शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

भिवंडीतील चिंचवली-खांडपे ग्रामपंचायतीला ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 22:37 IST

ग्रामस्थांविरोधात गुन्हा; तीन सदस्यांना पोलीस कोठडी

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील खांडपे-चिंचवली या ग्रुपग्रामपंचायत क्षेत्रामध्ये विकासकामांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करून ग्रामसभेनंतर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप ठोकल्याची घटना घडली. मात्र, या घटनेनंतर ग्रामसेविका श्वेता पाटील यांनी तालुका पोलिसांकडे धाव घेऊन तक्र ार केली असता पोलिसांनी या घटनेची खातरजमा करून १२ नागरिकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी ग्रामपंचायत सदस्यांसह तिघा जणांना अटक केली आहे. या तिघांनाही मंगळवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.ग्रामपंचायत सदस्य गिरीश पाटील (२८), हेमंत पाडेकर (३१), शरद फोडसे (२८) अशी अटक केलेल्या ग्रामस्थांची नावे असून प्रशांत भोईर, योगेश भोईर, पद्मन पाटील, विनोद डाके, सागर पाडेकर, अशोक भोईर, अमोल पाडेकर, अजय पाटील, विशाल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, ते फरार झाले आहेत.१५ आॅगस्टची तहकूब ग्रामसभा सरपंच सविता भांबरे यांच्या अनुपस्थितीत उपसरपंच गुलाब तारे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी झाली. या ग्रामसभेसाठी दोन्ही गावचे एकूण ८५ ग्रामस्थ उपस्थित होते. त्या वेळी ग्रामस्थांनी ग्रामसेविका श्वेता पाटील यांच्यावर ग्रामसभेत भ्रष्टाचाराचा आरोप करून चिंचवली-खांडपे या ग्रामपंचायतीमध्ये प्रशासनाने कागदोपत्री सर्व योजना राबवल्याचे दाखवले आहे. मात्र, ग्रामपंचायत क्षेत्रात पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. पाणी शुद्धीकरणासाठी दिल्या जाणाऱ्या औषधखरेदीत भ्रष्टाचार झाला आहे, असे ग्रामस्थांनी आरोप केले. त्यावर ग्रामसेविका पाटील व कर्मचारी निरु त्तर झाले. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांना ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर काढून ग्रामपंचायतीस टाळे ठोकून कार्यालय बंद केले.याबाबत जोपर्यंत गटविकास अधिकारी समाधानकारक कारवाई करत नाहीत, तोपर्यंत कुलूप उघडले जाणार नाही, असा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. या सर्व घटनेचे काही तरुणांनी मोबाइलमध्ये चित्रीकरण करून ते प्रसारित केले.चित्रीकरण पाहून केली अटकचित्रीकरण ग्रामसेविका पाटील यांनी तालुका पोलीस ठाण्यात दाखवले असता पोलीस उपनिरीक्षक वैभव देशपांडे यांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. तर, फरार झालेल्या अन्य ग्रामस्थांचा कसून शोध सुरू असून त्यांना लवकरच अटक केली जाईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी सांगितले.