शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

आव्हाड-शिंदे बाचाबाची

By admin | Updated: January 22, 2017 05:06 IST

ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी शिवसेना-भाजपा ‘युती’वर मात करण्यासाठी आघाडी केल्याची घोषणा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी मुंबईत केली असली

ठाणे : ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी शिवसेना-भाजपा ‘युती’वर मात करण्यासाठी आघाडी केल्याची घोषणा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी मुंबईत केली असली, तरी आठ जागांवर अजूनही घोडे अडल्याचे सूत्रांनी सांगितले. याच मुद्द्यावरून काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांच्यात काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या उपस्थितीत बाचाबाची झाली. राणे यांच्या मध्यस्थीने वाद मिटवून आघाडी झाल्याचे जाहीर केले असले, तरी अंतर्गत धुसफूस सुरू आहे.ज्या आठ जागांवरून शिंदे-आव्हाड यांच्यात जुंपली, त्यामध्ये मुंब्रा, घोडबंदर, वागळे इस्टेट आणि बाळकुम भागातील वॉर्डांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वेळीच या जागांबाबत चर्चा करून तडजोड झाली नाही, तर या जागांवर आघाडीत बंडखोरीची लागण लागू शकते, असे दोन्ही पक्षांतील नेत्यांचे मत आहे.ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेसपेक्षा वरचढ असल्याने राष्ट्रवादीने काँग्रेसला ६०-४० जागांचा फॉर्म्युला दिला होता. काँग्रेसने ५५-४५ या फॉर्मुल्याची मागणी केली होती. त्याला शह देण्यासाठी राष्ट्रवादीने शहरात आघाडी व मुंब्य्रात मैत्रीपूर्ण लढत अशी आॅफर काँग्रेसला दिली. मात्र, आघाडी करायची असेल, तर संपूर्ण ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये करा, असा आग्रह काँग्रेसने धरला होता. गेल्या आठवड्यात काँग्रेस नेते नारायण राणे यांनी ठाण्यात कार्यकर्ता मेळावा घेतल्यानंतर आघाडीच्या बैठकीत ठाण्याविषयी चर्चा केली. त्या वेळी आघाडीवर उभय पक्षांचे एकमत झाले. या चर्चेची पुढची पायरी म्हणून मुंबईत राणे यांच्या बंगल्यावर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसच्या मनोज शिंदे यांनी कळीच्या आठ ते नऊ जागांवर दावा केला. मुंब्य्रामध्ये राष्ट्रवादी ही काँग्रेसला केवळ ३ जागा देण्यास तयार झाली होती. बरीच चर्चा झाल्यावर आता चार जागा सोडायला राष्ट्रवादी तयार झाली. परंतु, केवळ मुंब्य्राला महत्त्व देण्याची आव्हाडांची ही खेळी असून कळवा, घोडबंदर, बाळकुम, वागळे तसेच शहरातील महत्त्वाच्या प्रभागांतील जागा काँग्रेसला मिळाल्या पाहिजेत, अशी भूमिका शिंदे यांनी घेतल्याचे समजते. सर्वत्र निवडून येणाऱ्या जागा सोडण्यास राष्ट्रवादीने स्पष्ट नकार दिल्याने आव्हाड-शिंदे यांच्यात बैठकीत बाचाबाची झाली. ‘आघाडी नाही झाली तरी चालेल, पण काँग्रेस राष्ट्रवादीच्या मागे फरफटत जाणार नाही’, असे काँग्रेसने राष्ट्रवादीला सुनावले.(प्रतिनिधी)