शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
2
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
3
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
4
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
5
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
6
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
7
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
8
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
9
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
10
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
11
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
12
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
13
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
14
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
15
Mumbai: १४ वर्षाच्या मुलीशी लग्न करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल
16
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
17
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
18
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
19
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
20
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा

मरणानंतरही हाल संपेनात! भुयारी मार्गातील गुडघाभर पाण्यातून काढावी लागली अंत्ययात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 16:47 IST

सबवेमध्ये साचलेल्या पाण्यातून काढावी लागली वाट

बदलापूर:  शहरातील बेलवली भागात असलेल्या भुयारी मार्गात वर्षभर पाणी साचलेला असते. येथील नागरिकांनी प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी देऊन लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा आंदोलन करून देखील प्रशासनाला भुयारी मार्गाशी काहीही घेणे-देणे नसल्याचे आज प्रत्यक्षात समोर आले आहे. बेलवली गावातील एका कुटुंबातील मृत व्यक्तीची अंत्ययात्रा या भुयारी मार्गातील गुडघाभर पाण्यातून आज स्मशानभूमीमध्ये न्यावी लागली. बेलवली गावातील स्मशानभूमीत जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. भुयारी मार्गात पावसाळ्यात तसेच भुयारी मार्गालगत असलेल्या नाल्यातील पाणी मोठ्या प्रमाणात साचतं. रेल्वे प्रशासनाने रेल्वे फाटक बंद करून बेलवली स्मशान भूमीकडे जाण्याचा मार्ग काही महिन्यांपूर्वी संरक्षक भिंत घालून बंद केला. मात्र गावकऱ्यांना पर्यायी व्यवस्था करून दिली नाही.त्यामुळे नगरपालिका आणि रेल्वे प्रशासनानं याकडे तातडीने लक्ष देऊन याठिकाणी पादचारी पुल उभारून ही समस्या कायमस्वरूपी सोडवावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.