शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

आंबिवलीनजीक बहरतेय वनराई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 00:28 IST

१५ हजार झाडांची केली लागवड : मोरांसह विविध पक्ष्यांचा वाढला वावर

अनिकेत घमंडी।लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : केडीएमसीने आंबिवली येथे वनविभागाच्या ३८ एकर जागेवर मागील वर्षी भारतीय मूळ असलेली १५ हजार झाडे लावली आहेत. सध्या ही वृक्ष चांगलीच बहरली असून, तेथे मोर व अन्य पक्षी येऊ लागले आहेत. त्याचबरोबर तेथे राबवलेला सोलर पॅनलद्वारे ठिबक सिंचनाचा प्रयोगही यशस्वी झाला आहे, अशी माहिती महापालिकेचे सचिव आणि वृक्ष प्राधिकरण समितीचे मुख्य अधिकारी संजय जाधव यांनी दिली.

यासंदर्भात जाधव म्हणाले, भारतीय मूळ असलेली वड, पिंपळ, कदंब, बकुळ, कडुनिंब, चिंच, आंबे, करंज, कांचन, बुछ, शिसम, कैलासपती आशा नानाविध जातींच्या झाडांची लागवड तेथे केली आहे. या झाडांना लागणारे पाणी सूर्यकिरणांद्वारे म्हणजे सोलर ठिबक सिंचनाच्या माध्यमातून दिले जात आहे. त्यामुळे सर्वच्या सर्व झाडे जगली आहेत. सोलर पॅनल चांगल्या पद्धतीने कार्यरत असून त्याची देखभाल फारशी करावी लागत नाही. सोलरवर नियंत्रित असलेले हे एकमेव अभयारण्य असून ते बघण्यासाठी विविध ठिकाणांहून वृक्षप्रेमी येत आहेत. या अभयारण्यात विविध पक्षी येत आहेत. अनेकदा मोर दिसत असल्याने पक्षितज्ज्ञांनी समाधान व्यक्त केले आहे. पुढील वर्षी ही वनराई चांगली बहरल्यानंतर सामान्य नागरिकांसाठी ती कशी खुली करता येईल, याचे नियोजन सुरू आहे. या अभयारण्याच्या सुरक्षेसाठी दोन सुरक्षारक्षक नेमले आहेत.

दरम्यान, अशाच पद्धतीने महापालिकेने उंबर्डे भागात मानवनिर्मित जंगल उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली होती. तेथेही दाट झाडी तयार झाली असून तेथे शिरता येणार नाही, एवढे जंगल आकार घेत असल्याचे जाधव म्हणाले.यंदा कोरोना व निसर्ग वादळामुळे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कोणताही विशेष कार्यक्रम होणार नाही. मात्र, वादळामुळे महापालिका क्षेत्रात बुधवार, गुरुवारी उन्मळून पडलेल्या झाडांच्या संख्येच्या बदल्यात नवीन असंख्य झाडे लावली जातील, असे जाधव म्हणाले.