शहरं
Join us  
Trending Stories
1
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
2
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
3
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
4
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
5
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
6
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
7
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
8
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
9
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
10
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
11
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
12
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
13
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
14
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
15
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
16
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
17
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
18
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
19
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
20
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'

इच्छाशक्तीच्या जोरावर बद्रीनाथ, केदारनाथची वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 01:31 IST

जीवनात सकारात्मक जीवनशैली अवलंबिल्यास कोणत्याही पर्यटनासाठी वयाची मर्यादा येत नाही. हे डोंबिवलीतील ८३ वर्षांच्या निर्मला पाध्ये यांनी सिद्ध करून दाखवले आहे

जान्हवी मोर्येडोंबिवली : जीवनात सकारात्मक जीवनशैली अवलंबिल्यास कोणत्याही पर्यटनासाठी वयाची मर्यादा येत नाही. हे डोंबिवलीतील ८३ वर्षांच्या निर्मला पाध्ये यांनी सिद्ध करून दाखवले आहे. बद्रीनाथ व केदारनाथची वारी त्यांनी नुकतीच केली आहे. अवघे चार डिग्री संश सेल्सियस तापमान, कमी असलेला प्राणवायू यावरही त्यांनी मात करत इच्छाशक्तीच्या बळावर ही वारी पूर्ण केली.निर्मला यांनी २९ मार्च ते ८ एप्रिलदरम्यान ही वारी केली. काही प्रवास त्यांनी रेल्वेने तर उर्वरित बसने केला. बद्रीनाथ येथे बद्रीक आश्रम मंडल हे शेवटचे टोक तसेच केदारनाथपासून ११४ किलोमीटरवर दत्तांची आई अनुसया हिचे प्राचीन मंदिर आहे. या दोन्ही ठिकाणी निर्मला गेल्या होत्या. अनुसाय यांचे मंदिर समुद्र सपाटीपासून १४ हजार फूट इतके उंचावर आहे. चार डिग्री संश सेल्सियस तापमान व प्राणवायू कमी असल्याने त्यांना श्वास घेण्यास काही वेळा त्रास झाला.बद्रीनाथ व केदारनाथला जाण्यापूर्वी निर्मला यांनी हरिद्वार, ऋषिकेश, गंगेची पूजा, आरती केली. देव प्रयाग, रूद्र प्रयाग, पंच प्रयाग केले. गोपेश्वर मंडल येथेही त्यांनी दर्शन घेतले. तेथे असलेले शिराळी गाव बशीच्या आकाराचे आहे. तसेच पंच केदार येथे उत्तराखंड सरकारने वन औषधीचे केंद्र उभारले आहे. तेथील औषधांचा त्यांनी लाभ घेतला. त्यामुळे त्यांना प्रवासाची दगदग अथवा ताण, थकवा जाणवला नाही. निर्मला यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव उदयकुमार हे देखील होते.निर्मला यांना धार्मिक व अध्यात्मिक आवड आहे. त्यामुळे त्या संबंधातील वाचनही त्या करतात. जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन आणि जगण्याची इच्छा शक्ती या जोरावर त्यानी बद्रीनाथ व केदारनाथचा प्रवास केला आहे. सामान्य माणूस तारुण्यात हा प्रवास करू शकत नाही. मात्र निर्मला यांनी इच्छाशक्तीच्या जोरावर जराही न डगमगता हा प्रवास केला. या प्रवासात अन्य १२ जण त्यांच्या सोबतीला होता. त्यापैकी १० जणांना त्रास होऊ लागल्याने त्यांची यात्रा पूर्णच झाली नाही. निर्मला अन्य दोन जणांच्या वयापेक्षा जास्त वयाच्या होत्या. ८३ वय असूनही त्यांनी यात्रा पूर्ण करण्याचा संकल्प करून तो सिद्धीस नेला. यापूर्वी त्यांनी रामेश्वर, तिरुपती आणि नवग्रह यात्रा केली आहे. जुलैमध्ये मदुराई व कन्याकुमारी येथे पर्यटनाला जाण्याचे नियोजन त्यांनी केले आहे.