शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतागृह नसल्याने बदलापूरकरांची कोंडी

By admin | Updated: March 23, 2016 02:08 IST

स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबविण्याचा दावा करणारे बदलापूर पालिका प्रशासन प्रत्यक्षात मात्र स्वच्छतागृह उभारणीबाबत उदासीन आहे

बदलापूर : स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबविण्याचा दावा करणारे बदलापूर पालिका प्रशासन प्रत्यक्षात मात्र स्वच्छतागृह उभारणीबाबत उदासीन आहे. अनेक वर्षापासून शहरातील वर्दळीच्या भागात सार्वजनिक स्वच्छतागृहाची व्यवस्थाच करण्यात आलेली नाही. स्वच्छतागृह नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. महिलांना स्वच्छतागृहाची सोय नसल्याने रेल्वे स्थानक गाठण्याची वेळ येते. पालिका प्रशासनाने ही गैरसोय दूर करण्यासाठी कोणतीच व्यवस्था केलेली नाही. बदलापूर रेल्वे स्थानकापासून पूर्वेकडे कात्रप, शिरगाव, गांधी चौक, खरवई या भागात तर पश्चिमेकडे बेलवली,रमेशवाडी, बदलापूर गाव, हेंद्रेपाडा या भागात मोठी वर्दळ असते. या रस्त्यांवर ठराविक अंतरावर स्वच्छतागृह असणे आवश्यक आहे. परंतु शहरातील या मुख्य रस्त्यांवर एकही सार्वजनिक स्वच्छतागृह नाही. त्यामुळे रस्त्याने जाताना काही वेळा पुरु ष उघडयावरच हे विधी उरकतात परंतु महिलांना मात्र थेट घर गाठण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. या समस्येकडे राष्ट्रवादी काँँग्रेसचे शहर अध्यक्ष कालिदास देशमुख यांनी लक्ष वेधले आहे. वर्दळीच्या रस्त्यांवर स्वच्छतागृहाअभावी महिलांची होत असलेली ही गैरसोय लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने शहरातील मुख्य रस्त्यांलगत स्वच्छतागृहाची तातडीने उभारणी करणे आवश्यक आहे. नागरिकांकडून अनेक वर्षापासून मागणी होऊनही पालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. (प्रतिनिधी)