शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

बालेकिल्ल्यातच बाळासाहेब ठाकरेंची स्मारके रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 00:50 IST

ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो.

ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यातही ठाणे आणि कल्याण-डोंबिवली या शहरांत गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर या महापालिकांतील सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या शहरांत बाळासाहेबांच्या कार्याची भावी पिढीला ओळख व्हावी, यासाठी त्यांची स्मारके बांधण्याचा निर्णय घेऊन त्यानुसार अर्थसंकल्पीय तरतूद करून कामाला सुरुवात केली. मात्र, गेल्या चार वर्षांपासून ही स्मारके रखडलेली असून येत्या १७ नोव्हेंबर रोजी येणाºया बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर स्मारकांमधील ही दिरंगाई त्यांचे सैनिक कशी खपवून घेत आहेत, असा सवाल आहे.ठाणे : ठाण्यात २०१५ पासून काम कूर्मगतीने तीनहातनाका येथील इटर्निटी मॉलशेजारी असलेल्या महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याचे काम २०१५ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, चार वर्षे उलटूनही ते अद्यापही पूर्ण झालेले नाही. अद्यापही या स्मारकाची रंगरंगोटी आणि इतर काही कामे शिल्लक आहेत.ठाणे महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना आणि हे स्मारक शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागात असतानाही त्यांना ते वेळेत पूर्ण करून घेता आले नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.या स्मारकाचे भूमिपूजन २९ आॅगस्ट २०१४ रोजी झाले. या कामासाठी ११ कोटी १२ लाख ४६ हजार ५२९ रुपयांचा खर्च केला जाणार आहे. ते २०१५ अखेर उभे करण्याचा महापालिकेचा प्रयत्न होता. स्मारक उभारण्यास व त्यासाठीच्या अंदाजे खर्चास महासभेने मंजुरी दिल्यानंतर स्मारकाचा ठराव नोव्हेंबर २०१२ मध्ये महासभेकडून मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर, तब्बल दोन वर्षे उशिराने या कामाचा नारळ वाढविण्यात आला होता. निविदा प्रक्रिया आणि सोपस्कार करण्यासाठी सत्ताधाऱ्यांना दोन वर्षांचा कालावधी दिला गेला. त्यानंतरही २०१५ मध्ये पूर्ण होणारे हे स्मारक २०१९ वर्ष संपत आले, तरी त्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. अद्यापही विद्युत, रंगरंगोटी आणि इतर महत्त्वाची कामे शिल्लक आहेत. ती एक महिन्यात उरकण्याची लगीनघाई आता सत्ताधाºयांकडून सुरूआहे. >असे असेलठाण्यातील स्मारकइटर्निटी मॉलच्या शेजारी एक हजार ८७१ चौरस मीटर, १२९.६ चौरस मीटर व ८५.४ चौरस मीटरचे तीन सुविधा भूखंड असून त्यावर हे स्मारकाचे काम होणार आहे. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर ठाण्यामध्ये त्यांचे स्मारक व्हावे म्हणून शिवसेनेने प्रयत्न केले होते. या स्मारकाची अंमलबजावणी होण्यास उशीर होत असल्याचे कारण पुढे करून शिवसेनेचे नगरसेवक आणि तत्कालीन महापौर हरिश्चंद्र पाटील यांच्यात भरसभेत वादावादी झाली होती. दरम्यान, या स्मारकाच्या ठिकाणी बाळासाहेबांचा संपूर्ण इतिहास आणि जीवनप्रवासाची सर्वसमावेशक माहिती भावी पिढीला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे, त्यांचा जीवनप्रवास, प्रासंगिक फोटो, त्यांची भाषणे, पुस्तके आणि सीडी स्वरूपात या स्मारकात ठेवण्यात येणार आहेत. ७२ बाय ७२ आकाराचे पिरॅमिड पद्धतीचे छप्पर असलेल्या पारदर्शक काचेचा वापर करण्यात आलेली एक इमारत बांधण्यात येणार आहे. तळ मजल्यावर प्रशासनिक कार्यालय, पहिल्या मजल्यावर व्यंगचित्र दालन, दुसºया मजल्यावर वाचनालय आणि गं्रथालय अशा सुविधा आहेत. तिसºया मजल्यावर सुविधा भूखंडावर लग्नासाठी लॉन्स निर्माण करण्यात येणार आहे. इमारत बांधकाम, इमारतीतील इतर सुविधा व पायाभूत सुविधांसाठी ११ कोटी १२ लाख ५२९ हजार रुपयांचा खर्च केला गेला आहे. ही दुमजली पिरॅमिड वास्तू उभारली जाणार आहे. याशिवाय, साउंड लाइट स्टुडिओमध्ये बाळासाहेबांच्या दुर्मीळ भाषणांच्या ध्वनिफिती ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय, प्रदर्शनाच्या माध्यमातूनसुद्धा बाळासाहेबांचा जीवनपट येथे साकारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कलाकाराच्या निवासाचीसुद्धा व्यवस्था केली जाणार आहे. अभ्यासिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शांतता मिळणार आहे. मेडिटेशन आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यासाठी दालन उपलब्ध करून दिले जाणार आहे.