शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

मागासवर्गीय सरळसेवा भरतीत भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 05:04 IST

भिवंडी : महापालिकेत मागासवर्गीय कर्मचारी सरळसेवा भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला होता. याबाबत पात्र उमेदवाराने लोकायुक्त व सरकार दरबारी तक्रारी केल्या होत्या. त्याचा निकाल होऊनही पालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी गैरकारभार करणाºया उमेदवारांना व त्यासंबंधित अधिकाºयांना अभय दिले होते. ही संधी साधून बºयाच जणांनी आपली नोकरी वाचविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयात ...

भिवंडी : महापालिकेत मागासवर्गीय कर्मचारी सरळसेवा भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला होता. याबाबत पात्र उमेदवाराने लोकायुक्त व सरकार दरबारी तक्रारी केल्या होत्या. त्याचा निकाल होऊनही पालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी गैरकारभार करणाºया उमेदवारांना व त्यासंबंधित अधिकाºयांना अभय दिले होते. ही संधी साधून बºयाच जणांनी आपली नोकरी वाचविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयात न गेलेल्या तीन कर्मचाºयांना नोटिसा बजावूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने तिघांना उपायुक्त दीपक कुरळेकर यांनी बडतर्फ केले आहे. उरलेल्या ७१ जणांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे.

पालिकेत २०१२ मध्ये मागासवर्गीय अनुशेषमधील सरळसेवा भरती करण्यात आली. यात विविध पदाच्या ७४ कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली. या भरतीमध्ये संगीता गणेश पाटील यांनी बालवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज केला होता. या सरळसेवा भरतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होऊन संगीता यांना पात्र असूनही अधिकाºयांनी डावलले. त्यामुळे संगीता यांनी लोकायुक्तांकडे तक्रार करीत भ्रष्टाचार उघडकीस आणला. याबाबत उपलोकायुक्तांनी भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी कल्याण डोंबिवली पालिकेचे तत्कालीन आयुक्त इ. रवींद्रन यांना नियुक्त केले. त्यांनी भ्रष्ट कारभाराचा अहवाल लोकायुक्तांकडे दिल्यानंतर उपलोकआयुक्तांनी ही भरती प्रक्रिया रद्द करण्याचे निर्देश सरकारला दिले. त्यानुसार अवर सचिव अजित कवडे यांनी १ डिसेंबर २०१६ मध्ये महापालिका आयुक्तांना दोषींची विभागीय चौकशी करावी तसेच अहवाल सादर करावा,असे आदेश आयुक्तांना दिले होते. लोकआयुक्त कार्यालयानेही मागासवर्गीय कर्मचारी सरळसेवा भरतीमध्ये केलेल्या भ्रष्टाचाराची खातेनिहाय चौकशी करून ही भरती रद्द करण्याचे आदेश पालिका आयुक्तांना दिले. अशा प्रकारे दोन्ही कार्यालयामधून आदेश मिळाल्यानंतर तत्कालीन आयुक्त योगेश म्हसे यांनी उपायुक्त विनोद शिंगटे यांना संबंधितांवर कारवाई करण्यास सांगितले. मात्र पालिकेतील कनिष्ठ अधिकाºयांनी या आदेशाची गोपनीयता भंग केल्याने भरतीतील अपात्र कर्मचाºयांनी न्यायालयात धाव घेतली. ही भरती सरकारने रद्द करूनही हे कर्मचारी नियमित पगार घेत आहेत. सहा वर्षांपासून संगीता यांचा सरळसेवा भरतीतील भ्रष्ट कारभाराविरोधात लढा सुरू असून उपलोकायुक्तांच्या आदेशाचा भंग करणाºयांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या मागणीच्या दरम्यान संगीता यांनी सरकारला आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर अवर सचिव अजित कवडे यांनी आयुक्तांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. परंतु १० महिने उलटूनही प्रशासनाने कारवाई केली नाही. मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार केल्यावर कारवाईचे आदेश दिले.७१ कर्मचाºयांच्या कारवाईकडे लागले लक्ष बिल्डिंग फायरमन धनंजय खैरे, बालवाडी मदतनीस श्रद्धा कसालकर व रोशना सोष्टे यांची नियुक्ती अटी-शर्तीनुसार न झाल्याने ती रद्द करून त्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.या घटनेमुळे भरतीतील उरलेल्या ७१ कर्मचाºयांवर टांगती तलवार असून त्यांची सेवा अधिकारी वर्ग कधी रद्द करतात, याकडे पालिका कर्मचाºयांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीexamपरीक्षा