शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

भिवंडीतील चिंचोटी माणकोली रस्त्याची दुरावस्था; सार्वजनिक बांधकाम विभागाची रस्त्यावर तात्पुरती डागडुजी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 15:40 IST

या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे येथे अपघातांचे प्रमाण वाढले असल्याने संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला

नितिन पंडीत 

भिवंडी - भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा ते चिंचोटी महामार्गाची सध्या दुरावस्था झाली आहे . त्यामुळे हा रस्ता आता मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना आपला जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे या रस्त्याची जबाबदारी असलेल्या सुप्रीम कंपनीबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांचे या रस्त्यावर पुरता दुर्लक्ष होत आहे . या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत असून नुकताच २२ जुलै रोजी वडघर गावातील २० वर्षीय तरुण तेजस अभिमन्यू पाटील याचा या महामार्गावरील खड्डयांमुळे जीव गेला आहे. तर मागील वर्षी २५ सप्टेंबर रोजी ठाण्यातील हर्ष विनोद सिंह या २६ वर्षीय तरुणाचा कालवार गावाजवळ खड्डे वाचविताना अपघातात मृत्यू झाला आहे . असे अनेक अपघात या महामार्गावर झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेकांना अपंगत्व आले आहे . मात्र या रस्त्याची जबाबदारी असलेल्या सुप्रीम कंपनीबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे , तर दुसरीकडे सुप्रीम कंपनीकडून टोल वसुली मात्र मोठ्या प्रमाणात होत आहे. एकीकडे रस्त्याची दुरावस्था व त्यामुळे होणारे अपघात तर दुसरीकडे रोज होणारी टोल वसुली या सर्व बेजबाबदार कारभारामुळे टोल वसूल करणाऱ्या सुप्रीम कंपनीबरोबरच राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागा विरोधात स्थानिक नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत .

विशेष म्हणजे या रस्त्याच्या दुरुस्ती व सुधारणेसाठी स्थानिक नागरिकांनी एकत्र येत संघर्ष समिती स्थापन करून अनेक वेळा रास्ता रोको आंदोलने केले आहे . राज्य शासनाने टोल कंपनीच्या अनामत रक्कमेतून तब्बल सात कोटी रुपयांचा निधी मागील वर्षी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मंजूर केला होता. मात्र दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदाराने थातूरमातूर दुरुस्ती केल्याने आता या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत , तर वळ पाडा ,  मानकोली, अंजुरफाटा, बहात्तर गाळा , कालवार , वडघर , खारबाव येथे रस्त्याची अक्षरशा दुरावस्था झाली आहे. 

या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे येथे अपघातांचे प्रमाण वाढले असल्याने संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला असता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या महामार्गाच्या रस्त्यावर माती मिश्रित खाडी टाकून खड्डे भरण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरु करण्यात आले आहे. मात्र या महामार्गावर अवजड वाहनांची वर्दळ असल्याने व पाऊस पडला कि सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर टाकलेली खाडी सर्वत्र पसरते ज्यामुळे दुचाकी स्वारांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे . त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे भरण्याचा दिखावा करू नये , तर कायम स्वरूपी खड्डे भरावे व रस्ता सुस्थितीत करावा असा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाला येथील स्थानिक नागरिकांनी संघर्ष समितीच्या वतीने दिला आहे . 

सध्या काही ठिकाणी खाडी तर काही ठिकाणी पेव्हर ब्लॉकच्या सहाय्याने खड्डे भरण्याचे काम सुरु असून पावसाने उघडीप दिली की या रस्त्यावरील खड्डे आरएमसी काँक्रेट व डांबराने भरण्यात येतील अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भिवंडी शाखेचे अभियंता सचिन धात्रप यांनी दिली आहे.