शहरं
Join us  
Trending Stories
1
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
2
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
3
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
4
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
5
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
6
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
7
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
8
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
9
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
10
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
11
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
12
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
13
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
14
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
15
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
16
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
17
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
18
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
19
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
20
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
Daily Top 2Weekly Top 5

इच्छाशक्तीच्या जोरावर बद्रीनाथ, केदारनाथची वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 01:31 IST

जीवनात सकारात्मक जीवनशैली अवलंबिल्यास कोणत्याही पर्यटनासाठी वयाची मर्यादा येत नाही. हे डोंबिवलीतील ८३ वर्षांच्या निर्मला पाध्ये यांनी सिद्ध करून दाखवले आहे

जान्हवी मोर्येडोंबिवली : जीवनात सकारात्मक जीवनशैली अवलंबिल्यास कोणत्याही पर्यटनासाठी वयाची मर्यादा येत नाही. हे डोंबिवलीतील ८३ वर्षांच्या निर्मला पाध्ये यांनी सिद्ध करून दाखवले आहे. बद्रीनाथ व केदारनाथची वारी त्यांनी नुकतीच केली आहे. अवघे चार डिग्री संश सेल्सियस तापमान, कमी असलेला प्राणवायू यावरही त्यांनी मात करत इच्छाशक्तीच्या बळावर ही वारी पूर्ण केली.निर्मला यांनी २९ मार्च ते ८ एप्रिलदरम्यान ही वारी केली. काही प्रवास त्यांनी रेल्वेने तर उर्वरित बसने केला. बद्रीनाथ येथे बद्रीक आश्रम मंडल हे शेवटचे टोक तसेच केदारनाथपासून ११४ किलोमीटरवर दत्तांची आई अनुसया हिचे प्राचीन मंदिर आहे. या दोन्ही ठिकाणी निर्मला गेल्या होत्या. अनुसाय यांचे मंदिर समुद्र सपाटीपासून १४ हजार फूट इतके उंचावर आहे. चार डिग्री संश सेल्सियस तापमान व प्राणवायू कमी असल्याने त्यांना श्वास घेण्यास काही वेळा त्रास झाला.बद्रीनाथ व केदारनाथला जाण्यापूर्वी निर्मला यांनी हरिद्वार, ऋषिकेश, गंगेची पूजा, आरती केली. देव प्रयाग, रूद्र प्रयाग, पंच प्रयाग केले. गोपेश्वर मंडल येथेही त्यांनी दर्शन घेतले. तेथे असलेले शिराळी गाव बशीच्या आकाराचे आहे. तसेच पंच केदार येथे उत्तराखंड सरकारने वन औषधीचे केंद्र उभारले आहे. तेथील औषधांचा त्यांनी लाभ घेतला. त्यामुळे त्यांना प्रवासाची दगदग अथवा ताण, थकवा जाणवला नाही. निर्मला यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव उदयकुमार हे देखील होते.निर्मला यांना धार्मिक व अध्यात्मिक आवड आहे. त्यामुळे त्या संबंधातील वाचनही त्या करतात. जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन आणि जगण्याची इच्छा शक्ती या जोरावर त्यानी बद्रीनाथ व केदारनाथचा प्रवास केला आहे. सामान्य माणूस तारुण्यात हा प्रवास करू शकत नाही. मात्र निर्मला यांनी इच्छाशक्तीच्या जोरावर जराही न डगमगता हा प्रवास केला. या प्रवासात अन्य १२ जण त्यांच्या सोबतीला होता. त्यापैकी १० जणांना त्रास होऊ लागल्याने त्यांची यात्रा पूर्णच झाली नाही. निर्मला अन्य दोन जणांच्या वयापेक्षा जास्त वयाच्या होत्या. ८३ वय असूनही त्यांनी यात्रा पूर्ण करण्याचा संकल्प करून तो सिद्धीस नेला. यापूर्वी त्यांनी रामेश्वर, तिरुपती आणि नवग्रह यात्रा केली आहे. जुलैमध्ये मदुराई व कन्याकुमारी येथे पर्यटनाला जाण्याचे नियोजन त्यांनी केले आहे.