शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
3
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
4
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
5
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
6
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
7
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
8
Rana Daggubati Weight Loss: नॉनव्हेज पूर्ण बंद, मीठ कमी आणि...; तब्बल ३० किलो वजन घटवण्याचा 'भल्लालदेव' फॉर्म्युला
9
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
10
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
11
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
12
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
13
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
14
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
15
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
16
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
17
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
18
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
19
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
20
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूरला लागली दृष्ट

By admin | Updated: February 23, 2017 05:53 IST

शहराच्या एका बाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि दुसऱ्या बाजूला उल्हास नदीचा प्रवाह अशा

बदलापूर : शहराच्या एका बाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि दुसऱ्या बाजूला उल्हास नदीचा प्रवाह अशा निसर्गाच्या कुशीत वसलेले बदलापूर शहर. आज हे शहर झपाट्याने शहरीकरणाच्या दिशेने वाटचाल करत आहे. निसर्गाच्या कुशीत बसलेले शहर म्हणून बदलापूरची गणना केली जात असली, तरी केंद्राच्या अहवालानंतर हे शहर आता प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याचे चित्र दिसत आहे. स्वच्छ आणि प्रदूषणविरहित अशा शहरात घराचे स्वप्न पाहून बदलापूरमध्ये राहण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या वाट्याला निराशा आली आहे. देशातील सर्वाधिक प्रदूषित ९४ शहरांपैकी १७ शहरे महाराष्ट्रात आहेत. या प्रदूषित शहरांच्या यादीत ठाणे जिल्ह्यात नवी मुंबई, उल्हासनगर आणि बदलापूर या तीन शहरांचा समावेश आहे. बदलापूरला नैसर्गिक वारसा लाभलेला आहे. कात्रप, शिरगाव, खरवई, जुवेली, बेलवली, वालिवली, वडवली आणि बदलापूर गाव हा परिसर निसर्गाच्या कुशीत वसलेला आहे. असे असले तरी वाढत्या नागरीकरणामुळे या शहराच्या पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. वास्तवातील बदलापूर आणि नव्याने विकसित होणाऱ्या बदलापूरचा विचार करता प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना आखण्यात आलेली दिसत नाही. पर्यावरणाचा कोणताही विचार न करता शहरात विकासकामे सुरू असल्याने त्याचा परिणाम प्रदूषणावर होत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास करून शहरीकरण होत असल्याने प्रदूषणावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच कमी पडत आहे. वृक्षांची कत्तल करण्याचे प्रमाण वाढल्याने आणि त्या प्रमाणात नव्या वृक्षांची जोपासना केली जात नसल्याने शहरातील तापमान आणि प्रदूषण यांच्यात वाढ होत आहे. प्रदूषित शहरांच्या यादीत बदलापूरचे नाव आल्याने त्याचा थेट बदलापुराच्या घरखरेदीवर लागलीच परिणाम होणार नसला,तरी भविष्यात ही स्थिती बदलली नाही, तर त्याचा विपरित परिणाम घरखरेदीवर होणार आहे. शांत आणि प्रदूषणविरहित शहरांच्या दिशेने नागरिक येत असल्याने बदलापूरची सध्याची स्थिती बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना आखण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)वनसंपदा वाढवण्यासाठी पुढाकार हवाशहरात नव्याने बांधकाम व्यावसायिक इमारतींचे बांधकाम करत असतील, तर त्यांना वृक्षसंवर्धनाचीही जबाबदारी सोपवण्याची गरज आता भासत आहे. शहराला लागून असलेल्या डोंगरांवर वनसंपदा वाढवण्यासाठी पालिका आणि वन विभागाने पुढाकार घेण्याची गरज आहे. तर, कारखानदारांच्या प्रदूषणावर लक्ष ठेवण्यासाठी प्रदूूषण नियंत्रण मंडळासोबत पालिकेनेही योग्य कारवाई करण्याची गरज आहे.