शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

आव्हाड-शिंदे बाचाबाची

By admin | Updated: January 22, 2017 05:06 IST

ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी शिवसेना-भाजपा ‘युती’वर मात करण्यासाठी आघाडी केल्याची घोषणा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी मुंबईत केली असली

ठाणे : ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी शिवसेना-भाजपा ‘युती’वर मात करण्यासाठी आघाडी केल्याची घोषणा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी मुंबईत केली असली, तरी आठ जागांवर अजूनही घोडे अडल्याचे सूत्रांनी सांगितले. याच मुद्द्यावरून काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांच्यात काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या उपस्थितीत बाचाबाची झाली. राणे यांच्या मध्यस्थीने वाद मिटवून आघाडी झाल्याचे जाहीर केले असले, तरी अंतर्गत धुसफूस सुरू आहे.ज्या आठ जागांवरून शिंदे-आव्हाड यांच्यात जुंपली, त्यामध्ये मुंब्रा, घोडबंदर, वागळे इस्टेट आणि बाळकुम भागातील वॉर्डांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वेळीच या जागांबाबत चर्चा करून तडजोड झाली नाही, तर या जागांवर आघाडीत बंडखोरीची लागण लागू शकते, असे दोन्ही पक्षांतील नेत्यांचे मत आहे.ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेसपेक्षा वरचढ असल्याने राष्ट्रवादीने काँग्रेसला ६०-४० जागांचा फॉर्म्युला दिला होता. काँग्रेसने ५५-४५ या फॉर्मुल्याची मागणी केली होती. त्याला शह देण्यासाठी राष्ट्रवादीने शहरात आघाडी व मुंब्य्रात मैत्रीपूर्ण लढत अशी आॅफर काँग्रेसला दिली. मात्र, आघाडी करायची असेल, तर संपूर्ण ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये करा, असा आग्रह काँग्रेसने धरला होता. गेल्या आठवड्यात काँग्रेस नेते नारायण राणे यांनी ठाण्यात कार्यकर्ता मेळावा घेतल्यानंतर आघाडीच्या बैठकीत ठाण्याविषयी चर्चा केली. त्या वेळी आघाडीवर उभय पक्षांचे एकमत झाले. या चर्चेची पुढची पायरी म्हणून मुंबईत राणे यांच्या बंगल्यावर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसच्या मनोज शिंदे यांनी कळीच्या आठ ते नऊ जागांवर दावा केला. मुंब्य्रामध्ये राष्ट्रवादी ही काँग्रेसला केवळ ३ जागा देण्यास तयार झाली होती. बरीच चर्चा झाल्यावर आता चार जागा सोडायला राष्ट्रवादी तयार झाली. परंतु, केवळ मुंब्य्राला महत्त्व देण्याची आव्हाडांची ही खेळी असून कळवा, घोडबंदर, बाळकुम, वागळे तसेच शहरातील महत्त्वाच्या प्रभागांतील जागा काँग्रेसला मिळाल्या पाहिजेत, अशी भूमिका शिंदे यांनी घेतल्याचे समजते. सर्वत्र निवडून येणाऱ्या जागा सोडण्यास राष्ट्रवादीने स्पष्ट नकार दिल्याने आव्हाड-शिंदे यांच्यात बैठकीत बाचाबाची झाली. ‘आघाडी नाही झाली तरी चालेल, पण काँग्रेस राष्ट्रवादीच्या मागे फरफटत जाणार नाही’, असे काँग्रेसने राष्ट्रवादीला सुनावले.(प्रतिनिधी)