शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
4
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
5
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
6
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
7
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
8
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
9
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
10
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
11
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
12
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
13
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
14
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
15
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
16
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
17
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात

भिवंडीतील चिंचवली-खांडपे ग्रामपंचायतीला ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 22:37 IST

ग्रामस्थांविरोधात गुन्हा; तीन सदस्यांना पोलीस कोठडी

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील खांडपे-चिंचवली या ग्रुपग्रामपंचायत क्षेत्रामध्ये विकासकामांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करून ग्रामसभेनंतर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप ठोकल्याची घटना घडली. मात्र, या घटनेनंतर ग्रामसेविका श्वेता पाटील यांनी तालुका पोलिसांकडे धाव घेऊन तक्र ार केली असता पोलिसांनी या घटनेची खातरजमा करून १२ नागरिकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी ग्रामपंचायत सदस्यांसह तिघा जणांना अटक केली आहे. या तिघांनाही मंगळवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.ग्रामपंचायत सदस्य गिरीश पाटील (२८), हेमंत पाडेकर (३१), शरद फोडसे (२८) अशी अटक केलेल्या ग्रामस्थांची नावे असून प्रशांत भोईर, योगेश भोईर, पद्मन पाटील, विनोद डाके, सागर पाडेकर, अशोक भोईर, अमोल पाडेकर, अजय पाटील, विशाल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, ते फरार झाले आहेत.१५ आॅगस्टची तहकूब ग्रामसभा सरपंच सविता भांबरे यांच्या अनुपस्थितीत उपसरपंच गुलाब तारे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी झाली. या ग्रामसभेसाठी दोन्ही गावचे एकूण ८५ ग्रामस्थ उपस्थित होते. त्या वेळी ग्रामस्थांनी ग्रामसेविका श्वेता पाटील यांच्यावर ग्रामसभेत भ्रष्टाचाराचा आरोप करून चिंचवली-खांडपे या ग्रामपंचायतीमध्ये प्रशासनाने कागदोपत्री सर्व योजना राबवल्याचे दाखवले आहे. मात्र, ग्रामपंचायत क्षेत्रात पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. पाणी शुद्धीकरणासाठी दिल्या जाणाऱ्या औषधखरेदीत भ्रष्टाचार झाला आहे, असे ग्रामस्थांनी आरोप केले. त्यावर ग्रामसेविका पाटील व कर्मचारी निरु त्तर झाले. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांना ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर काढून ग्रामपंचायतीस टाळे ठोकून कार्यालय बंद केले.याबाबत जोपर्यंत गटविकास अधिकारी समाधानकारक कारवाई करत नाहीत, तोपर्यंत कुलूप उघडले जाणार नाही, असा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. या सर्व घटनेचे काही तरुणांनी मोबाइलमध्ये चित्रीकरण करून ते प्रसारित केले.चित्रीकरण पाहून केली अटकचित्रीकरण ग्रामसेविका पाटील यांनी तालुका पोलीस ठाण्यात दाखवले असता पोलीस उपनिरीक्षक वैभव देशपांडे यांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. तर, फरार झालेल्या अन्य ग्रामस्थांचा कसून शोध सुरू असून त्यांना लवकरच अटक केली जाईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी सांगितले.