शहरं
Join us  
Trending Stories
1
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
2
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
3
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
4
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
5
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
6
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
7
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
8
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
9
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
10
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
11
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
12
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
13
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
14
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
15
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
16
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
17
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
18
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
19
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
20
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश

मरणानंतरही हाल संपेनात! भुयारी मार्गातील गुडघाभर पाण्यातून काढावी लागली अंत्ययात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 16:47 IST

सबवेमध्ये साचलेल्या पाण्यातून काढावी लागली वाट

बदलापूर:  शहरातील बेलवली भागात असलेल्या भुयारी मार्गात वर्षभर पाणी साचलेला असते. येथील नागरिकांनी प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी देऊन लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा आंदोलन करून देखील प्रशासनाला भुयारी मार्गाशी काहीही घेणे-देणे नसल्याचे आज प्रत्यक्षात समोर आले आहे. बेलवली गावातील एका कुटुंबातील मृत व्यक्तीची अंत्ययात्रा या भुयारी मार्गातील गुडघाभर पाण्यातून आज स्मशानभूमीमध्ये न्यावी लागली. बेलवली गावातील स्मशानभूमीत जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. भुयारी मार्गात पावसाळ्यात तसेच भुयारी मार्गालगत असलेल्या नाल्यातील पाणी मोठ्या प्रमाणात साचतं. रेल्वे प्रशासनाने रेल्वे फाटक बंद करून बेलवली स्मशान भूमीकडे जाण्याचा मार्ग काही महिन्यांपूर्वी संरक्षक भिंत घालून बंद केला. मात्र गावकऱ्यांना पर्यायी व्यवस्था करून दिली नाही.त्यामुळे नगरपालिका आणि रेल्वे प्रशासनानं याकडे तातडीने लक्ष देऊन याठिकाणी पादचारी पुल उभारून ही समस्या कायमस्वरूपी सोडवावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.