शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

मागासवर्गीय सरळसेवा भरतीत भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 05:04 IST

भिवंडी : महापालिकेत मागासवर्गीय कर्मचारी सरळसेवा भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला होता. याबाबत पात्र उमेदवाराने लोकायुक्त व सरकार दरबारी तक्रारी केल्या होत्या. त्याचा निकाल होऊनही पालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी गैरकारभार करणाºया उमेदवारांना व त्यासंबंधित अधिकाºयांना अभय दिले होते. ही संधी साधून बºयाच जणांनी आपली नोकरी वाचविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयात ...

भिवंडी : महापालिकेत मागासवर्गीय कर्मचारी सरळसेवा भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला होता. याबाबत पात्र उमेदवाराने लोकायुक्त व सरकार दरबारी तक्रारी केल्या होत्या. त्याचा निकाल होऊनही पालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी गैरकारभार करणाºया उमेदवारांना व त्यासंबंधित अधिकाºयांना अभय दिले होते. ही संधी साधून बºयाच जणांनी आपली नोकरी वाचविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयात न गेलेल्या तीन कर्मचाºयांना नोटिसा बजावूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने तिघांना उपायुक्त दीपक कुरळेकर यांनी बडतर्फ केले आहे. उरलेल्या ७१ जणांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे.

पालिकेत २०१२ मध्ये मागासवर्गीय अनुशेषमधील सरळसेवा भरती करण्यात आली. यात विविध पदाच्या ७४ कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली. या भरतीमध्ये संगीता गणेश पाटील यांनी बालवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज केला होता. या सरळसेवा भरतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होऊन संगीता यांना पात्र असूनही अधिकाºयांनी डावलले. त्यामुळे संगीता यांनी लोकायुक्तांकडे तक्रार करीत भ्रष्टाचार उघडकीस आणला. याबाबत उपलोकायुक्तांनी भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी कल्याण डोंबिवली पालिकेचे तत्कालीन आयुक्त इ. रवींद्रन यांना नियुक्त केले. त्यांनी भ्रष्ट कारभाराचा अहवाल लोकायुक्तांकडे दिल्यानंतर उपलोकआयुक्तांनी ही भरती प्रक्रिया रद्द करण्याचे निर्देश सरकारला दिले. त्यानुसार अवर सचिव अजित कवडे यांनी १ डिसेंबर २०१६ मध्ये महापालिका आयुक्तांना दोषींची विभागीय चौकशी करावी तसेच अहवाल सादर करावा,असे आदेश आयुक्तांना दिले होते. लोकआयुक्त कार्यालयानेही मागासवर्गीय कर्मचारी सरळसेवा भरतीमध्ये केलेल्या भ्रष्टाचाराची खातेनिहाय चौकशी करून ही भरती रद्द करण्याचे आदेश पालिका आयुक्तांना दिले. अशा प्रकारे दोन्ही कार्यालयामधून आदेश मिळाल्यानंतर तत्कालीन आयुक्त योगेश म्हसे यांनी उपायुक्त विनोद शिंगटे यांना संबंधितांवर कारवाई करण्यास सांगितले. मात्र पालिकेतील कनिष्ठ अधिकाºयांनी या आदेशाची गोपनीयता भंग केल्याने भरतीतील अपात्र कर्मचाºयांनी न्यायालयात धाव घेतली. ही भरती सरकारने रद्द करूनही हे कर्मचारी नियमित पगार घेत आहेत. सहा वर्षांपासून संगीता यांचा सरळसेवा भरतीतील भ्रष्ट कारभाराविरोधात लढा सुरू असून उपलोकायुक्तांच्या आदेशाचा भंग करणाºयांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या मागणीच्या दरम्यान संगीता यांनी सरकारला आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर अवर सचिव अजित कवडे यांनी आयुक्तांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. परंतु १० महिने उलटूनही प्रशासनाने कारवाई केली नाही. मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार केल्यावर कारवाईचे आदेश दिले.७१ कर्मचाºयांच्या कारवाईकडे लागले लक्ष बिल्डिंग फायरमन धनंजय खैरे, बालवाडी मदतनीस श्रद्धा कसालकर व रोशना सोष्टे यांची नियुक्ती अटी-शर्तीनुसार न झाल्याने ती रद्द करून त्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.या घटनेमुळे भरतीतील उरलेल्या ७१ कर्मचाºयांवर टांगती तलवार असून त्यांची सेवा अधिकारी वर्ग कधी रद्द करतात, याकडे पालिका कर्मचाºयांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीexamपरीक्षा