शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

मीरा भाईंदर महापालिकेच्या दोघा कार्यकारी अभियंत्यांचा जामीन अर्ज फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:39 IST

मीरा रोड : कांदळवन क्षेत्रात पर्यावरणाचा ऱ्हास करून मोठे काँक्रिट नाल्याचे बांधकाम केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपी मीरा भाईंदर महापालिकेचे ...

मीरा रोड : कांदळवन क्षेत्रात पर्यावरणाचा ऱ्हास करून मोठे काँक्रिट नाल्याचे बांधकाम केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपी मीरा भाईंदर महापालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित आणि सुरेश वाकोडे यांचा जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने फेटाळून लावत महापालिकेला मंगळवारी जोरदार दणका दिला.

कांदळवन व कांदळवनापासून ५० मीटरपर्यंतच्या बफर झोनमध्ये कोणतेही बांधकाम, भराव आदी करण्यास मनाई आहे. कांदळवन हे अतिशय महत्त्वाचे असल्याने त्याच्या संरक्षणासाठी उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयानेदेखील वेळोवेळी आदेश दिलेले आहेत. तरीही मीरा भाईंदरमध्ये मात्र महापालिकेपासून विकासक, राजकारणी, झोपडीमाफिया आदींकडून सर्रास कांदळवनचा ऱ्हास केला जातो. कांदळवन तोडणे, जाळणे, भराव करणे, विविध बांधकाम करणे, भरतीच्या पाण्याचे मार्ग बंद करणे आदी प्रकार सर्रास केले जातात. याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल असले तरी पोलीस त्याकडे गांभीर्याने पाहण्याऐवजी आरोपींना सोयीची भूमिका घेतात.

मीरारोडच्या नेमिनाथ हाईट्स व पालिका पाण्याच्या टाकीमागील परिसरात कांदळवनाचा ऱ्हास करून कांदळवन आणि ५० मीटर क्षेत्रात महापालिकेने मोठ्या नाल्यांची बांधकामे चालवली होती. नैसर्गिक प्रवाहाचे स्रोत बंद करून काँक्रीट नाल्याद्वारे कांदळवनात थेट सांडपाणी महापालिका सोडत आहे. त्याआधी ८ फेब्रुवारी २०१९ रोजी कोकण विभागीय कांदळवन उपसमितीने पाहणी करून कारवाईचे आदेश देऊनसुद्धा पालिकेने कार्यवाही केली नाही. याप्रकरणी स्थानिक जागरूक रहिवासी रुपाली श्रीवास्तव आदींनी तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने तालुकास्तरीय कांदळवन समितीने दोन्ही ठिकाणी कांदळवन क्षेत्राचा ऱ्हास होत असल्याचे स्पष्ट करत पालिकेस काम बंद करण्याचे निर्देश दिले होते; परंतु तरीसुद्धा पालिकेने काम सुरूच ठेवले होते. २५ मार्च रोजी अपर तहसीलदार नंदकिशोर देशमुख यांच्या परवानगीनंतर मंडळ अधिकारी प्रशांत कापडे यांनी मीरारोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर दीपक खांबित आणि सुरेश वाकोडे यांच्यासह ठेकेदार आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मीरारोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन कोतमिरे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास आहे. मंगळवारी न्यायालयात खांबित व वाकोडे यांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. यावेळी सरकारी वकील विवेक कडू यांनी जामिनास हरकत घेऊन जोरदार युक्तिवाद केला. खांबित यांच्यावर याआधी पर्यावरण संरक्षण कायद्याखाली कांदळवन क्षेत्राचा ऱ्हास केल्याचे ५ गुन्हे दाखल असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी प्रकरणाचे गांभीर्य पाहता दोघांचे जामीन अर्ज फेटाळून लावले. कांदळवनच्या गुन्ह्यात पोलिसांची भूमिका आतापर्यंत आरोपींना पाठीशी घालणारी राहिली असून, मंगळवारीही न्यायालयात पोलिसांनी जामीन अर्ज रद्द करण्यास फारसा आग्रह धरला नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.