शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बदलापूरला मिळणार टाटाची वीज ; वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी टाटा पॉवरचा पुढाकार

By पंकज पाटील | Updated: February 12, 2024 17:03 IST

बदलापुरात विजेचा पुरवठा अपुरा पडत असल्यामुळे आता टाटा कंपनीने पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल २५० केवी वीजपुरवठा टाटाच्या माध्यमातून केला जाणार आहे.

बदलापूर: बदलापुरात विजेचा पुरवठा अपुरा पडत असल्यामुळे आता टाटा कंपनीने पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल २५० केवी वीजपुरवठा टाटाच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्या अनुषंगाने टाटा पॉवर कंपनीने शासन स्तरावर प्रयत्न सुरू केले आहे. 

बदलापूर शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता वीज वितरण कंपनीला बदलापूर शहरात सुरळीत वीजपुरवठा करणे अवघड जात आहे. तब्बल 25 ते 30 केवी वीज अपुरी पडत असल्याने अनेक भागात नाईलाजाने भारनियमन करावे लागत होते. तसेच वीज पुरवठा करण्यासाठी स्विचिंग स्टेशन देखील अपुरे पडत असल्याने बदलापूरची वीजपुरवठा यंत्रणा कोलमडल्याचे दिसत होते. वीज वितरण कंपनी सुरळीत वीज पुरवठा करण्यात अपयशी ठरत असताना आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नातून आता टाटा पॉवर कंपनीने पुढाकार घेतला आहे. टाटा पॉवरची उच्च दाबाची विद्युत वाहिनी कात्रप परिसरातून गेले असून त्या टॉवर वरून तब्बल 250 केवी वीज घेण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

वीज वितरण कंपनीला वाढीव वीज उपलब्ध करून देण्यासाठी टाटा कंपनी शासन स्तरावर प्रयत्न करीत आहे. त्या संदर्भातला प्रस्ताव देखील पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळतात कात्रप परिसरात स्विचिंग स्टेशन टाटाच्या माध्यमातून उभारले जाणार आहे. या स्विचिंग स्टेशनमधून बदलापूर शहराला वाढीव वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे.

 वाढीव वीज उपलब्ध करून देण्यासाठी बदलापूरच्या कात्रप परिसरात आरक्षित असलेला भूखंड टाटा पॉवर कंपनीला हस्तांतरित करण्यात येणार आहे.

 टाटा पॉवर बदलापूरला वाढीव वीज उपलब्ध करून देणार असली तरी वितरण व्यवस्था ही वीज वितरण कंपनीच्या माध्यमातूनच राबविण्यात येणार आहे. टाटा पॉवर वीज पुरवठा करणार असली तरी ग्राहकांना जे बिल दिले जाणार आहे ते वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून दिले जाणार आहे. '' शहर वाढत असताना वीज अपुरी पडत असल्यामुळेच टाटा पावर कंपनीकडून हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यावर लागलीच काम सुरू होईल. येत्या काही महिन्यात बदलापूर शहराला वाढीव वीज उपलब्ध झाल्यानंतर वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण संपुष्टात येईल. - किसन कथोरे, आमदार