शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

बदलापूरला लागली दृष्ट

By admin | Updated: February 23, 2017 05:53 IST

शहराच्या एका बाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि दुसऱ्या बाजूला उल्हास नदीचा प्रवाह अशा

बदलापूर : शहराच्या एका बाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि दुसऱ्या बाजूला उल्हास नदीचा प्रवाह अशा निसर्गाच्या कुशीत वसलेले बदलापूर शहर. आज हे शहर झपाट्याने शहरीकरणाच्या दिशेने वाटचाल करत आहे. निसर्गाच्या कुशीत बसलेले शहर म्हणून बदलापूरची गणना केली जात असली, तरी केंद्राच्या अहवालानंतर हे शहर आता प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याचे चित्र दिसत आहे. स्वच्छ आणि प्रदूषणविरहित अशा शहरात घराचे स्वप्न पाहून बदलापूरमध्ये राहण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या वाट्याला निराशा आली आहे. देशातील सर्वाधिक प्रदूषित ९४ शहरांपैकी १७ शहरे महाराष्ट्रात आहेत. या प्रदूषित शहरांच्या यादीत ठाणे जिल्ह्यात नवी मुंबई, उल्हासनगर आणि बदलापूर या तीन शहरांचा समावेश आहे. बदलापूरला नैसर्गिक वारसा लाभलेला आहे. कात्रप, शिरगाव, खरवई, जुवेली, बेलवली, वालिवली, वडवली आणि बदलापूर गाव हा परिसर निसर्गाच्या कुशीत वसलेला आहे. असे असले तरी वाढत्या नागरीकरणामुळे या शहराच्या पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. वास्तवातील बदलापूर आणि नव्याने विकसित होणाऱ्या बदलापूरचा विचार करता प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना आखण्यात आलेली दिसत नाही. पर्यावरणाचा कोणताही विचार न करता शहरात विकासकामे सुरू असल्याने त्याचा परिणाम प्रदूषणावर होत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास करून शहरीकरण होत असल्याने प्रदूषणावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच कमी पडत आहे. वृक्षांची कत्तल करण्याचे प्रमाण वाढल्याने आणि त्या प्रमाणात नव्या वृक्षांची जोपासना केली जात नसल्याने शहरातील तापमान आणि प्रदूषण यांच्यात वाढ होत आहे. प्रदूषित शहरांच्या यादीत बदलापूरचे नाव आल्याने त्याचा थेट बदलापुराच्या घरखरेदीवर लागलीच परिणाम होणार नसला,तरी भविष्यात ही स्थिती बदलली नाही, तर त्याचा विपरित परिणाम घरखरेदीवर होणार आहे. शांत आणि प्रदूषणविरहित शहरांच्या दिशेने नागरिक येत असल्याने बदलापूरची सध्याची स्थिती बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना आखण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)वनसंपदा वाढवण्यासाठी पुढाकार हवाशहरात नव्याने बांधकाम व्यावसायिक इमारतींचे बांधकाम करत असतील, तर त्यांना वृक्षसंवर्धनाचीही जबाबदारी सोपवण्याची गरज आता भासत आहे. शहराला लागून असलेल्या डोंगरांवर वनसंपदा वाढवण्यासाठी पालिका आणि वन विभागाने पुढाकार घेण्याची गरज आहे. तर, कारखानदारांच्या प्रदूषणावर लक्ष ठेवण्यासाठी प्रदूूषण नियंत्रण मंडळासोबत पालिकेनेही योग्य कारवाई करण्याची गरज आहे.