शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

हवामानाने फिरवली पाठ, बाजारभावाने लावली वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:40 IST

भातसानगर : शहापूर तालुक्यातील कारले उत्पादनाला बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसला असून या हवामानामुळे उत्पन्नात घट झाली आहे. त्यातच ...

भातसानगर : शहापूर तालुक्यातील कारले उत्पादनाला बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसला असून या हवामानामुळे उत्पन्नात घट झाली आहे. त्यातच बाजारभावानेही वाट लावली असल्याची प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत.

तालुक्यातील शेंद्रूण गावातील शेतकरी प्रदीप भोईर या शेतकऱ्याने आपल्या एक एकर जागेमध्ये कारल्याचे ठिबक पद्धतीने उत्पादन घ्यायला सुरुवात केली आहे. मागील वर्षी ४० ते ४५ रुपये किलो भावाने ती विकली जात होती. तर काही दिवसांपूर्वी तोच भाव होता, मात्र सद्य:स्थितीमध्ये ही कारली केवळ २० ते २५ रुपये किलोने विकावी लागत आहे. परिणामी झालेला खर्च तरी भरून निघेल की नाही असा प्रश्न त्यांच्या समोर पडला आहे. मागीलवर्षी प्रमाणे यंदाही आपल्याला अधिक फायदा होईल, अशा प्रकारची आशा भोईर यांना होती, मात्र गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामान यामुळे वेलींना लागलेली फुले गळून जाणे किंवा करपून जाणे, अधिक फुले न लागणे यामुळे उत्पादन घटू लागल्याने दीड क्विंटल निघणारी कारली आता दिवसाआड क्विंटलच निघत आहेत. त्यामुळे मोठे नुकसान झाल्याचे भोईर यांचे म्हणणे आहे.

पदवी परीक्षा पास झाल्यानंतर केवळ नोकरीची अपेक्षा न करता या तरुणाने अशा प्रकारची शेती करण्याचा मनोदय व्यक्त केला आणि तो त्यामध्ये उतरला. शेतीत नाना प्रयोग करून यशही मिळविले. मात्र गेल्या काही वर्षांपासून बदलत्या हवामानामुळे अनेक संकटांचा सामना करावा लागत असल्याने त्यांची चिंता वाढली आहे.