शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

भिवंडी ठाणे महामार्गाची दुरावस्था; मंत्र्यांचे दौरे व स्थानिकांच्या आंदोलनानंतरही परिस्थिती जैसे थेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 17:27 IST

भिवंडी ठाणे महामार्गाची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठं मोठ्या खाड्यांमुळे या महामार्गावर रोजची वाहतूक कोंडी होत आहे.

- नितिन पंडीत

भिवंडीभिवंडी ठाणे महामार्गाची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठं मोठ्या खाड्यांमुळे या महामार्गावर रोजची वाहतूक कोंडी होत आहे. ज्याचा नाहक त्रास सामान्य नागरिकांसह चाकरमानी व प्रवाशांना होत आहे. महत्वाचे म्हणजे ठाणे कशेळी ते अंजुरफाटा भिवंडी हा रस्ता कल्याण संगम इन्फ्रा या कंपनीस बीओटी तत्वावर शासनाने दिला असून कंपनीकडून टोल वसुली मोठ्या प्रमाणात दिवस रात्र केली जात आहे. मात्र रस्त्याच्या दुरावस्थेकडे या टोल कंपनीचे पुरता दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले असून पूर्णा गाव ते राहनाळ गाव या साधारणतः दोन ते टीम किलोमीटर अंतरावर रस्त्याला भले मोठे खड्डे पडले असून रस्त्याच्या कडेला असलेल्या गटाराचे पाणी भर रस्त्यावर येत असल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. 

या रस्त्याची सध्या प्रचंड दुरावस्था झाली असून खराब रस्त्यामुळे या महामार्गावर अपघातांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. महत्वाचे म्हणजे या महामार्गावर गोदाम पट्टा मोठ्या संख्येने असल्याने चाकरमान्यांना या मार्गावरून रोजचा प्रवास करावा लागत आहे. त्यातच खराब व खड्डेमय रस्त्यामुळे या मार्गावर रोज प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. अंजुरफाटा ते काल्हेर या जवळपास आठ ते नऊ किलोमीटर अंतरासाठी तब्बल अडीच ते तीन तास वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवाशांना वाहतूक कोंडीचा रोजचा त्रास सहन करावा लागत आहे. 

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे कशेळी येथे आंदोलन केले होते त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी कशेळी टोलनाका देखील फोडला होता. त्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मार्गासह भिवंडीतील वाहतूक कोंडी व रस्त्यांवरील खड्डयांची समस्या सोडविण्यासाठी भिवंडीचा दौरा केला होता.

यावेळी टोल कंपानीबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत चांगलेच खडेबोल सुनावले होते, पालकमंत्र्यांनी केलेली कानउघडणी नंतर रस्त्याच्या दुरावस्थेबाबत गांभीर्याने विचार व नियोजन करून रस्ता व्यवस्थित करण्यात येईल असे आश्वासन टोल कंपनी बरीबरच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पालकमंत्र्यांना देण्यात आले होते. मात्र महिना उलटूनही या रस्त्याची परिस्थिती जैसे थे अशीच आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या दौऱ्याचा व स्थानिकांनी केलेल्या आंदोलनांचा टोल कंपणीबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कोणताही फरक पडलेला दिसत नाही. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीला नेमकी मुहूर्त कधी मिळणार याकडे स्थानिकांसह प्रवाशांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Bhiwandiभिवंडीroad transportरस्ते वाहतूक