शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

बदलापुरात कोरोना रुग्णांनी १० हजारांचा टप्पा ओलांडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:38 IST

बदलापूर : बदलापुरात गेल्या ११ महिन्यांत १० हजार १७ कोरोनारुग्णांची नोंद झाली आहे. सुदैवाने शहरात मृत्युदर रोखण्यात पालिका ...

बदलापूर : बदलापुरात गेल्या ११ महिन्यांत १० हजार १७ कोरोनारुग्णांची नोंद झाली आहे. सुदैवाने शहरात मृत्युदर रोखण्यात पालिका प्रशासनाला यश आले आहे. आतापर्यंत १२७ रुणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मुंबई महानगर क्षेत्रात सर्वांत कमी मृत्यू बदलापूर शहरात झाले आहेत. मात्र, गेल्या दोन आठवड्यांत शहरात तब्बल ४१६ रुणांची नोंद झाली आहे.

गेल्यावर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बदलापुरात पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर रुग्णांची संख्या सातत्याने वाढतच गेली. बुधवारी शहरात ३९ रुग्ण आढळल्याने कोरोनाबाधितांची संख्या १० हजार १७ वर पोहोचली असून आतापर्यंत १२७ बाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातला मृत्यूदर अवघा १.२६ टक्के इतका आहे. गेल्या तीन महिन्यांपासून शहरात कोरोनाचाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. बदलापूर नगरपालिका दररोज सरासरी १०० चाचण्या करते. आतापर्यंत १९ हजार चाचण्या केल्या आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याचे बोलले जाते. शहरात संसर्ग अजूनही मोठ्या प्रमाणावर असल्याचे समोर आले आहे. रुग्णांच्या उपचारासाठी अद्ययावत ३० खाटांचा अतिदक्षता उभारणारी कुळगाव बदलापूर नगरपालिका राज्यातील पहिला नगरपालिका ठरली होती. या रुग्णालयात अद्याप एकही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनारुग्णांची संख्या वाढू लागल्याचा परिणाम बदलापूर शहरातही पाहायला मिळतो आहे. बदलापूर शहरात गेल्या १४ दिवसांत तब्बल ४१६ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात २६ फेब्रुवारीला सर्वाधिक ४१ तर २५ फेब्रुवारी आणि ३ मार्चला ३९ रुग्णांची नोंद झाली आहे.

चौकट

अंबरनाथमध्ये रुग्णसंख्या नियंत्रणात

अंबरनाथ शहरात बुधवारपर्यंत ८ हजार ८७० रुग्णांची नोंद झाली आहे तर आतापर्यंत शहरात ३१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पालिकेने आतापर्यंत ४३ हजार चाचण्या पूर्ण केल्या आहेत. गेल्या काही महिन्यांत चाचण्यांची संख्या मर्यादित केली होती. मात्र, आता पुन्हा चाचण्या वाढविल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.