शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

बदलापुरात कोरोना रुग्णांनी १० हजारांचा टप्पा ओलांडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:38 IST

बदलापूर : बदलापुरात गेल्या ११ महिन्यांत १० हजार १७ कोरोनारुग्णांची नोंद झाली आहे. सुदैवाने शहरात मृत्युदर रोखण्यात पालिका ...

बदलापूर : बदलापुरात गेल्या ११ महिन्यांत १० हजार १७ कोरोनारुग्णांची नोंद झाली आहे. सुदैवाने शहरात मृत्युदर रोखण्यात पालिका प्रशासनाला यश आले आहे. आतापर्यंत १२७ रुणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मुंबई महानगर क्षेत्रात सर्वांत कमी मृत्यू बदलापूर शहरात झाले आहेत. मात्र, गेल्या दोन आठवड्यांत शहरात तब्बल ४१६ रुणांची नोंद झाली आहे.

गेल्यावर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बदलापुरात पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर रुग्णांची संख्या सातत्याने वाढतच गेली. बुधवारी शहरात ३९ रुग्ण आढळल्याने कोरोनाबाधितांची संख्या १० हजार १७ वर पोहोचली असून आतापर्यंत १२७ बाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातला मृत्यूदर अवघा १.२६ टक्के इतका आहे. गेल्या तीन महिन्यांपासून शहरात कोरोनाचाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. बदलापूर नगरपालिका दररोज सरासरी १०० चाचण्या करते. आतापर्यंत १९ हजार चाचण्या केल्या आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याचे बोलले जाते. शहरात संसर्ग अजूनही मोठ्या प्रमाणावर असल्याचे समोर आले आहे. रुग्णांच्या उपचारासाठी अद्ययावत ३० खाटांचा अतिदक्षता उभारणारी कुळगाव बदलापूर नगरपालिका राज्यातील पहिला नगरपालिका ठरली होती. या रुग्णालयात अद्याप एकही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनारुग्णांची संख्या वाढू लागल्याचा परिणाम बदलापूर शहरातही पाहायला मिळतो आहे. बदलापूर शहरात गेल्या १४ दिवसांत तब्बल ४१६ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात २६ फेब्रुवारीला सर्वाधिक ४१ तर २५ फेब्रुवारी आणि ३ मार्चला ३९ रुग्णांची नोंद झाली आहे.

चौकट

अंबरनाथमध्ये रुग्णसंख्या नियंत्रणात

अंबरनाथ शहरात बुधवारपर्यंत ८ हजार ८७० रुग्णांची नोंद झाली आहे तर आतापर्यंत शहरात ३१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पालिकेने आतापर्यंत ४३ हजार चाचण्या पूर्ण केल्या आहेत. गेल्या काही महिन्यांत चाचण्यांची संख्या मर्यादित केली होती. मात्र, आता पुन्हा चाचण्या वाढविल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.