शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
4
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
5
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
6
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
7
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
8
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
9
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
10
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
11
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
12
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
13
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
14
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
15
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
16
Gold Rate Today 15 May: एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
17
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
18
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
19
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
20
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

स्वच्छतागृह नसल्याने बदलापूरकरांची कोंडी

By admin | Updated: March 23, 2016 02:08 IST

स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबविण्याचा दावा करणारे बदलापूर पालिका प्रशासन प्रत्यक्षात मात्र स्वच्छतागृह उभारणीबाबत उदासीन आहे

बदलापूर : स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबविण्याचा दावा करणारे बदलापूर पालिका प्रशासन प्रत्यक्षात मात्र स्वच्छतागृह उभारणीबाबत उदासीन आहे. अनेक वर्षापासून शहरातील वर्दळीच्या भागात सार्वजनिक स्वच्छतागृहाची व्यवस्थाच करण्यात आलेली नाही. स्वच्छतागृह नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. महिलांना स्वच्छतागृहाची सोय नसल्याने रेल्वे स्थानक गाठण्याची वेळ येते. पालिका प्रशासनाने ही गैरसोय दूर करण्यासाठी कोणतीच व्यवस्था केलेली नाही. बदलापूर रेल्वे स्थानकापासून पूर्वेकडे कात्रप, शिरगाव, गांधी चौक, खरवई या भागात तर पश्चिमेकडे बेलवली,रमेशवाडी, बदलापूर गाव, हेंद्रेपाडा या भागात मोठी वर्दळ असते. या रस्त्यांवर ठराविक अंतरावर स्वच्छतागृह असणे आवश्यक आहे. परंतु शहरातील या मुख्य रस्त्यांवर एकही सार्वजनिक स्वच्छतागृह नाही. त्यामुळे रस्त्याने जाताना काही वेळा पुरु ष उघडयावरच हे विधी उरकतात परंतु महिलांना मात्र थेट घर गाठण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. या समस्येकडे राष्ट्रवादी काँँग्रेसचे शहर अध्यक्ष कालिदास देशमुख यांनी लक्ष वेधले आहे. वर्दळीच्या रस्त्यांवर स्वच्छतागृहाअभावी महिलांची होत असलेली ही गैरसोय लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने शहरातील मुख्य रस्त्यांलगत स्वच्छतागृहाची तातडीने उभारणी करणे आवश्यक आहे. नागरिकांकडून अनेक वर्षापासून मागणी होऊनही पालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. (प्रतिनिधी)