शहरं
Join us  
Trending Stories
1
केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा
2
धक्कादायक! OTP किंवा लिंक नाही, आता तुमचा आवाज बँक खाते रिकामे करणार, बोलणे पडणार महागात
3
अजित पवारांना मोठा झटका! मतदानाच्या आधीच राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; BJP ला दिला पाठिंबा
4
बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! रॉयल एनफिल्डनं Goan Classic 350 मध्ये केला जबरदस्त बदल
5
"तुझ्या वडिलांना तीन-तीन गोळ्या घ्याव्या लागतात, मी..."; गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर घणाघात, एकनाथ शिंदेंनाही इशारा
6
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेची खेळी, भाजपाला बसला झटका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी
7
WPL 2026 : मुंबई इंडियन्सचा सामना प्रेक्षकांविना खेळवण्याची वेळ; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
Pune Municipal Election: "...तर मला दिल्लीत जाऊन चर्चा करावी लागेल"; युती धर्माच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा
9
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
10
सायबर हल्ल्यापासून बचावासाठी वापरा USB कंडोम, कुठे अन् कसा वापर करायचा? जाणून घ्या...
11
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची अचानक तब्येत बिघडली; दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल
12
Crime: सेक्ससाठी नकार देणाऱ्या पत्नीची गळा आवळून हत्या, पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळं फुटलं पतीचं पितळ!
13
Video: 'माझा काय संबंध, मला...', मुस्तफिजूर रहमानबाबत प्रश्न विचारताच नबी पत्रकारावर चिडला
14
Shikhar Dhawan And Sophie Shine Engagement : "आम्ही आयुष्यभरासाठी..." शिखर-सोफीनं शेअर केली साखरपुड्याची गोष्ट
15
Crime: रस्त्यातून अपहरण, जबरदस्तीनं दारू पाजली अन् रात्रभर सामूहिक अत्याचार; बिहार हादरलं!
16
TCS च्या नफ्यात १४ टक्क्यांची मोठी घट! तरी गुंतवणूकदारांना करणार मालामाल; लाभांश जाहीर
17
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार; 'सेवा तीर्थ'साठी किती खर्च?
18
हत्येनंतर मृतदेह पाण्यानं स्वच्छ धुतला अन् त्यानंतर...; थरकाप उडवणारी घटना समोर, नरभक्षकाला अटक
19
अंघोळीसाठी गेलेली मुलं बाहेर येईना; ४ वर्षांच्या रयानचा मृत्यू, दरवाजा तोडताच दिसलं भयंकर
20
अमेरिकेने व्हेनेझुएलामध्ये 'सोनिक वेपन' वापरले? हे हत्यार कानातून रक्त काढते
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समित्यांच्या कत्तलखान्यातून मुक्त झाला तरच बळीराजा आत्मनिर्भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 02:53 IST

सदाभाऊ खोत यांचे प्रतिपादन

ठाणे : पूर्वी राजेशाहीतील लूट समजून यायची; पण लोकशाहीत ‘खळं’ लुटले जात असतानाही आम्हाला उमगले नाही. शेतकऱ्याला लुटणारा ‘गब्बर’ कळलाच नाही. बाजार समित्यांच्या या कत्तलखान्यातून मुक्त झाला तरच ‘बळीराजा’ खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनेल, असे प्रतिपादन शेतकरी नेते आ. सदाभाऊ खोत यांनी केले. सरस्वती सेंकडरी स्कूलच्या सभागृहात रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत ‘आत्मनिर्भर बळीराजा’ हे चौथे पुष्प सोमवारी खोत यांनी गुंफले. यावेळी आ. संजय केळकर यांनी प्रास्ताविक केले. 

केंद्र सरकारने बनविलेल्या कृषी कायद्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हितच साधले जाणार असताना गेले काही दिवस दिल्लीच्या तख्तावर आंदोलन सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर खोत यांनी आपली भूमिका विशद केली. हमीभावाने खरेदीची लेखी हमी सरकार देण्यास तयार असतानाही शेतकरी संपेल, अशी अनाठायी भीती दाखवून सुरू असलेल्या पंचतारांकित आंदोलनाला आता राजकीय वास येत आहे. कायदेच रद्द करा, असे म्हणणे झुंडशाहीचे द्योतक असल्याचे ते म्हणाले. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड सोडला तर नंतरच्या राजेशाहीत बळीराजाची लूटच होत होती, ती समजून यायची. शोले चित्रपटातील ‘गब्बर’ गावात दवंडी पिटून लुटायचा. मात्र, लोकशाहीत लुटणारे हे ‘गब्बर’ आपल्याला कळलेच नाहीत.

राजकारण्यांनी या लुटीची व्यवस्थाच करून ठेवली आहे, आधी शेतकऱ्याच्या शेतमालावर लेव्ही लावली, नंतर झोनबंदी, तालुका, जिल्हा, प्रांत, राज्यबंदी आणि निर्यातबंदी केली. हे कमी म्हणून परदेशातून स्वस्त माल आयात करून इथले उत्पादन मातीमोल केले. त्यावर बाजार समित्या नेमून नात्यागोत्यांना खरेदी-विक्रीचे परवाने देऊन सेस लावला. खरेदीदार तेच, व्यापारी तेच, अडते आणि दलालही तेच. यांच्यावर राजकारण्यांची माणसे संचालकपदी नेमून बळीराजाची पिळवणूक केली जाते. खरेदी केलेला माल गोदामात सडवून शेकडो कोटींचे घोटाळे करायचे. बाजार समित्या म्हणजे कत्तलखाने असून या कत्तलखान्यातून शेतकरी मुक्त झाला तरच आत्मनिर्भर बनेल, असा दावा त्यांनी केला. 

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत thaneठाणे