शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

भिवंडीतील चिंचोटी माणकोली रस्त्याची दुरावस्था; सार्वजनिक बांधकाम विभागाची रस्त्यावर तात्पुरती डागडुजी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 15:40 IST

या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे येथे अपघातांचे प्रमाण वाढले असल्याने संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला

नितिन पंडीत 

भिवंडी - भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा ते चिंचोटी महामार्गाची सध्या दुरावस्था झाली आहे . त्यामुळे हा रस्ता आता मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना आपला जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे या रस्त्याची जबाबदारी असलेल्या सुप्रीम कंपनीबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांचे या रस्त्यावर पुरता दुर्लक्ष होत आहे . या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत असून नुकताच २२ जुलै रोजी वडघर गावातील २० वर्षीय तरुण तेजस अभिमन्यू पाटील याचा या महामार्गावरील खड्डयांमुळे जीव गेला आहे. तर मागील वर्षी २५ सप्टेंबर रोजी ठाण्यातील हर्ष विनोद सिंह या २६ वर्षीय तरुणाचा कालवार गावाजवळ खड्डे वाचविताना अपघातात मृत्यू झाला आहे . असे अनेक अपघात या महामार्गावर झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेकांना अपंगत्व आले आहे . मात्र या रस्त्याची जबाबदारी असलेल्या सुप्रीम कंपनीबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे , तर दुसरीकडे सुप्रीम कंपनीकडून टोल वसुली मात्र मोठ्या प्रमाणात होत आहे. एकीकडे रस्त्याची दुरावस्था व त्यामुळे होणारे अपघात तर दुसरीकडे रोज होणारी टोल वसुली या सर्व बेजबाबदार कारभारामुळे टोल वसूल करणाऱ्या सुप्रीम कंपनीबरोबरच राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागा विरोधात स्थानिक नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत .

विशेष म्हणजे या रस्त्याच्या दुरुस्ती व सुधारणेसाठी स्थानिक नागरिकांनी एकत्र येत संघर्ष समिती स्थापन करून अनेक वेळा रास्ता रोको आंदोलने केले आहे . राज्य शासनाने टोल कंपनीच्या अनामत रक्कमेतून तब्बल सात कोटी रुपयांचा निधी मागील वर्षी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मंजूर केला होता. मात्र दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदाराने थातूरमातूर दुरुस्ती केल्याने आता या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत , तर वळ पाडा ,  मानकोली, अंजुरफाटा, बहात्तर गाळा , कालवार , वडघर , खारबाव येथे रस्त्याची अक्षरशा दुरावस्था झाली आहे. 

या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे येथे अपघातांचे प्रमाण वाढले असल्याने संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला असता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या महामार्गाच्या रस्त्यावर माती मिश्रित खाडी टाकून खड्डे भरण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरु करण्यात आले आहे. मात्र या महामार्गावर अवजड वाहनांची वर्दळ असल्याने व पाऊस पडला कि सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर टाकलेली खाडी सर्वत्र पसरते ज्यामुळे दुचाकी स्वारांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे . त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे भरण्याचा दिखावा करू नये , तर कायम स्वरूपी खड्डे भरावे व रस्ता सुस्थितीत करावा असा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाला येथील स्थानिक नागरिकांनी संघर्ष समितीच्या वतीने दिला आहे . 

सध्या काही ठिकाणी खाडी तर काही ठिकाणी पेव्हर ब्लॉकच्या सहाय्याने खड्डे भरण्याचे काम सुरु असून पावसाने उघडीप दिली की या रस्त्यावरील खड्डे आरएमसी काँक्रेट व डांबराने भरण्यात येतील अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भिवंडी शाखेचे अभियंता सचिन धात्रप यांनी दिली आहे.