शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

बदलापूरला मिळणार टाटाची वीज ; वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी टाटा पॉवरचा पुढाकार

By पंकज पाटील | Updated: February 12, 2024 17:03 IST

बदलापुरात विजेचा पुरवठा अपुरा पडत असल्यामुळे आता टाटा कंपनीने पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल २५० केवी वीजपुरवठा टाटाच्या माध्यमातून केला जाणार आहे.

बदलापूर: बदलापुरात विजेचा पुरवठा अपुरा पडत असल्यामुळे आता टाटा कंपनीने पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल २५० केवी वीजपुरवठा टाटाच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्या अनुषंगाने टाटा पॉवर कंपनीने शासन स्तरावर प्रयत्न सुरू केले आहे. 

बदलापूर शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता वीज वितरण कंपनीला बदलापूर शहरात सुरळीत वीजपुरवठा करणे अवघड जात आहे. तब्बल 25 ते 30 केवी वीज अपुरी पडत असल्याने अनेक भागात नाईलाजाने भारनियमन करावे लागत होते. तसेच वीज पुरवठा करण्यासाठी स्विचिंग स्टेशन देखील अपुरे पडत असल्याने बदलापूरची वीजपुरवठा यंत्रणा कोलमडल्याचे दिसत होते. वीज वितरण कंपनी सुरळीत वीज पुरवठा करण्यात अपयशी ठरत असताना आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नातून आता टाटा पॉवर कंपनीने पुढाकार घेतला आहे. टाटा पॉवरची उच्च दाबाची विद्युत वाहिनी कात्रप परिसरातून गेले असून त्या टॉवर वरून तब्बल 250 केवी वीज घेण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

वीज वितरण कंपनीला वाढीव वीज उपलब्ध करून देण्यासाठी टाटा कंपनी शासन स्तरावर प्रयत्न करीत आहे. त्या संदर्भातला प्रस्ताव देखील पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळतात कात्रप परिसरात स्विचिंग स्टेशन टाटाच्या माध्यमातून उभारले जाणार आहे. या स्विचिंग स्टेशनमधून बदलापूर शहराला वाढीव वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे.

 वाढीव वीज उपलब्ध करून देण्यासाठी बदलापूरच्या कात्रप परिसरात आरक्षित असलेला भूखंड टाटा पॉवर कंपनीला हस्तांतरित करण्यात येणार आहे.

 टाटा पॉवर बदलापूरला वाढीव वीज उपलब्ध करून देणार असली तरी वितरण व्यवस्था ही वीज वितरण कंपनीच्या माध्यमातूनच राबविण्यात येणार आहे. टाटा पॉवर वीज पुरवठा करणार असली तरी ग्राहकांना जे बिल दिले जाणार आहे ते वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून दिले जाणार आहे. '' शहर वाढत असताना वीज अपुरी पडत असल्यामुळेच टाटा पावर कंपनीकडून हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यावर लागलीच काम सुरू होईल. येत्या काही महिन्यात बदलापूर शहराला वाढीव वीज उपलब्ध झाल्यानंतर वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण संपुष्टात येईल. - किसन कथोरे, आमदार