शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
2
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
3
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
4
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
5
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
6
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
7
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
8
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
9
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
10
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
11
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
12
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
13
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
14
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
15
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
16
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
17
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
18
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
19
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?

भिवंडी ठाणे महामार्गाची दुरावस्था; मंत्र्यांचे दौरे व स्थानिकांच्या आंदोलनानंतरही परिस्थिती जैसे थेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 17:27 IST

भिवंडी ठाणे महामार्गाची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठं मोठ्या खाड्यांमुळे या महामार्गावर रोजची वाहतूक कोंडी होत आहे.

- नितिन पंडीत

भिवंडीभिवंडी ठाणे महामार्गाची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठं मोठ्या खाड्यांमुळे या महामार्गावर रोजची वाहतूक कोंडी होत आहे. ज्याचा नाहक त्रास सामान्य नागरिकांसह चाकरमानी व प्रवाशांना होत आहे. महत्वाचे म्हणजे ठाणे कशेळी ते अंजुरफाटा भिवंडी हा रस्ता कल्याण संगम इन्फ्रा या कंपनीस बीओटी तत्वावर शासनाने दिला असून कंपनीकडून टोल वसुली मोठ्या प्रमाणात दिवस रात्र केली जात आहे. मात्र रस्त्याच्या दुरावस्थेकडे या टोल कंपनीचे पुरता दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले असून पूर्णा गाव ते राहनाळ गाव या साधारणतः दोन ते टीम किलोमीटर अंतरावर रस्त्याला भले मोठे खड्डे पडले असून रस्त्याच्या कडेला असलेल्या गटाराचे पाणी भर रस्त्यावर येत असल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. 

या रस्त्याची सध्या प्रचंड दुरावस्था झाली असून खराब रस्त्यामुळे या महामार्गावर अपघातांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. महत्वाचे म्हणजे या महामार्गावर गोदाम पट्टा मोठ्या संख्येने असल्याने चाकरमान्यांना या मार्गावरून रोजचा प्रवास करावा लागत आहे. त्यातच खराब व खड्डेमय रस्त्यामुळे या मार्गावर रोज प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. अंजुरफाटा ते काल्हेर या जवळपास आठ ते नऊ किलोमीटर अंतरासाठी तब्बल अडीच ते तीन तास वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवाशांना वाहतूक कोंडीचा रोजचा त्रास सहन करावा लागत आहे. 

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे कशेळी येथे आंदोलन केले होते त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी कशेळी टोलनाका देखील फोडला होता. त्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मार्गासह भिवंडीतील वाहतूक कोंडी व रस्त्यांवरील खड्डयांची समस्या सोडविण्यासाठी भिवंडीचा दौरा केला होता.

यावेळी टोल कंपानीबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत चांगलेच खडेबोल सुनावले होते, पालकमंत्र्यांनी केलेली कानउघडणी नंतर रस्त्याच्या दुरावस्थेबाबत गांभीर्याने विचार व नियोजन करून रस्ता व्यवस्थित करण्यात येईल असे आश्वासन टोल कंपनी बरीबरच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पालकमंत्र्यांना देण्यात आले होते. मात्र महिना उलटूनही या रस्त्याची परिस्थिती जैसे थे अशीच आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या दौऱ्याचा व स्थानिकांनी केलेल्या आंदोलनांचा टोल कंपणीबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कोणताही फरक पडलेला दिसत नाही. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीला नेमकी मुहूर्त कधी मिळणार याकडे स्थानिकांसह प्रवाशांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Bhiwandiभिवंडीroad transportरस्ते वाहतूक