शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

भिवंडीतील चिंचोटी माणकोली रस्त्याची दुरावस्था; सार्वजनिक बांधकाम विभागाची रस्त्यावर तात्पुरती डागडुजी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 15:40 IST

या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे येथे अपघातांचे प्रमाण वाढले असल्याने संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला

नितिन पंडीत 

भिवंडी - भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा ते चिंचोटी महामार्गाची सध्या दुरावस्था झाली आहे . त्यामुळे हा रस्ता आता मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना आपला जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे या रस्त्याची जबाबदारी असलेल्या सुप्रीम कंपनीबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांचे या रस्त्यावर पुरता दुर्लक्ष होत आहे . या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत असून नुकताच २२ जुलै रोजी वडघर गावातील २० वर्षीय तरुण तेजस अभिमन्यू पाटील याचा या महामार्गावरील खड्डयांमुळे जीव गेला आहे. तर मागील वर्षी २५ सप्टेंबर रोजी ठाण्यातील हर्ष विनोद सिंह या २६ वर्षीय तरुणाचा कालवार गावाजवळ खड्डे वाचविताना अपघातात मृत्यू झाला आहे . असे अनेक अपघात या महामार्गावर झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेकांना अपंगत्व आले आहे . मात्र या रस्त्याची जबाबदारी असलेल्या सुप्रीम कंपनीबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे , तर दुसरीकडे सुप्रीम कंपनीकडून टोल वसुली मात्र मोठ्या प्रमाणात होत आहे. एकीकडे रस्त्याची दुरावस्था व त्यामुळे होणारे अपघात तर दुसरीकडे रोज होणारी टोल वसुली या सर्व बेजबाबदार कारभारामुळे टोल वसूल करणाऱ्या सुप्रीम कंपनीबरोबरच राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागा विरोधात स्थानिक नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत .

विशेष म्हणजे या रस्त्याच्या दुरुस्ती व सुधारणेसाठी स्थानिक नागरिकांनी एकत्र येत संघर्ष समिती स्थापन करून अनेक वेळा रास्ता रोको आंदोलने केले आहे . राज्य शासनाने टोल कंपनीच्या अनामत रक्कमेतून तब्बल सात कोटी रुपयांचा निधी मागील वर्षी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मंजूर केला होता. मात्र दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदाराने थातूरमातूर दुरुस्ती केल्याने आता या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत , तर वळ पाडा ,  मानकोली, अंजुरफाटा, बहात्तर गाळा , कालवार , वडघर , खारबाव येथे रस्त्याची अक्षरशा दुरावस्था झाली आहे. 

या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे येथे अपघातांचे प्रमाण वाढले असल्याने संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला असता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या महामार्गाच्या रस्त्यावर माती मिश्रित खाडी टाकून खड्डे भरण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरु करण्यात आले आहे. मात्र या महामार्गावर अवजड वाहनांची वर्दळ असल्याने व पाऊस पडला कि सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर टाकलेली खाडी सर्वत्र पसरते ज्यामुळे दुचाकी स्वारांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे . त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे भरण्याचा दिखावा करू नये , तर कायम स्वरूपी खड्डे भरावे व रस्ता सुस्थितीत करावा असा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाला येथील स्थानिक नागरिकांनी संघर्ष समितीच्या वतीने दिला आहे . 

सध्या काही ठिकाणी खाडी तर काही ठिकाणी पेव्हर ब्लॉकच्या सहाय्याने खड्डे भरण्याचे काम सुरु असून पावसाने उघडीप दिली की या रस्त्यावरील खड्डे आरएमसी काँक्रेट व डांबराने भरण्यात येतील अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भिवंडी शाखेचे अभियंता सचिन धात्रप यांनी दिली आहे.