणि चित्रांश पांचाळ ह्याने सांग सांग भोलानाथ ह्या कवितांचे सादरीकरण केले.  शाळा बालकलाकारांची मधील मुलांच्या अनुभवाबद्दल आणि त्यांच्या सादरीकरण खरच खूप सुंदर होती.अभिनय नृत्यासोबत इतिहास, साहित्य,आणि संस्कारच्या संवर्धनाचा प्रयत्न शाळा बालकलाकारांची मध्ये करण्यात आला तो खरच कौतुकास्पद आहे असे मत बालकलाकारांच्या पालकांनी व्यक्त केले.

    *बालकलाकारांची शाळा वर्ग १ च्या यशानंतर लोकाग्रहात्सव आम्ही वर्ग २ चे आयोजन केले.मे महिन्याच्या सुट्टीत विविध समर कॅम्प असतात परंतु शाळा बालकलाकारांची मार्फत आम्ही येणाऱ्या पिढीला आपला इतिहास, आपलं साहित्य ,आपले संस्कार माहीत करून देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला.मुलांमधील कलागुण त्यांच्यातील ऊर्जा ह्यांना योग्य मार्गदर्शन मिळवून देण्याचा एक प्रयत्न शाळा आम्ही शाळा बालकलाकारांची च्या दोन्ही वर्गात केला.'शुभम करोती म्हणा' हे बालनाट्य रॅप पाश्चात्य गीतांवर थिरकणाऱ्या आताच्या पिढीला आपल्या संस्कारांची ओळख करून देण्याचा प्रयत्न मुलांनी खूप आनंदाने अनुभवला.दोन्ही वर्गांमध्ये मुलांनी मनापासून प्रत्येक गोष्ट अनुभवली आणि अंगीकृत केली.आपल्या येणाऱ्या पिढीला आपले संस्कारांची ओळख करून देण्याची जबाबदारी आपली आहे आणि ती आपण प्रामाणिकपणे पार पदं गरजेचं आहे असे आवाहन अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी उपस्थित बालकलाकार आणि पालकांना केले.* 

   सदर कार्यक्रमाचे निवेदन अभिनयकट्ट्याची बालकलाकार सई कदम हिने केले.अभिनय कट्टा ४३१ ची सुरुवात ज्येष्ठ प्रेक्षक प्रतिनिधी रंजना दानी,स्मिता खानखोजे,विद्या खानखोजे आणि सुचेता मोडक ह्यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

टॅग्स :thaneठाणेTheatreनाटकcultureसांस्कृतिक